शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

शाळांतील उपस्थितीत दिवसागणिक भर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:59 IST

भूम (जि. उस्मानाबाद) : काेराेनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात नववी ते बरावी, तर दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे ...

भूम (जि. उस्मानाबाद) : काेराेनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात नववी ते बरावी, तर दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सुरुवातीच्या दिवसांत अपेक्षित उपस्थिती नव्हती; परंतु सध्या दिवसागणिक उपस्थिती वाढू लागली आहे. आजघडीला तालुक्यातील सर्व शाळांतील उपस्थिती ११ हजारांवर जाऊन ठेपली आहे.

भूम तालुक्यात पाचवी ते आठवीच्या जिल्हा परिषद व खासगीसह ९४, तर नववी ते बारावीपर्यंतच्या ३८ शाळा आहे. या सर्व वर्गांचा पट तब्बल १३ हजार १०० एवढा आहे. दरम्यान, काेराेनामुळे या सर्वच शाळा बंद हाेत्या. जवळपास आठ ते नऊ महिने शाळांचे कुलूप उघडले गेले नाही. काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाने टप्प्या-टप्प्याने वर्ग उघडण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. यानंतर काही दिवसांपूर्वी म्हणजेच २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार वर्गखाेल्या सॅनिटाईज करून घेतल्या हाेत्या. प्रत्येकास मास्क बंधनकारक केले आहे. एवढेच नाही, तर विद्यार्थ्यांना वर्गात बसविताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. साेबतच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून आता पहिल्या दिवसाच्या तुलनेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढू लागली आहे. तालुक्यातील नववी ते बारावीच्या वर्गातील एकूण पट पाच हजार १३ एवढा आहे. ४ फेब्रुवारीअखेर यापैकी तीन हजार १२१ विद्यार्थ्यांनी वर्गात हजेरी लावली आहे. म्हणजेच वर्गातील उपस्थिती ७० टक्क्यांवर पाेहाेचली. पाचवी ते आठवीच्या वर्गांचा पट आठ हजार ७० एवढा आहे. २ फेब्रुवारीपर्यंत या वर्गांतील उपस्थिती पाच हजार ३६३ वर पाेहाेचली. येणाऱ्या काळात हा पट आणखी वाढेल, असा विश्वास शिक्षण यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आला.

चाैकट...

बसेसच्या फेऱ्या बंद असल्याने फटका

शासनाच्या आदेशानुसार एसटी महामंडळाने बससेवा सुरू केली आहे; परंतु तालुक्यातील अनेक गावांत आजही बसेसच्या फेऱ्या बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची इच्छा असतानाही जाता येत नाही. त्यामुळे अशा गावांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ लागले आहे. त्यामुळे महामंडळाने पूर्वीप्रमाणे बसेस फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

काेट...

२७ जानेवारी रोजी पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करून शाळांना भेटी दिल्या. शाळेतील वर्गखाेल्या सॅनिटाईज केल्या आहेत की नाही, स्वच्छता राखली जातेय का? मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन याेग्य प्रकारे हाेत आहे की नाही, आदी बाबींची पाहणी करण्यात आली. बहुतांश शाळांनी उपराेक्त उपाययाेजना केल्या आहेत. त्यामुळेच पालकांचा विश्वास बळावला. परिणामी वर्गातील उपस्थितीत सातत्याने वाढ होत आहे.

- सुनील गायकवाड, गटशिक्षण अधिकारी, भूम.