शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

वांगीतील सीताफळांची रोपे रुजली केनियातील शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 18:58 IST

यशकथा : वांगीतील शेतकऱ्यांने विकसित केलेल्या रोपवाटिकेने ग्लोबल मार्केटला गवसणी घालण्यास सुरुवात केली आहे़ 

- संतोष वीर ( उस्मानाबाद )

पोलीस खात्यातील नोकरी करतानाही मनातील शेतीविषयीची आस्था स्वस्थ बसू देईना, यातूनच त्याने भूम तालुक्यातील वांगी खुर्द या आपल्या गावी तीन एकरांवर रोपवाटिकेची उभारणी करून ६ लाख रोपांची निर्मिती केली आहे़ रोपांचा दर्जा टिकविण्यासाठी या तरुणाने घेतलेली मेहनत आता फळास येत असून, या वाटिकेतील सीताफळाची रोपे केनियातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहेत़ विजय गिरी, असे या धडपडी तरुणाचे नाव असून, त्याने दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

अकरावीत असतानाच विजय गिरी याने फळबाग योजनेंतर्गत १०० केशर आंब्यांची लागवड केली होती़ त्यातील बरीचशी रोपे वाया गेल्यानंतरही उर्वरित रोपे त्याने जिद्दीने जगविली व जगलेल्या रोपांची कलमे करून पुन्हा नवी रोपे तयार केली़ यातूनच त्याच्यात रोपनिर्मितीची आवड निर्माण झाली़ अवघ्या काही वर्षांतच त्याने लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तब्बल २० हजार रोपे तयार करून दिली़ मात्र, मध्येच अवतरलेल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचा फळबागांकडील कल कमी झाला़ पर्यायाने विजयची छोटीशी रोपवाटिकाही कोलमडून पडली.

घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्याने पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरू केले़ दुसऱ्या प्रयत्नात तो बीड पोलीस दलात भरती झाला़ सध्या तो पाटोदा ठाण्यात कार्यरत आहे़ अंगावर खाकी चढली तरी मनातील शेतीशी जुळलेली नाळ त्याला नेहमी खुणावत होती. काळ्या आईशी असलेले घट्ट नाते त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. यातच २०१६ साली चांगला पाऊस झाल्याने त्याने रोपवाटिका उभी करण्याचा चंग बांधला. नुसता चंग बांधून तो थांबला नाही, तर रोपवाटिका यशस्वी करून दाखविली. 

आज त्याने एक हेक्टर ३० गुंठ्यांत आपली मोठी रोपवाटिका साकारली आहे़ त्यात तब्बल ६ लाखांवर रोपे तयार केली आहेत़ त्याच्या या धडपडीचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे़ उस्मानाबाद, लातूरसारख्या अवर्षणप्रवण भागात फळबागा जगविणे हे महाकठीण काम़ त्यामुळे अल्प पाण्यातही जगणारे फळपीक म्हणून लौकिक असलेल्या सीताफळावर विजयने लक्ष्य केंद्रित केले आहे़ त्यावर चांगली मेहनत घेतल्याने नुकतीच त्याची सीताफळाची रोपे केनियातील शेतकऱ्यांनी मागवून घेतली आहेत़ पुण्यात झालेल्या कृषी प्रदर्शनात त्याने ही रोपे ठेवली होती़ तेथूनच्या विजयने ग्लोबल मार्केटला गवसणी घालण्यास सुरुवात केली आहे़ 

मी विकसित केलेले सीताफळ हे साधारणत: गावरान सीताफळाचा सीझन संपल्यानंतर येते़ नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत हे फळ बाजारात नेता येते़ त्यामुळे चांगला भाव मिळतो़ मुंबईच्या बाजारपेठेत मी ही सीताफळे इतक्यातच २०० ते २५० रुपये कि.ग्रॅ. दराने विकली आहेत़ यामुळे शेतकऱ्यांचाही चांगला फायदा होत आहे. कोणतेही काम जिद्दीने केले, तर ते पूर्णत्वास जाऊन यश नक्कीच मिळते, असे विजय गिरी याने सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती