शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

वांगीतील सीताफळांची रोपे रुजली केनियातील शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 18:58 IST

यशकथा : वांगीतील शेतकऱ्यांने विकसित केलेल्या रोपवाटिकेने ग्लोबल मार्केटला गवसणी घालण्यास सुरुवात केली आहे़ 

- संतोष वीर ( उस्मानाबाद )

पोलीस खात्यातील नोकरी करतानाही मनातील शेतीविषयीची आस्था स्वस्थ बसू देईना, यातूनच त्याने भूम तालुक्यातील वांगी खुर्द या आपल्या गावी तीन एकरांवर रोपवाटिकेची उभारणी करून ६ लाख रोपांची निर्मिती केली आहे़ रोपांचा दर्जा टिकविण्यासाठी या तरुणाने घेतलेली मेहनत आता फळास येत असून, या वाटिकेतील सीताफळाची रोपे केनियातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहेत़ विजय गिरी, असे या धडपडी तरुणाचे नाव असून, त्याने दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

अकरावीत असतानाच विजय गिरी याने फळबाग योजनेंतर्गत १०० केशर आंब्यांची लागवड केली होती़ त्यातील बरीचशी रोपे वाया गेल्यानंतरही उर्वरित रोपे त्याने जिद्दीने जगविली व जगलेल्या रोपांची कलमे करून पुन्हा नवी रोपे तयार केली़ यातूनच त्याच्यात रोपनिर्मितीची आवड निर्माण झाली़ अवघ्या काही वर्षांतच त्याने लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तब्बल २० हजार रोपे तयार करून दिली़ मात्र, मध्येच अवतरलेल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचा फळबागांकडील कल कमी झाला़ पर्यायाने विजयची छोटीशी रोपवाटिकाही कोलमडून पडली.

घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्याने पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरू केले़ दुसऱ्या प्रयत्नात तो बीड पोलीस दलात भरती झाला़ सध्या तो पाटोदा ठाण्यात कार्यरत आहे़ अंगावर खाकी चढली तरी मनातील शेतीशी जुळलेली नाळ त्याला नेहमी खुणावत होती. काळ्या आईशी असलेले घट्ट नाते त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. यातच २०१६ साली चांगला पाऊस झाल्याने त्याने रोपवाटिका उभी करण्याचा चंग बांधला. नुसता चंग बांधून तो थांबला नाही, तर रोपवाटिका यशस्वी करून दाखविली. 

आज त्याने एक हेक्टर ३० गुंठ्यांत आपली मोठी रोपवाटिका साकारली आहे़ त्यात तब्बल ६ लाखांवर रोपे तयार केली आहेत़ त्याच्या या धडपडीचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे़ उस्मानाबाद, लातूरसारख्या अवर्षणप्रवण भागात फळबागा जगविणे हे महाकठीण काम़ त्यामुळे अल्प पाण्यातही जगणारे फळपीक म्हणून लौकिक असलेल्या सीताफळावर विजयने लक्ष्य केंद्रित केले आहे़ त्यावर चांगली मेहनत घेतल्याने नुकतीच त्याची सीताफळाची रोपे केनियातील शेतकऱ्यांनी मागवून घेतली आहेत़ पुण्यात झालेल्या कृषी प्रदर्शनात त्याने ही रोपे ठेवली होती़ तेथूनच्या विजयने ग्लोबल मार्केटला गवसणी घालण्यास सुरुवात केली आहे़ 

मी विकसित केलेले सीताफळ हे साधारणत: गावरान सीताफळाचा सीझन संपल्यानंतर येते़ नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत हे फळ बाजारात नेता येते़ त्यामुळे चांगला भाव मिळतो़ मुंबईच्या बाजारपेठेत मी ही सीताफळे इतक्यातच २०० ते २५० रुपये कि.ग्रॅ. दराने विकली आहेत़ यामुळे शेतकऱ्यांचाही चांगला फायदा होत आहे. कोणतेही काम जिद्दीने केले, तर ते पूर्णत्वास जाऊन यश नक्कीच मिळते, असे विजय गिरी याने सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती