शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
4
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
5
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
6
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
7
Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती
8
भविष्यातील भारतात अदानी ग्रुपचं काय योगदान असेल?; प्रणव अदानींनी सांगितला संपूर्ण 'प्लॅन'
9
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
10
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
11
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
12
मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना आता हक्काचे घर; ‘मदत माश’ जमिनीवरील घरे नियमित होणार
13
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
14
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
15
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
16
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
17
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
18
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
19
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
20
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वांगीतील सीताफळांची रोपे रुजली केनियातील शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 18:58 IST

यशकथा : वांगीतील शेतकऱ्यांने विकसित केलेल्या रोपवाटिकेने ग्लोबल मार्केटला गवसणी घालण्यास सुरुवात केली आहे़ 

- संतोष वीर ( उस्मानाबाद )

पोलीस खात्यातील नोकरी करतानाही मनातील शेतीविषयीची आस्था स्वस्थ बसू देईना, यातूनच त्याने भूम तालुक्यातील वांगी खुर्द या आपल्या गावी तीन एकरांवर रोपवाटिकेची उभारणी करून ६ लाख रोपांची निर्मिती केली आहे़ रोपांचा दर्जा टिकविण्यासाठी या तरुणाने घेतलेली मेहनत आता फळास येत असून, या वाटिकेतील सीताफळाची रोपे केनियातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहेत़ विजय गिरी, असे या धडपडी तरुणाचे नाव असून, त्याने दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

अकरावीत असतानाच विजय गिरी याने फळबाग योजनेंतर्गत १०० केशर आंब्यांची लागवड केली होती़ त्यातील बरीचशी रोपे वाया गेल्यानंतरही उर्वरित रोपे त्याने जिद्दीने जगविली व जगलेल्या रोपांची कलमे करून पुन्हा नवी रोपे तयार केली़ यातूनच त्याच्यात रोपनिर्मितीची आवड निर्माण झाली़ अवघ्या काही वर्षांतच त्याने लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तब्बल २० हजार रोपे तयार करून दिली़ मात्र, मध्येच अवतरलेल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचा फळबागांकडील कल कमी झाला़ पर्यायाने विजयची छोटीशी रोपवाटिकाही कोलमडून पडली.

घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्याने पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरू केले़ दुसऱ्या प्रयत्नात तो बीड पोलीस दलात भरती झाला़ सध्या तो पाटोदा ठाण्यात कार्यरत आहे़ अंगावर खाकी चढली तरी मनातील शेतीशी जुळलेली नाळ त्याला नेहमी खुणावत होती. काळ्या आईशी असलेले घट्ट नाते त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. यातच २०१६ साली चांगला पाऊस झाल्याने त्याने रोपवाटिका उभी करण्याचा चंग बांधला. नुसता चंग बांधून तो थांबला नाही, तर रोपवाटिका यशस्वी करून दाखविली. 

आज त्याने एक हेक्टर ३० गुंठ्यांत आपली मोठी रोपवाटिका साकारली आहे़ त्यात तब्बल ६ लाखांवर रोपे तयार केली आहेत़ त्याच्या या धडपडीचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे़ उस्मानाबाद, लातूरसारख्या अवर्षणप्रवण भागात फळबागा जगविणे हे महाकठीण काम़ त्यामुळे अल्प पाण्यातही जगणारे फळपीक म्हणून लौकिक असलेल्या सीताफळावर विजयने लक्ष्य केंद्रित केले आहे़ त्यावर चांगली मेहनत घेतल्याने नुकतीच त्याची सीताफळाची रोपे केनियातील शेतकऱ्यांनी मागवून घेतली आहेत़ पुण्यात झालेल्या कृषी प्रदर्शनात त्याने ही रोपे ठेवली होती़ तेथूनच्या विजयने ग्लोबल मार्केटला गवसणी घालण्यास सुरुवात केली आहे़ 

मी विकसित केलेले सीताफळ हे साधारणत: गावरान सीताफळाचा सीझन संपल्यानंतर येते़ नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत हे फळ बाजारात नेता येते़ त्यामुळे चांगला भाव मिळतो़ मुंबईच्या बाजारपेठेत मी ही सीताफळे इतक्यातच २०० ते २५० रुपये कि.ग्रॅ. दराने विकली आहेत़ यामुळे शेतकऱ्यांचाही चांगला फायदा होत आहे. कोणतेही काम जिद्दीने केले, तर ते पूर्णत्वास जाऊन यश नक्कीच मिळते, असे विजय गिरी याने सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती