शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : गुढीवर कोरोनाची वक्र दृष्टी; शंभो महादेव मंदिरातील शेकडो वर्षांची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 12:17 IST

शंभो महादेवाच्या मंदीराला ही संचारबंदी लागू झाल्यापासुन कुलूप लावण्यात आले आहे. 

ठळक मुद्देगावात उभारली जातेय एकच गुढी

- बालाजी बिराजदार लोहारा (जि.उस्मानाबाद) : शेकडो वर्षापासून तालुक्यातील भातागळी गावात चैत्र शुध्द प्रतिपदेला म्हणजे गुढी पाडव्याला संपूर्ण गावातर्फे एकच गुढी म्हणजे महादेवाची काठी महादेव मंदीरात उभारली जाते. शंभु महादेवाची अर्धागिनी असलेल्या पार्वतीचा अवतार समजून काटीची प्रतिकात्मक प्रतिष्ठापना करण्यात येते. पण या परंपरेला प्रथम कोरोनामुळे खंड पडला आहे. त्यात शंभो महादेवाच्या मंदीराला ही संचारबंदी लागू झाल्यापासुन कुलूप लावण्यात आले आहे.            

तेरणा नदीच्या काठावर वसलेले लोहारा तालुक्यातील भातागळी हे गाव गावात दर वर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी गावात कोणाच्याच घरासमोर गुढी उभारण्याची परंपरा नाही. गावची गुढी एकच ती म्हणजे शंभो महादेवाची काठी उभारली जाते. ही काठी सायंकाळी सहाच्या सुमारास उभारण्यात येते. व या गावातील भक्त गुढी पाडव्यानंतर तिसऱ्या दिवशी  शकडो भक्तमंडळी या महादेवाच्या काठीबरोबर पायी चालच ही शंभो महादेवाची काठी घेवून शिखर शिंगणापूरला जातात. साधारण भातागळी ते शिखर शिंगणापूर हे अंतर २५० किमीचे आहे. दररोज ४० किमीचा पायी प्रवास करत भक्त हे अंतर सहा दिवसात पूर्ण करतात. ही काठी भातागळी, लोहारा, उस्मनाबाद, सोलापुर, पुणे,सातारा जिल्ह्यातून शिंगणापूर जातात. ही काठी शिखर शिंगणापूरात मानाची काठी आहे. ही काठी परत भातागळी गावात आल्यानंतर गुढी पाडव्यानंतर येणाऱ्या पोर्णिमेला येते. या दिवशी काठीच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव व परीसरातील भक्त मोठ्यासंख्येने हजेरी लावतात. यात महीला भक्तांची संख्या लक्षणीय असते. या दिवशी पासून मोठी यात्रा भरते ही यात्रा तीन दिवस असते.

या यात्रेसाठी जे गावातील नागरीक काम धंद्यासाठी, नोकरीला बाहेर गावी गेले आहेत. ते गावाकडे येतात.नवस बोललेले भाविक या यात्रे दरम्यान नवस फेडतात. परीसरातील भाविक ही मोठ्याप्रमाणात यात्रेस येतात. पण शेकडो वर्षाच्या इतिहासात प्रथमच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व धार्मिक,यात्रा यासह आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे भातागळी गावात गुढी पाडव्याला संपुर्ण गावात एकच गुढी उभारली जाते. ती आज उभारली गेली नाही. त्यात मंदीराला संचारबंदी लागल्यापासुन कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक जण घरातच पुजाआर्चा करत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOsmanabadउस्मानाबाद