शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

coronavirus : गुढीवर कोरोनाची वक्र दृष्टी; शंभो महादेव मंदिरातील शेकडो वर्षांची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 12:17 IST

शंभो महादेवाच्या मंदीराला ही संचारबंदी लागू झाल्यापासुन कुलूप लावण्यात आले आहे. 

ठळक मुद्देगावात उभारली जातेय एकच गुढी

- बालाजी बिराजदार लोहारा (जि.उस्मानाबाद) : शेकडो वर्षापासून तालुक्यातील भातागळी गावात चैत्र शुध्द प्रतिपदेला म्हणजे गुढी पाडव्याला संपूर्ण गावातर्फे एकच गुढी म्हणजे महादेवाची काठी महादेव मंदीरात उभारली जाते. शंभु महादेवाची अर्धागिनी असलेल्या पार्वतीचा अवतार समजून काटीची प्रतिकात्मक प्रतिष्ठापना करण्यात येते. पण या परंपरेला प्रथम कोरोनामुळे खंड पडला आहे. त्यात शंभो महादेवाच्या मंदीराला ही संचारबंदी लागू झाल्यापासुन कुलूप लावण्यात आले आहे.            

तेरणा नदीच्या काठावर वसलेले लोहारा तालुक्यातील भातागळी हे गाव गावात दर वर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी गावात कोणाच्याच घरासमोर गुढी उभारण्याची परंपरा नाही. गावची गुढी एकच ती म्हणजे शंभो महादेवाची काठी उभारली जाते. ही काठी सायंकाळी सहाच्या सुमारास उभारण्यात येते. व या गावातील भक्त गुढी पाडव्यानंतर तिसऱ्या दिवशी  शकडो भक्तमंडळी या महादेवाच्या काठीबरोबर पायी चालच ही शंभो महादेवाची काठी घेवून शिखर शिंगणापूरला जातात. साधारण भातागळी ते शिखर शिंगणापूर हे अंतर २५० किमीचे आहे. दररोज ४० किमीचा पायी प्रवास करत भक्त हे अंतर सहा दिवसात पूर्ण करतात. ही काठी भातागळी, लोहारा, उस्मनाबाद, सोलापुर, पुणे,सातारा जिल्ह्यातून शिंगणापूर जातात. ही काठी शिखर शिंगणापूरात मानाची काठी आहे. ही काठी परत भातागळी गावात आल्यानंतर गुढी पाडव्यानंतर येणाऱ्या पोर्णिमेला येते. या दिवशी काठीच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव व परीसरातील भक्त मोठ्यासंख्येने हजेरी लावतात. यात महीला भक्तांची संख्या लक्षणीय असते. या दिवशी पासून मोठी यात्रा भरते ही यात्रा तीन दिवस असते.

या यात्रेसाठी जे गावातील नागरीक काम धंद्यासाठी, नोकरीला बाहेर गावी गेले आहेत. ते गावाकडे येतात.नवस बोललेले भाविक या यात्रे दरम्यान नवस फेडतात. परीसरातील भाविक ही मोठ्याप्रमाणात यात्रेस येतात. पण शेकडो वर्षाच्या इतिहासात प्रथमच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व धार्मिक,यात्रा यासह आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे भातागळी गावात गुढी पाडव्याला संपुर्ण गावात एकच गुढी उभारली जाते. ती आज उभारली गेली नाही. त्यात मंदीराला संचारबंदी लागल्यापासुन कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक जण घरातच पुजाआर्चा करत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOsmanabadउस्मानाबाद