शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्र संकटाला गाडेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 19:58 IST

Corona Virus : उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने देशातील पहिलाच ऑक्सिजन प्रकल्प अवघ्या १७ दिवसांत उभारला आहे.

ठळक मुद्दे या प्रकल्पातून ऑक्सिजनची निर्मिती सुरू ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी उपयुक्त असल्याचा अहवाल

कळंब (जि.उस्मानाबाद) : राज्य सध्या आरोग्यविषयक संकटात आहे. अशाप्रसंगी याचे राजकारण कोणीही करू नये. उस्मानाबाद जिल्ह्यातील ऑक्सिजन प्रकल्पाच्या उभारणीत राज्यातील चारही प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे सहकार्य मिळाले आहे. हेही नसे थोडके. अडचणीच्या काळात मतभेद बाजूला ठेवत महाराष्ट्र एकत्र येतो व संकटाला गाडतो, असे उद‌्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथील व्हर्च्युअल सोहळ्यात काढले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने देशातील पहिलाच ऑक्सिजन प्रकल्प अवघ्या १७ दिवसांत उभारला आहे. या प्रकल्पातून ऑक्सिजनची निर्मिती सुरू झाली असून, हे ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी उपयुक्त असल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून मिळाल्यानंतर शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाचे व्हर्च्युअली उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनामुळे रक्तातील साखर वाढत आहे. अशावेळी साखर कारखानेच मदतीला पुढे येत आहेत, हा योगायोगच. धाराशिव कारखान्याने उभारलेला प्रकल्प हा ऑक्सिजनचा नव्हे तर जीव वाचविण्याचा आहे. राज्यात चाचण्या व बेडची संख्या वाढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. चाचणीसंदर्भात अधिक सुलभता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच या संकटावर महाराष्ट्र मात करेल, अशी आशा ठाकरे यांनी व्यक्त केली. यावेळी अजित पवार, राजेश टोपे, जयंत पाटील, शंकरराव गडाख यांनीही मनोगते व्यक्त करून कारखाना व्यवस्थापनाचे कौतुक केले.

प्रत्येक जिल्ह्यात हवेत प्रकल्प : गडकरीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लिक्विड ऑक्सिजनच्या उपलब्धतेसंदर्भातील अडचणी मांडत भविष्यातील संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजननिर्मिती करणारे असे प्रकल्प उभारावे लागतील, असे सुचविले. तसेच देशातील २० टक्के साखर इथेनॉलमध्ये उपयोगात आणल्यास ६० लाख टन साठा वापरात येईल. यामुळे गोडाउनमध्ये बसून असलेल्या साखरेवरील व्याजाचा भुर्दंड कमी होईल. याकडेही कारखान्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेOsmanabadउस्मानाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या