शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

कोरोना ढिम्म, कमीही होईना अन् वाढेनाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाने वेगवान घोडदौड केली आहे. २७ टक्के पॉझिटिव्हिटी रेट कायम राखत मे महिन्याच्या पहिल्या ...

उस्मानाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाने वेगवान घोडदौड केली आहे. २७ टक्के पॉझिटिव्हिटी रेट कायम राखत मे महिन्याच्या पहिल्या ९ दिवसांत ६ हजारांवर रुग्ण आढळून आले आहेत. बाधितांच्या तुलनेत होत असलेल्या टेस्ट पाहिल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नावापुरतेच असल्याचे पहायला मिळते. एका रुग्णामागे ४ जणांचेही ट्रेसिंग होत नाही. याचा परिणाम आजार अंगावर निघून मृत्यू वाढीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उस्मानाबाद जिल्ह्यात दररोज सातशेच्या सरासरीने रुग्ण आढळून येत आहेत. मागील महिन्यातही जवळपास हेच प्रमाण होते. लॉकडाऊन, जनता कर्फ्यू, ब्रेक दि चेन यासारखे उप्रकम राबवूनही आकडेवारीत फारसा फरक दिसून येत नाही. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या १५ दिवसांत २८ टक्के पॉझिटिव्हिटी रेटसह सुमारे ११ हजारांवर रुग्ण आढळून आले होते. तेव्हा ४० हजार चाचण्या झाल्या होत्या. तुलनेत मे महिन्याच्या पहिल्या ९ दिवसांत पॉझिटिव्हिटी रेट हा २७ टक्के इतका राहिला आहे. साडेतेवीस हजार चाचण्यांमध्ये ६ हजार ३५० रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, रुग्णांच्या आकडेवारीच्या तुलनेत होत असलेल्या चाचण्या लक्षात घेतल्यास एका रुग्णामागे चारजणांचीही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाहीये. उलट अनेक लोक स्वत:हूनच चाचण्या करून घेताना दिसत आहेत. जास्त चाचण्या हाच कोरोना संसर्ग लवकर आटोक्यात आणण्याचा एक महत्त्वाचा पर्याय सध्या आहे. मात्र, प्रतिदिन सरासरी २६०० च्या पुढे चाचण्या सरकेनात.

आरटीपीसीआरचा रेट जास्त...

मे महिन्यातील पहिल्या ९ दिवसांत जिल्ह्यात ४०३१ आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल मिळाले आहेत. यामध्ये १ हजार ७०३ इतके बाधित आढळून आले आहेत. अर्थात या चाचण्यांमधून बाधित आढळून येण्याचे प्रमाण हे (पॉझिटिव्हिटी रेट) ४२.२४ टक्के इतके आहे. दरम्यान, याच कालावधीत १९ हजार ५३० रॅपिड टेस्ट झाल्या. त्यातून ४ हजार ६४७ बाधित आढळून आले. या चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी रेट हा जवळपास २४ टक्के इतका आहे.

१ ते ९ मे...

या कालावधीत जिल्ह्यात एकूण २३ हजार ५६१ चाचण्यांचे निष्कर्ष समोर आले आहेत. यातून ६ हजार ३५० जण बाधित आढळल्याची नोंद आहे. पॉझिटिव्हिटी रेट हा जवळपास २७ टक्के इतका आहे. दरम्यान, या नऊ दिवसांत प्रतिदिन सरासरी २६१७ इतक्या चाचण्या झाल्या आहेत. १५ एप्रिल ते १ मे या कालावधीत चाचणीचे प्रमाण प्रतिदिन सरासरी २६८० इतके होते.

१५ एप्रिल ते १ मे...

या काळात ब्रेक दि चेन अभियानाचे निर्बंध लागू झाले होते. त्याआधीच्या तुलनेत चाचण्या दुप्पट वाढल्या होत्या. या एकूण १५ दिवसांत सुमारे ४० हजार २०५ चाचण्यांचे अहवाल मिळाले. त्यातून ११ हजार १७१ इतके रुग्ण आढळून आले. पॉझिटिव्हिटी रेट हा २८ टक्के इतका होता. तुलनेत सध्या हा दर १ टक्के कमी झाला आहे. मात्र, सरासरी चाचण्याही घटल्या आहेत.