शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
3
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
4
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
5
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
6
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
7
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
8
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
9
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
10
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
11
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
12
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
13
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
14
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
15
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
16
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
17
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
18
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
19
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
20
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो

वांझोटे बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांची गय केली जाणार नाही; कृषी मंत्र्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 17:01 IST

कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी संबंधित शेतकऱ्यांना धीर देत काळजी करु नका, सरकार आपल्या पाठीशी आहे. असा दिलासा दिला

ठळक मुद्देपिकाच्या उगवणक्षमतेसंदर्भात यंदा गंभीर तक्रारी समोर येत आहेत. बियाणं वांझोट ठरल्याने शेतकऱ्यांची मेहनत तर वाया गेली आहे

कळंब (जि. उस्मानाबाद) : मामा... तुम्ही काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे. महाबीज असो की अन्य कंपनी. चौकशीत जे कोणी दोषी आढळेल त्यावर कारवाई होणार, असा कडक इशारा देत वांझोट्या बियाणामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी दिलासा दिला.

कळंब तालुक्यातील प्रमूख पीक हे सोयाबीन आहे. अशा या पिकाच्या उगवणक्षमतेसंदर्भात यंदा गंभीर तक्रारी समोर येत आहेत. बियाणं वांझोट ठरल्याने शेतकऱ्यांची मेहनत तर वाया गेली आहे, शिवाय वेळ व पैसा याचाही अपव्यय झाला आहे. नुकसानीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यास्थितीत सोमवारी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी तालुक्यातील बागंरवाडी गावाचा दौरा केला. यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. सोयाबीन उगवणक्षमता संदर्भात गंभीर तक्रारी समोर येत असलेल्या बांगरवाडी येथील चांगदेव रघुनाथ बांगर या शेतकऱ्याच्या शेताची कृषी मंत्र्यांनी पाहणी केली. 

यावेळी आपल्या ६० गुंठे क्षेत्रात उगवण न झाल्याने नुकसान झाल्याचे तर गावातील इतर शेतकऱ्यांनीही गाव शिवारातील ५० टक्के क्षेत्रावर पेरणी फिरल्याने दुबार पेरणीचे संकट उभं ठाकल्याची व्यथा मांडली. यावेळी कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी संबंधित शेतकऱ्यांना धीर देत काळजी करु नका, सरकार आपल्या पाठीशी आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल. यात महाबीज असो की अन्य कोणती कंपनी, जो कोणी दोषी आहे, त्यावर कारवाई होईलच असा ईशारा देत आश्वस्त केलं.

मंत्री थेट काळ्या वावरात...सोयाबीनच्या कोठारात सोयाबीन उगवणक्षमता संदर्भात तक्रारी समोर येत आहेत. यात केवळ पेरणीचा हिशोब पकडला तर एकरी साडेपाच हजाराला शेतकरी खपला जात आहे. ही बाब ‘लोकमत’ सलग तीन दिवसांपासून मांडत आहे. दरम्यान, आज या गंभीर विषयाचे गांभीर्य लक्षात राज्याचे कृषि मंत्री दादाजी भूसे हे बांगरवाडी येथे थेट शेतकऱ्यांच्या काळ्या वावरात उतरले. याठिकाणी त्यांनी जमिनीत बिजारोपण केलेल्या व अद्याप बिंजाकूर न झालेल्या बियाण्याची पाहणी केली. कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ, खासदार, आमदार, स्थानीक शेतकरी व संबंधीत शेतकरी यांच्याशी संवाद साधला. याबद्दल समाधान व्यक्त केले जात होते.

टॅग्स :agricultureशेतीOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी