शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

वांझोटे बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांची गय केली जाणार नाही; कृषी मंत्र्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 17:01 IST

कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी संबंधित शेतकऱ्यांना धीर देत काळजी करु नका, सरकार आपल्या पाठीशी आहे. असा दिलासा दिला

ठळक मुद्देपिकाच्या उगवणक्षमतेसंदर्भात यंदा गंभीर तक्रारी समोर येत आहेत. बियाणं वांझोट ठरल्याने शेतकऱ्यांची मेहनत तर वाया गेली आहे

कळंब (जि. उस्मानाबाद) : मामा... तुम्ही काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे. महाबीज असो की अन्य कंपनी. चौकशीत जे कोणी दोषी आढळेल त्यावर कारवाई होणार, असा कडक इशारा देत वांझोट्या बियाणामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी दिलासा दिला.

कळंब तालुक्यातील प्रमूख पीक हे सोयाबीन आहे. अशा या पिकाच्या उगवणक्षमतेसंदर्भात यंदा गंभीर तक्रारी समोर येत आहेत. बियाणं वांझोट ठरल्याने शेतकऱ्यांची मेहनत तर वाया गेली आहे, शिवाय वेळ व पैसा याचाही अपव्यय झाला आहे. नुकसानीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यास्थितीत सोमवारी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी तालुक्यातील बागंरवाडी गावाचा दौरा केला. यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. सोयाबीन उगवणक्षमता संदर्भात गंभीर तक्रारी समोर येत असलेल्या बांगरवाडी येथील चांगदेव रघुनाथ बांगर या शेतकऱ्याच्या शेताची कृषी मंत्र्यांनी पाहणी केली. 

यावेळी आपल्या ६० गुंठे क्षेत्रात उगवण न झाल्याने नुकसान झाल्याचे तर गावातील इतर शेतकऱ्यांनीही गाव शिवारातील ५० टक्के क्षेत्रावर पेरणी फिरल्याने दुबार पेरणीचे संकट उभं ठाकल्याची व्यथा मांडली. यावेळी कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी संबंधित शेतकऱ्यांना धीर देत काळजी करु नका, सरकार आपल्या पाठीशी आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल. यात महाबीज असो की अन्य कोणती कंपनी, जो कोणी दोषी आहे, त्यावर कारवाई होईलच असा ईशारा देत आश्वस्त केलं.

मंत्री थेट काळ्या वावरात...सोयाबीनच्या कोठारात सोयाबीन उगवणक्षमता संदर्भात तक्रारी समोर येत आहेत. यात केवळ पेरणीचा हिशोब पकडला तर एकरी साडेपाच हजाराला शेतकरी खपला जात आहे. ही बाब ‘लोकमत’ सलग तीन दिवसांपासून मांडत आहे. दरम्यान, आज या गंभीर विषयाचे गांभीर्य लक्षात राज्याचे कृषि मंत्री दादाजी भूसे हे बांगरवाडी येथे थेट शेतकऱ्यांच्या काळ्या वावरात उतरले. याठिकाणी त्यांनी जमिनीत बिजारोपण केलेल्या व अद्याप बिंजाकूर न झालेल्या बियाण्याची पाहणी केली. कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ, खासदार, आमदार, स्थानीक शेतकरी व संबंधीत शेतकरी यांच्याशी संवाद साधला. याबद्दल समाधान व्यक्त केले जात होते.

टॅग्स :agricultureशेतीOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी