शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांना प्रभाग रचनेतील बदलांमुळे धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:38 IST

उमरगा -‘माझा वाॅर्डात संपर्क दांडगा आहे. त्यामुळे मी एकटा निवडून येण्यात काहीच अडथळा नाही’, असा ठाम विश्वास व्यक्त करीत ...

उमरगा -‘माझा वाॅर्डात संपर्क दांडगा आहे. त्यामुळे मी एकटा निवडून येण्यात काहीच अडथळा नाही’, असा ठाम विश्वास व्यक्त करीत अनेकजण स्वतच्या नावापुढे भावी नगरसेवक हे बिरूद लावण्यात यशस्वी झाले हाेते. परंतु, राज्य शासनाने अचानक वाॅर्ड रचना बदलली. तसा आदेशही काढला अन् भावी नगरसेवकांची काेंडी झाली. आता त्यांना निवडणुकीच्या पिच वरील डावपेच बदलावे लागणार आहेत. तर काहींनी ‘दाेन वाॅर्डातून मतदान घेणे माझ्यासाठी शक्य नाही’, असे म्हणत बाजूला हाेऊ लागले आहेत.

उमरगा शहरात पालिका निवडणूक अनुषंगाने गेल्या काही महिन्यांपासून सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू होती विशेषतः शिवसेनेने प्रत्येक वाॅर्ड निहाय निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने तयारी केली होती. वाॅर्डा-वाॅर्डात इच्छुक व कार्यकर्ते कामाला लागले होते. तर काँग्रेसच्या वतीनेही तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक पक्षाचे अनेक इच्छुक आपापल्या वाॅर्डात वा दुसऱ्या वाॅर्डात निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सक्रिय झाले आहेत. असे असतानाच राज्य मंत्रिमंडळाने प्रभागनिहाय निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेला एक उमेदवार एका वाॅर्डातील मतदारांवर निवडणूक जिंकू शकत नाही. प्रभागातील सर्वच वाॅर्डातून मतदान घ्यावे लागणार आहे. अनेकवेळा काही प्रभागात दाेन अथवा तीन पैकी एखादा उमेदवार जरी त्यांच्या ठाेकताळ्यात बसला नाही तरी इतरांनाही मतदान करीत नाहीत. त्यामुळे सर्वच पक्षांना जनतेच्या मनातील आणि निष्कलंक उमेदवार द्यावे लागणार आहेत. एवढेच नाही तर त्यांना राजकीय डावपेच ही बदलावे लागतील. दरम्यान, एकीकडे पक्षाची ही अवस्था असताना दुसरीकडे अनेकजण ‘स्वबळ’ अजमविण्याच्या तयारीत हाेते. काेणी तिकीट नाही दिले तरी आपण सहज निवडून ये, असा ठाम विश्वास व्यक्त करीत. अशा मंडळीला ही सरकारच्या या निर्णयाने माेठा धक्का बसला आहे.

चाैकट...

भाजपाने उचलला हाेता फायदा...

मागील निवडणुकीत प्रभाग रचनेचा सर्वात जास्त फायदा भाजपला झाला होता. तब्बल सात नगरसेवक निवडून आले होते. त्याला शिवसेनेवरील जनतेची नाराजीची किनार होती. परंतु, यावेळी तशी परिस्थिती नाही. मागील निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या प्रभाग एक मधील तीनही जागा भाजपने जिंकल्या होत्या.

प्रभाग दोनमध्ये दोन व तीन मध्ये काँग्रेसने तब्बल तीन अशा पाच जागा पटकाविल्या होत्या. प्रभाग तीन हा शिवसेनेचा गड समजला जातो. मात्र, शिवसेनेवर जनतेची नाराजी हाेती. परंतु, मागील दाेन-अडीच वर्षात सेनेकडून या भागात सक्रियता ठेवली आहे. प्रभाग एक, तीन, सहा, नऊ व दहामध्ये सेनेचे बळ अधिक आहे. त्यामुळे त्यांनीही याच पट्ट्यात अधिक लक्ष दिले आहे.

चार, पाच, सहा या प्रभागातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी भाजपाचे प्रयत्न राहतील. काॅंग्रेस कडून दाेन, तीन, सात, आठ आणि नऊ या प्रभागात जाेर लावू शकते. राष्ट्रवादीची शक्ती मर्यादित असल्याने नेमके किती उमेदवार रिंगणात उतरवितात, हे रणधुमाळी सुरू झाल्यानंतरच स्पष्ट हाेईल.