शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित खरीप पिकविमा-२०२० संदर्भात केंद्र शासन,कंपनीने ८ आठवड्यात उत्तर द्यावे, खंडपीठाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 15:06 IST

वंचित शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी आ.ज्ञानराज चौगुले यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.

लोहारा ( उस्मानाबाद) : प्रलंबित खरीप पीकविमा-२०२० च्या संदर्भात केंद्र शासन व पिक विमा कंपनीने आठ आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दिले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा खरीप-२०२० चा पिकविमा प्रलंबित आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आमदार ज्ञानराज चौगुले यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. यावर ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान खंडपीठाने वरील आदेश पारित केले. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील ९ लाख ४८ हजार ९९० शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. मात्र, केवळ ७९ हजार शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला. उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी आ.ज्ञानराज चौगुले यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. ७२ तासात पूर्वसूचना दिली नाही. हे कारण दाखवून पिक विमा कंपनीने विमा नाकारला होता. राज्य आपत्ती निवारण निधी व केंद्र आपत्ती निवारण निधी अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात भरीव अशी मदत मिळाली असून महसूल व कृषीचे नुकसान झाल्याचे पंचनामे असल्याने विमा कंपनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करून मदत नाकारू शकत नाही इत्यादी मुद्दे घेऊन आ.चौगुले यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. 

तसेच शेतकऱ्यांच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यातून दाखल झालेली एक जनहित याचिका व आ.ज्ञानराज चौगुले यांची जनहित याचिका एकत्रित करण्याचे आदेशही यावेळेस कोर्टाने दिले आहेत.आ.ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने अँड.श्रीकांत वीर व अँड.सुनिल कोळी हे काम पाहत असून त्यांना न्यायालयीन कामकाजात अनिल जगताप हे मदत करत आहेत. पुढील सुनावणी २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाOsmanabadउस्मानाबाद