शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मोठी बातमी! 'मी गेलो तरी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे'; म्हणत तरुणाने संपवलं जीवन

By चेतनकुमार धनुरे | Updated: September 6, 2023 20:36 IST

आरक्षणावर चर्चा सुरु असताना तरुणाने अचानक घेतली तळ्याकडे धाव

उमरगा (जिल्हा. धाराशिव) : मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आरोळी ठोकत गाव तलावात उडी टाकून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील माडज येथे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर गावात महसूल, पोलिस प्रशासन दाखल झाले असून, ग्रामस्थांनी एकत्र जमून मोठी घोषणाबाजी केली. 

माडज येथील किसन चंद्रकांत माने (३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शी व्यंकट गाडे व मयत तरुणाचे चुलते शिवाजी माने, ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार किसन माने हा तरुण मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी चर्चा करीत होता. बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गाडे यांच्या दुकानासमोर बसून हीच चर्चा सुरू असताना किसन याने अंगावरील कपडे काढून मी गेलो तरी तुम्हाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे ओरडत गाव तलावाकडे धाव घेतली. क्षणार्धात त्याने पाण्यात उडी टाकली. त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र गाळात फसल्याने बुडून मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर महसूल व पोलिस प्रशासन गावात दाखल झाले असून, ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मराठा आरक्षणाच्या संदर्भाने जोरदार घोषणाबाजी केली. गावात दाखल झालेले महसूलचे अधिकारी राजाराम केलुरकर यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOsmanabadउस्मानाबाद