शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

ऑक्सिजन निर्मितीत भैरवनाथचीही उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:33 AM

उस्मानाबाद : जिल्ह्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेले पेचप्रसंग व रुग्णांच्या उपचारावर झालेला विपरीत परिणाम लक्षात घेऊन साखर कारखान्यांनी ऑक्सिजन ...

उस्मानाबाद : जिल्ह्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेले पेचप्रसंग व रुग्णांच्या उपचारावर झालेला विपरीत परिणाम लक्षात घेऊन साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. आता सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्यानेही सव्वा कोटी रुपयांची गुंतवणूक करीत पुढील महिन्यापर्यंत प्लांट कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने व त्यातही ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यात तुटवड्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र, ऑक्सिजन बेडची संख्याच मर्यादित असल्याने वेळ निभावून नेला जात आहे. दरम्यान, प्रशासनाने तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन संपूर्ण जिल्हाभरात ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. यामुळे भविष्यात मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठाही आताच्या तुलनेत जास्तीचा लागणार आहे. तामलवाडीचा प्लांट वगळता उस्मानाबादला ऑक्सिजनसाठी अन्य जिल्हे व राज्यांवर अवलंबून रहावे लागत आहे. इतर जिल्ह्यातून पुरवठा थांबल्यास उस्मानाबादची अडचण होईल. मात्र, ही अडचण भविष्यात उद्भवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या हाकेस साखर कारखाने धावून येत आहेत. पहिल्यांदा धाराशिव कारखान्याने प्रकल्प उभारला. लवकरच येथून ऑक्सिजन मिळेल. यापाठोपाठ रांजणीच्या नॅचरल शुगर, पाडोळी येथील रुपामाता उद्योग समूहाने पुढाकार घेतला. आता सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्यानेही पुढाकार घेऊन आमदार तानाजी सावंत यांच्या सूचनेनुसार ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे.

२४० सिलिंडर्सची क्षमता...

भैरवनाथ कारखान्याने सव्वा कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात केली आहे. नाशिक येथील कंपनीस प्लांटच्या उभारणीचे काम सोपविले असून, येथून दररोज २४० सिलिंडर्स ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकेल. जून महिन्यात प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.