शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

छोट्या व्यापाऱ्यांवर बडगा, ई-कॉमर्सला रेड कार्पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:38 IST

उस्मानाबाद : देशात विदेशी गुंतवणूक असणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून व्यवसाय सुरू केला आहे. त्याविरुद्ध ...

उस्मानाबाद : देशात विदेशी गुंतवणूक असणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून व्यवसाय सुरू केला आहे. त्याविरुद्ध देशभरातील व्यापारी आक्रमक बनले असून, गुरुवारी उस्मानाबादेतील व्यापारी महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवून कंपन्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

देशभरातील व्यापाऱ्यांनी कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया व महासचिव प्रवीण खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली बेकायदेशीर चालणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्या व ई-कॉमर्स व्यापाराविरुद्ध आंदोलन सुरू केले आहे. त्यास पाठिंबा दर्शवीत उस्मानाबाद येथील व्यापारी महासंघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विदेशी ई-कॉमर्स कंपन्या कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. उच्च न्यायालय व अन्य न्यायालयांनीही तीव्र टिपण्या नोंदविलेल्या आहेत. तरीही केंद्र सरकारकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. एखाद्या सर्वसामान्य व्यापाऱ्याने छोटीशी चूक केली, तर प्रशासनाकडून कायद्याचा बडगा उगारला जातो. परंतु, ई-कॉमर्स कंपन्या ज्या धर्तीवर काम करत आहेत, त्यात छोटे व्यापारी भरडले जात आहेत. देशातील व्यापार देशातच राहिला पाहिजे, त्याचा लाभ देशातील उपभोक्ते, व्यापारी, उद्योजक यांना झाला पाहिजे, कोणतीही विदेशी ईस्ट इंडिया कंपनी पुन्हा देशात उभी राहू नये व व्यापार हातात घेऊ नये, याबाबतीत केंद्र सरकारने कठोर कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे महासंघाने आपल्या निवेदनातून म्हटले आहे.

निवेदन देताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे जिल्हाध्यक्ष संजय मंत्री, सचिव लक्ष्मीकांत जाधव, उपाध्यक्ष संजय मोदाणी, कोषाध्यक्ष धनंजय जेवळीकर, सदस्य विशाल थोरात, नितीन फंड व व्यापारी उपस्थित होते.