शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

उस्मानाबाद जिल्ह्यातील अख्खं गाव फणफणलंय गोचिड तापीने !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 7:21 PM

जवळपास ९०० लोकसंख्या असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कपिलापुरी गावास सध्या गोचिड तापीने त्रस्त केले आहे़

परंडा (उस्मानाबाद) : जवळपास ९०० लोकसंख्या असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कपिलापुरी गावास सध्या गोचिड तापीने त्रस्त केले आहे़ थोडथोडके नव्हे तर सातशेहून अधिक ग्रामस्थ या आजाराने फणफणले आहेत. दरम्यान, आठवडाभरात याच तापीने दोघांचा बळी गेल्याची ओरड ग्रामस्थांमधून झाल्यानंतर आज आरोग्य विभागाच्या पथकाने गावात जावून रक्त तपासणी सुरु केली आहे़

गेल्या दहा दिवसापासून कपिलापुरी गावातील ग्रामस्थ तापीने आजारी पडत आहेत़ एकापाठोपाठ अशा तब्बल सातशेहून जास्त ग्रामस्थंना या आजाराने घेरले आहे़ परंडा शहरातील सर्वच खाजगी आणि सरकारी दवाखान्यामध्ये कपिलापुरीतील रुग्णांची अधिक गर्दी झाली आहे़ त्यातच आठवडाभरात गावातील दोन रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे़शिवाय, दोघे गंभीर असून, त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़ सबंध गाव तापीने फणफणले असतानाही आरोग्य विभागाने लक्ष दिले नसल्याचाही आरोप ग्रामस्थ बाळासाहेब पाटील यांनी केला़

दरम्यान, ही बाब आमदार राहुल मोटे यांना समजताच त्यांनी जिल्हा आरोग्य अधिका-यांना संपर्क करुन पथक पाठविण्याच्या सूचना केल्या़ यानंतर बुधवारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जहूर सय्यद, आसू प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय आधिकारी डॉ. महमंद साचे यांच्यासमवेत आरोग्य पथक कपिलापुरीत दाखल झाले. त्यांनी गावाची पाहणी करुन अबेटिंग केले़ तसेच ग्रामस्थांच्या रक्ताच्या नमुने तपासणीसाठी घेतले आहेत़ एका पथकाद्वारे गावातच उपचार सुरु करण्यात आले आहेत़ तूर्त ग्रामस्थांनी परिसर स्वच्छ ठेवावा व पशुधन घरापासून दूर बांधावेत, अशा सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत़

असा होतो संसर्ग...कपिलापुरी गावात बहुतांश घरासमोर गोठे आहेत़ त्यातील पशुधनावर गोचिड बसतात़ हे गोचिड इन्फेक्टेड झाले व त्यांनी मानवास चावा घेतला की या तापीचा संसर्ग होतो़ हा आजार चिकुन गुणियासदृश्यच आहे़ दोन्ही आजारातील लक्षणात साम्य आहे़ गावात झालेल्या दोन मृत्यूचा या आजाराशी संबंध नाही़ गोचिड तापीने मणुष्य मृत्युमुखी पडण्याची शक्यता फार कमी असते, असे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़जहूर सय्यद यांनी सांगितले़

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय