शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

मुबलक पाण्यामुळे ऊस क्षेत्र दुप्पटीने वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : मागील दोन तीन वर्षांपूर्वी पाण्याची कमतरता आणि पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र कमालीचे घटले होते. यंदा जिल्ह्यात ...

उस्मानाबाद : मागील दोन तीन वर्षांपूर्वी पाण्याची कमतरता आणि पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र कमालीचे घटले होते. यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांनी ऊस लागवड करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात उसाचे सर्वसाधारण लागवड क्षेत्र ३५ हजार ६६५ हेक्‍टर आहे. गतवर्षी २८ हजार ३७० हेक्‍टरवर लागवड झाली होती. यंदाच्या गाळप हंगामासाठी ऊस क्षेत्रात सुमारे ३७ हजार हेक्‍टरने वाढ झाली आहे मांजरा, तेरणा, बोरी, बाणगंगा, मन्याड, तावरजा आणि सीना या नद्यांच्या वास्तव्याने जिल्ह्यातील जमीन सुपीक बनली आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी नदीकाठचा भाग ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जात होता. मात्र सतत अवर्षण परिस्थिती निर्माण होत असल्याने नद्यांमध्ये पाणी शिल्लक राहिले नाही. पाण्याचा प्रश्न गंभीर होत गेला आणि बागायती पिकांऐवजी कमी कालावधीत येणाऱ्या आणि जिरायती पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला होता. निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मागच्या काही वर्षांपासून सोयाबीन, गहू, ज्वारी, हरभरा या पिकांची अधिक प्रमाणात लागवड केली जात होती. मात्र आता हळूहळू हे चित्र बदलत आहेत.

यावर्षीच्या हंगामात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिके बाधित झाली. त्याचबरोबर दुसरीकडे प्रकल्पांमध्ये जलसाठा निर्माण झाला असून, भूजल पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. एकंदर जिल्ह्यात शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. याच पाणीसाठ्याच्या भरवशावर बागायती पीक उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. जिल्ह्यातील ऊस क्षेत्राच्या अहवालावरून ही बाब आता स्पष्ट होत आहे. २०१९-२०२० च्या हंगामात जिल्ह्यात २९ हजार ३७० हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. ती आता यावर्षी ६६ हजार ९३७ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली आहे. याचाच अर्थ उपलब्ध पाण्यामुळे ऊस लागवडीचे ३७ हजार ५६६ हेक्टर क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ अपेक्षित आहे. मात्र, उसासाठी भरमसाठ पाण्याचा उपसा होत आहे.

चौकट...

तालुकानिहाय २०२१-२०२२ मध्ये गाळपाला येणारे क्षेत्र हे.

तालुका क्षेत्र

उस्मानाबाद - १८,६५५

तुळजापूर- ४४,६६

उमरगा- ९,१०५

लोहारा- ३,१७७

भूम- १,८४०

परंडा- १४,८११

वाशी- १३,४४३

कोट...

जिल्ह्याचे उसाचे सर्वसाधारण क्षेत्र ३५ हजार हेक्टरच्या जवळपास आहे. २०१९-२०२० मध्ये २९ हजार ३७० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. यावर्षी पाऊस चांगला झाला. त्यामुळे २०२०-२०२१ या वर्षात ६६ हजार ९३७ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. एका एकर ऊस क्षेत्राला ८० लाख लिटर पाण्याची गरज लागत असते. या पाण्यावरच इतर दहा एकर बागायती पिकांचे उत्पादन मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी इतर पिकेही घेणे गरजेचे आहे.

उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी