शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जेष्ठांना घरपोच ‘प्रेमाचा टिफिन’; तांदूळवाडी ग्रामपंचायतीचा अन्नछत्रातून स्तुत्य उपक्रम

By गणेश कुलकर्णी | Updated: August 17, 2023 17:51 IST

निराधार, जेष्ठांना घरपोच जेवणाचा डब्बा देण्याचा राज्यातील पहिला उपक्रम

धाराशिव : वयाची ‘साठी’ पार केल्यावर हातात वृद्धत्वाची ‘काठी’ येते असे म्हणतात. शाब्दिक अर्थ बाजूला ठेवला तरी, जीवनप्रवास ‘उतरतीला’ लागलाय! असाच यातला संदेश. मग, कोणाची भरल्या घरात परवड होते, कोणाचा ‘आधार’ कामधंद्यासाठी स्थलांतरित झालेला असतो तर कुणी ‘निराधार’ म्हणून आलेला दिवस काढत असतात. कळंब तालुक्यातील तांदूळवाडी येथील अशा ग्रामस्थांना आता दररोज ‘प्रेमाचा टिफिन’ मिळणार असून, निराधार वयस्कांसाठी अन्नछत्र चालवणारी तांदूळवाडी ही राज्यातील एकमेव ग्रामपंचायत ठरणार आहे.

कळंब शहराला खेटलेलं तांदूळवाडी हे छोटसं गाव. साधारणत: अडीचशे उंबरठे, दीडेक हजार लोकसंख्या. अशातच गावच्या सरपंचकीची धुरा तरुण, उच्च शिक्षित ॲड. प्रणित शामराव डिकले यांच्या खांद्यावर आली. सर्वांना सोबत घेत, राजकारणाचे जोडे बाजूला ठेवत ‘सर्वांगीण विकास’ हाच विषय सध्या ग्रा.पं.च्या अजेंड्यावर. याविषयी सरपंच ॲड. प्रणित डिकले सांगतात. मित्र आनंद काळे यांनी ज्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, ज्यांना श्रम होत नाही, हाताने स्वयंपाक करता येत नाही, असे काही वयस्क आहेत, असे सांगितले होते. यातूनच मदतीची गरज असलेल्या, हाताने स्वयंपाक करणे शक्य नसलेल्या वयस्कांना किमान दोन वेळचे भोजन देण्याचा संकल्प करण्यात आला.

गावातील अशा वयस्कांची संख्या, त्यांची स्थिती, त्यांना लागणारे अन्न, त्यासाठी चालविले जाणारे अन्नछत्र, त्याचा शिधा, मनुष्यबळ, आर्थिक बाजू यावर अभ्यास करून ग्रामनिधी व लोकसहभागातून सत्तरी पार केलेल्या वयस्कांसाठी दोन वेळचे जेवण पुरवणारा उपक्रम बांधला गेला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत ग्रामस्थांच्या उपस्थितीत या अन्नछत्राचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी गावातील १६ वयस्कांनी या ‘प्रेमाचा टिफिन’चा आस्वाद घेतला. पुढे समस्त ग्रामस्थांच्या सहयोगातून कायमस्वरूपी हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे सरपंच ॲड. डिकले म्हणाल्या.

दोघींना रोजगारप्रतिमाह तीन हजार मानधनावर स्वयंपाकासाठी नियुक्त केलेल्या दोन महिलांच्या हातून वयस्कांना दोन वेळचे भोजन तर मिळणार आहे, शिवाय दोघींना रोजगारही उपलब्ध झाला आहे.

घरापर्यंत डबायात संबंधित वयस्कांचे संमतीपत्र घेतले जातेय. भोजन अन्नछत्रात किंवा घरी नेऊनही करता येणार आहे. ज्यांना शक्य नाही, त्यांच्या घरापर्यंत डबा पोहाेच करण्याची तजवीज ठेवली आहे.

अनेकांची मदतग्रामनिधी, लोकसहभागावर बेतलेल्या राज्यातील या पहिल्याच उपक्रमासाठी शाळेतील गुरुजींनी पाच हजारांची मदत दिली. तर एका अनामिकाने एक क्विंटल गहू, ५० किलो तांदूळ आणून दिले.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादgram panchayatग्राम पंचायत