शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्यासाठी ४० हजारांवर अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ३,८१,५८४ शेतकरी हक्काच्या पीकविम्यापासून आजही वंचित असून, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकांकडे मागणी अर्ज द्यावेत तसेच स्थानिक ...

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ३,८१,५८४ शेतकरी हक्काच्या पीकविम्यापासून आजही वंचित असून, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकांकडे मागणी अर्ज द्यावेत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांकडे पाठवावेत, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले होते. यास प्रतिसाद देत आतापर्यंत चाळीस हजारावर शेतकऱ्यांचे अर्ज कृषी विभागाकडे धडकले आहेत. शिवाय, तुळजापूर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींनी ठराव पाठविले असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांचा जन्मदिवस राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कै. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस अभिवादन करत विविध मार्गाने आपण बळीराजाचा सन्मान करत असतो. परंतु, मागील सहा महिन्यांपासून खरीप २०२० मधील हक्काचा पीकविमा मिळावा यासाठी शेतकरी सरकारला आर्त साद घालत असताना अजूनही जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ५८४ शेतकरी हक्काच्या पीक विम्यापासून वंचित आहेत. सातत्याने पाठपुरावा करूनदेखील या विषयी विमा कंपनी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत साधी बैठकही बोलविली जात नाही.

दरम्यान, राज्य सरकारने नुकसान झाल्याचे मान्य करत अनुदान दिले, परंतु विमा भरपाईबाबत मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रयत्न करूनदेखील उर्वरित शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता न्यायालयीन रणनीती म्हणून अनुदान मिळालेल्या परंतु विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित कृषी सहाय्यकाकडे मागणी अर्ज देऊन रितसर पोहच घ्यावी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना पाठवावेत, असे आवाहन आ. पाटील यांनी शेतकऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना केले होते. याला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ४० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आतापर्यंत कृषी सहाय्यकांकडे अर्ज केले आहेत. शिवाय, अनेक ग्रामपंचायतीने ठराव घेतले आहेत. विशेषतः तुळजापूर तालुक्यातील सर्वच १०८ ग्रामपंचायतींनी ठराव घेत शेतकऱ्यांच्या हक्काची नुकसान भरपाई देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केले आहे. उर्वरित ग्रामपंचायतींनी ठराव घेण्याचे व शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाकडे लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

चौकट.........

पुढील काळात तीव्र लढा उभारणार

उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ८०% शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा खरीप २०२० हंगामातील प्रलंबित पीकविमा अजूनही मिळाला नाही. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून या कृषीदिनी राज्य सरकारने बळीराजाच्या आर्त सादेला प्रतिसाद न दिल्यास पुढील काळात तीव्र लढा उभारण्याचा इशारा आ. पाटील यांनी दिला आहे.

--------------

[फोटो कॅप्शन : ग्रामपंचायत ठरावांच्या प्रती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे सुपुर्द करताना तुळजापूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते.]