शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

पीकविम्यासाठी ४० हजारांवर अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ३,८१,५८४ शेतकरी हक्काच्या पीकविम्यापासून आजही वंचित असून, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकांकडे मागणी अर्ज द्यावेत तसेच स्थानिक ...

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ३,८१,५८४ शेतकरी हक्काच्या पीकविम्यापासून आजही वंचित असून, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकांकडे मागणी अर्ज द्यावेत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांकडे पाठवावेत, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले होते. यास प्रतिसाद देत आतापर्यंत चाळीस हजारावर शेतकऱ्यांचे अर्ज कृषी विभागाकडे धडकले आहेत. शिवाय, तुळजापूर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींनी ठराव पाठविले असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांचा जन्मदिवस राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कै. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस अभिवादन करत विविध मार्गाने आपण बळीराजाचा सन्मान करत असतो. परंतु, मागील सहा महिन्यांपासून खरीप २०२० मधील हक्काचा पीकविमा मिळावा यासाठी शेतकरी सरकारला आर्त साद घालत असताना अजूनही जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ५८४ शेतकरी हक्काच्या पीक विम्यापासून वंचित आहेत. सातत्याने पाठपुरावा करूनदेखील या विषयी विमा कंपनी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत साधी बैठकही बोलविली जात नाही.

दरम्यान, राज्य सरकारने नुकसान झाल्याचे मान्य करत अनुदान दिले, परंतु विमा भरपाईबाबत मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रयत्न करूनदेखील उर्वरित शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता न्यायालयीन रणनीती म्हणून अनुदान मिळालेल्या परंतु विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित कृषी सहाय्यकाकडे मागणी अर्ज देऊन रितसर पोहच घ्यावी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना पाठवावेत, असे आवाहन आ. पाटील यांनी शेतकऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना केले होते. याला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ४० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आतापर्यंत कृषी सहाय्यकांकडे अर्ज केले आहेत. शिवाय, अनेक ग्रामपंचायतीने ठराव घेतले आहेत. विशेषतः तुळजापूर तालुक्यातील सर्वच १०८ ग्रामपंचायतींनी ठराव घेत शेतकऱ्यांच्या हक्काची नुकसान भरपाई देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केले आहे. उर्वरित ग्रामपंचायतींनी ठराव घेण्याचे व शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाकडे लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

चौकट.........

पुढील काळात तीव्र लढा उभारणार

उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ८०% शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा खरीप २०२० हंगामातील प्रलंबित पीकविमा अजूनही मिळाला नाही. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून या कृषीदिनी राज्य सरकारने बळीराजाच्या आर्त सादेला प्रतिसाद न दिल्यास पुढील काळात तीव्र लढा उभारण्याचा इशारा आ. पाटील यांनी दिला आहे.

--------------

[फोटो कॅप्शन : ग्रामपंचायत ठरावांच्या प्रती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे सुपुर्द करताना तुळजापूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते.]