शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

‘जलजीवन’मधून ९९३ पाणी याेजनेसाठी ३७३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:33 IST

उस्मानाबाद - केंद्र सरकारच्या महत्वाकांशी जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ७२० गावे आणि २७३ वाड्यांवर प्रती व्यक्ती ५५ लिटर याप्रमाणे ...

उस्मानाबाद - केंद्र सरकारच्या महत्वाकांशी जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ७२० गावे आणि २७३ वाड्यांवर प्रती व्यक्ती ५५ लिटर याप्रमाणे नळाद्वारे पाणी पोहाेंचविण्यासाठी ३७३ कोटी १० लाख रूपयांचा आराखडा मंजुर करण्यातआला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व गावांपर्यंत आणि प्रत्येक व्यक्तीला नळाद्वारे शुद्ध, शाश्‍वत पाणी पुरवठा

केला जाणार आहे.

यावेळी माजी जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, सभापती दत्तात्रय देवळकर, दत्ता साळुंके,

पंडीत टेकाळे, जि.प. सदस्य बारकुल, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता देवकर उपस्थित होते.

अस्मिता कांबळे म्हणाल्या की, जिल्ह्यातील ज्या गावात आजपर्यंत कसलीही पाणीपुरवठा योजना नव्हती किंवा ज्या गावात पाणी पुरवठा योजना होती, त्या गावात वाढीव क्षमतेने योजना राबविली जाणार आहे. या योजनेत वैयक्तीक नळ जोडणीवर भर दिला जाणार आहे. २७३ गावे आणि वस्त्यांवर शाश्‍वत पाणी पुरवठा करण्यासाठी सोलार पंप योजना या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तर २५५ गावांत पाणी पुरवठा योजनांचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यासाठी वाढीव पाणी टाकी बांधण्यात येणार आहेत. २९४ गावांत प्रती व्यक्ती ५५ लिटर क्षमतेने पाणी नळाद्वारे पुरविण्यासाठी तर १३९ पाणी पुरवठा योजना नसलेल्या किंवा अर्धवट पाणी पुरवठा असलेल्या गावात त्या गावातील लोकसंख्या आणि त्या गावात सण, यात्रा, उत्सव, आठवडी बाजार किंवा इतर प्रासंगिक कारणाने वाढीव लोकसंख्या गृहीत धरून नवीन पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार आहेत. ३२ गावांत पहिल्यांदाच पाणी पुरवठा योजना राबविण्याचे या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहे. पहिल्या

टप्प्यात या योजनेतील सर्व योजनांचा सर्वे करण्यात येणार असून सन २०२३-२४ पर्यंत ही योजना पूर्ण करण्यात

येणार आहे. या योजनेला वाॅटरग्रीड योजनेची जोड देण्याची गरज असून जिल्ह्यातील सर्व प्रादेशिक पाणी पुरवठा

योजना असलेल्या गावांना या जलजीवन मिशन मधून स्वंतत्र पाणी पुरवठा योजना मिळून न्याय देता आला याचे

समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट....

सतत दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या आणि विकासाच्या बाबतीत आकांक्षित असलेल्या आपल्या जिल्ह्याला निधी

देताना राज्य सरकारचा हात नेहमीच आखडता राहिला आहे. जिल्हा परिषदेला पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल

दुरूस्तीसाठी केंद्र सरकारचा निधी आला. परंतु राज्याचा निधी आलाच नाही, शेवटी जिल्हा परिषदेने स्व-निधीतून

व्यवस्था केली, असे सांगताना जिल्हा परिषदेला पाणी, शिक्षण आणि आरोग्य याविषयी निधी देताना

राज्य सरकारचे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याची टिका, जि.प. अध्यक्षा कांबळे यांनी केली.