शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद जिल्ह्यात तयार झाले २५०० शेततळे; मात्र अस्तरीकरण झाले केवळ २३७ चे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 18:19 IST

मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत गत तीन वर्षात तब्बल २५०० शेततळी तयार करण्यात आली़

ठळक मुद्देतुटपुंजे अनुदान असल्याने मर्यादा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष

उस्मानाबाद : शासनाच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत गत तीन वर्षात तब्बल २५०० शेततळी तयार करण्यात आली़ मात्र, या शेततळ्यावरील महत्त्वाचा भाग असलेल्या अस्तरीकरणाचे काम केवळ २३७ शेततळ्यांचे झाले आहे़ अपुरे अनुदान आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे ही कामे अपूर्ण दिसत आहेत़

शेतकयांना सतत दुष्काळाला तोंड द्यावे लागत असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत़ पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे़ त्याचा पिकांवर परिणाम होत आहे़ शेती उत्पादनात शाश्वतता आणण्यासाठी तसेच नैसर्गिक दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य सरकारने मागेल त्याला शेततळे योजना राबविली आहे़ प्रत्येक शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत शेततळे योजनेचा लाभ देण्यात येतो़ परंतु कागदाची जुळवाजुळव, अटी, नियमांनमुळे अनेक शेतकरी हैराण होतात़ त्यातच शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे ५० हजार व प्लास्टिक अस्तरीकरण ७५ हजार असे मिळून १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत मागेल त्याला शेततळे देण्याची योजना आहे़

राष्ट्रीय कृषी विकास योजना व राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या अंतर्गत शेतकºयांना वयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजना दिली होती़ मात्र आॅनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर अनेक शेतक-यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. परंतु या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे़ गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात ३७०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यापैकी अद्यापर्यंत २ हजार ५२० शेततळी पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे़ त्या शेततळ्यापैकी वैयक्तिक शेततळ्यामध्ये आजवर केवळ २३७ शेतकऱ्यांनीच अस्तरीकरण केल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीOsmanabadउस्मानाबाद