शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

२३ हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

By admin | Updated: February 27, 2017 00:25 IST

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात पाचवी आणि आठवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात पाचवी आणि आठवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. रविवारी झालेल्या या परीक्षेला जिल्हाभरातून सुमारे २३ हजार ३१४ विद्यार्थी बसले होते. तर ७२१ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला गैैरहजर राहिले. परीक्षेदरम्यान कुठल्याही स्वरूपाचा गैैरप्रकार होवू नये, यासाठी प्रत्येक केंद्रावर बैठे पथके तैैनात केली होती. यासोबतच भरारी पथकांनीही परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.उच्च प्राथमिक (पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र असलेल्या जिल्हाभरातील सुमारे १४ हजार २९६ तर पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ९ हजार ७३९ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने नोंदणी केली होती. उपरोक्त विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेवून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून सुमारे १६३ परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये उस्मानाबाद (ग्रामीण) भागात ३३, उस्मानाबाद शहरामध्ये ०९, तुळजापूर तालुक्यात ३३, उमरगा २१, लोहारा ०९, कळंब १८, वाशी ०९, भूम १५ आणि परंडा तालुक्यातील १७ केंद्रांचा समावेश होता. उपरोक्त सर्व केंद्रावर रविवारी सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरूवात झाली, असता प्रत्यक्षात २३ हजार ३१४ विद्यार्थी परीक्षेला बसले. उर्वरित ७२१ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. ही परीक्षा सुरळीत आणि पारदर्शी वातावरणात व्हावी, यासाठी शिक्षण विभागाकडून तगडे नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक केंद्रावर एक बैैठके पथक तैैनात करण्यात आले होते. यासोबतच आठ भरारी पथकांची नियुक्तीही करण्यात आली होती. या पथकाने परीक्षा केंद्रांना अचानक भेटी दिल्या. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच काही परीक्षा केंद्रावर पोलिस कर्मचारीही तैैनात करण्यात आले होते. या नियोजनामुळे सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली, असे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितले.