शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बेदम मारहाण करून युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 21:27 IST

आईला शिवीगाळ करण्यास मनाई केल्यामुळे एका युवकाला बेदम मारहाण करून जिवे मारल्याची घटना शांतीनगर ठाण्यांतर्गत घडली.

ठळक मुद्देआरोपीला अटक : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आईला शिवीगाळ करण्यास मनाई केल्यामुळे एका युवकाला बेदम मारहाण करून जिवे मारल्याची घटना शांतीनगर ठाण्यांतर्गत घडली.सागर खुशाल डाबरे (२६) असे मृताचे नाव आहे. तर आरोपी वीरू गुणवंत चांदेकर (३२) रा. लालगंज हा आहे. सागर किराणा दुकानात काम करीत होता. त्याच्या कुटुंबात आई आणि लहान भाऊ आहे. सागरच्या आईची मानसिक स्थिती ठीक नाही. त्याने दोन महिन्यांपूर्वी शांतीनगर पोलिसांच्या मदतीने आपल्या आईला मनोरुग्णालयात भरती केले होते. काही दिवसांनंतर त्याच्या आईला मनोरुग्णालयातून सुटी मिळाली. ९ मार्चला दुपारी वीरूने सागरला त्याच्या आईवरून शिवीगाळ करून अपशब्द वापरले. त्याने सागरला धमकीही दिली. यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. सागरने आईला शिवीगाळ करून अपशब्द वापरण्यास मनाई केली. यामुळे वीरूने त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सागरने स्वत:ला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु मारहाणीत सागरला गंभीर दुखापत झाली. वस्तीतील नागरिकांनी सागरला खासगी रुग्णालयात पोहोचविले. तेथे त्यास मृत घोषित करण्यात आले. शांतीनगर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून वीरूला अटक केली आहे. या घटनेमुळे सागरच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्याची आई मनोरुग्ण असून भाऊ मजुरी करतो. त्यांची देखभाल करणारा कुटुंबात कोणीच नाही. किरकोळ वादातून वीरूने त्याला मारहाण केली. मारहाणीमुळे सागरच्या चेहरा, डोके, छाती आणि पोटावर गंभीर जखमा झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून