शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मौजमस्तीसाठी आलेल्या तरुणांनी केला वृद्धेचा खून, पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या 

By पंकज शेट्ये | Updated: May 17, 2024 23:55 IST

गायत्री मराठे खून प्रकरणातील आरोपी विजय आणि रवींद्र हे चुलत भाऊ आणि चांगले मित्र आहेत.

वास्को : २६ दिवसापूर्वी पिशे डोंगरी - खारीवाडा येथील ७९ वर्षीय गायत्री मराठे यांचा खून केलेल्या दोन्ही आरोपींना आंध्र प्रदेश येथून गजाआड करण्यास पोलिसांना यश आले. गोव्यात मौजमस्तीच्या उद्देशाने पहिल्यांदाच आलेल्या ३५ वर्षीय विजय लक्षिमण्णा गोरली आणि २५ वर्षीय गोरेल्ला रवींद्रा यांनी चोरीच्या उद्देशाने गायत्री यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी त्यांना पाहून गायत्री यांनी आरडा-ओरडा केल्यामुळे तिचा खून केल्याचे चौकशीत उघड झाले. 

क्राईम ब्रांच पोलिसांनी विजय याला आंध्र प्रदेशात गजाआड करून गोव्यात आणल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याची सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. दुसरा आरोपी गोरेल्ला रवींद्रा याला वास्को पोलीसांनी आंध्र प्रदेशात पकडल्यानंतर त्याला गोव्यात घेऊन येत असून शनिवारी (दि.१८) पहाटेपर्यंत ते वास्को पोलीस स्थानकावर पोचणार आहेत.

गायत्री मराठे खून प्रकरणातील आरोपी विजय आणि रवींद्र हे चुलत भाऊ आणि चांगले मित्र आहेत. १९ एप्रिलच्या रात्री ते गोव्यात फिरण्यासाठी आणि मौजमस्तीसाठी आले. ते दोघेही पहिल्यांदाच गोव्यात आले होते अशी माहिती पोलीसांना चौकशीत मिळाली आहे. १९ च्या रात्री गोव्यात आल्यानंतर ते वास्को रेल्वे स्थानकाच्या बाहेरील परिसरात झोपले. २० एप्रिलला ते पिशे डोंगरी परिसरात फिरताना त्यांना गायत्री या दिसून आस्या. त्यांनी तिच्याबाबत माहिती काढली असता तिच्या पतीचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला असून तिला मुले नसल्याने ती घरात एकटीच राहत असल्याचे त्यांना समजले. यानंतर तिच्या अंगावर सोन्याचे दागिने पाहून दोघांनीही तिच्या घरात घुसून चोरीचा बेत रचला अशी माहिती चौकशीत उघड झाल्याचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले. 

दोघांनीही गायत्री यांच्या घराच्या बाजूलाच असलेल्या ‘बार’ मध्ये बसून दारू पित तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरवात केली. २१ एप्रिलला दोघांना ती संधी मिळाल्यानंतर त्यांनी जबरदस्तीने तिच्या घरात प्रवेश केला. दोघांनीही गायत्रीच्या घरात चोरीसाठी प्रवेश केल्याचे तिने पाहताच आरडा ओरडा मारायला सुरवात केली. यानंतर दोघांनीही तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र गायत्री या आरडा ओरडा मारण्याचे बंद करत नसल्याने त्यांच्या गळ्यावर कटरने हल्ला करून खून केला. गायत्री यांच्या अंगावर सोन्याचे दागिने होते, मात्र खून केल्यानंतर भितीने आरोपींनी ते दागिने न काढता तेथून पळ काढल्याचे चौकशीत समजल्याची माहिती राहुल गुप्ता यांनी दिली. 

टॅग्स :Arrestअटक