शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

"तुझ्या आईला कुणीतरी गोळी मारलीय"; १४ वर्षीय मुलीला आला फोन, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 16:36 IST

सात वाजेपर्यंत ज्योतीने मुलीला फोन केला तोपर्यंत सर्व काही ठीक होते, मग काही वेळात काय झाले की ज्योतीला गोळी मारली हा प्रश्न मुलांना पडला आहे.

नवी दिल्ली - सात वाजण्याच्या सुमारास १४ वर्षांच्या रियाचा फोनवर मेसेज टोन वाजते. ती मेसेज चेक करते. मेसेज रियाच्या आईचा होता. 'थोड्या वेळात घरी पोहोचेन, चहा बनवून ठेव'. मेसेज वाचून थोड्या वेळाने रिया चहा बनवते, पण बराच वेळ होऊनही आई घरी परतली नाही तेव्हा ती अस्वस्थ होते. रियाची एक लहान बहीण आणि लहान भाऊ देखील घरी आईची वाट पाहत आहेत. तेवढ्यात रियाचा फोन वाजतो.

रियाने फोन उचलताच एक अनोळखी व्यक्ती तिला सांगते - 'तुझ्या आईला कोणीतरी गोळी मारली आहे' हे शब्द रियाच्या कानात घुमतात. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, तोंडातून शब्दच निघत नाहीत. ही घटना दिल्लीतील विकासपुरी आणि पीरागढ़ी भागातील आहे, जिथे दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने रियाची आई ज्योती यांना भर रस्त्यावर गोळ्या झाडल्या आणि नंतर पळून गेला. राजधानी दिल्लीत संध्याकाळी ७.३० च्या सुमारास गर्दीच्या ठिकाणी एका महिलेची हत्या करण्यात आली, मात्र मारेकऱ्याचा पत्ता लागलेला नाही. महिलेची पर्स आणि मोबाईलही घटनास्थळी पडून होता, त्यामुळे ज्योतीची हत्या दरोड्याच्या उद्देशाने झाली असावी असं म्हणता येणार नाही. मात्र, अद्याप ज्योतीच्या स्कूटीचा शोध लागलेला नाही.

मृत महिला कुरिअर कंपनीत डिलिव्हरी एजंट होतीज्योतीचा पती दीपक प्लास्टिकच्या कारखान्यात काम करतो. तीन अपत्ये असल्याने घरखर्च चालवण्यात अडचणी येत होत्या. मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी ज्योतीने पतीला मदत करण्याचा निर्णय घेतला होता. अवघ्या महिन्याभरापूर्वी तिने फ्लिपकार्टमध्ये डिलिव्हरी एजंट म्हणून नोकरी सुरू केली. आता घरची परिस्थिती चांगली होईल, मुलांना त्रास होणार नाही, या आशेवर होत्या. 

तीन मुलांच्या आईचा मारेकरी कोण?सात वाजेपर्यंत ज्योतीने मुलीला फोन केला तोपर्यंत सर्व काही ठीक होते, मग काही वेळात काय झाले की ज्योतीला गोळी मारली. तीन मुलांच्या आईचे कोण शत्रू होतं का? मुलांचे अश्रू थांबत नाहीत. त्यांच्या आईने कोणाचे काय बिघडवलं होतं? हे त्यांना समजत नाही. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ज्योती किंवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे कोणाशीही भांडण किंवा वैर नव्हते. ज्योती त्याच्या लहान कुटुंबात खूप आनंदी होत्या. छोटे छोटे क्षण आनंदाने साजरे करत होते.

घटनेवेळी स्कूटी चालवत होती महिलारोजच्या प्रमाणे ज्योती दुपारी कामाहून स्कूटीवरून घरी निघाली होती आणि संध्याकाळी तिला परतायचे होते. सकाळी ती आपल्या मुलांना शाळेत घेऊन जायची आणि नंतर त्यांना दिवसा घरी सोडायची. मुलांना घरी सोडल्यानंतरच ती कामावर निघून गेली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ज्योतीचा कोणाशीही काही संबंध नव्हता, मग तिची हत्या का झाली हा प्रश्न आहे. 

अद्याप मारेकऱ्याचा सुगावा लागलेला नाहीपोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे, मात्र अद्यापपर्यंत हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. मारेकऱ्याचाही शोध लागला नाही. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज काढण्यात आले, मात्र अद्यापपर्यंत मारेकऱ्याची ओळख पटलेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे ही घटना मीरा नगरच्या गजबजलेल्या सिग्नल परिसराच्या अगदी जवळ घडली, मात्र कोणीही गोळी झाडताना पाहिली नाही असे अनेक प्रश्न या हत्याकांडाशी निगडीत आहेत, मात्र त्याची उत्तरे अद्याप कुणालाही मिळाली नाहीत.