शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

"तुझ्या आईला कुणीतरी गोळी मारलीय"; १४ वर्षीय मुलीला आला फोन, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 16:36 IST

सात वाजेपर्यंत ज्योतीने मुलीला फोन केला तोपर्यंत सर्व काही ठीक होते, मग काही वेळात काय झाले की ज्योतीला गोळी मारली हा प्रश्न मुलांना पडला आहे.

नवी दिल्ली - सात वाजण्याच्या सुमारास १४ वर्षांच्या रियाचा फोनवर मेसेज टोन वाजते. ती मेसेज चेक करते. मेसेज रियाच्या आईचा होता. 'थोड्या वेळात घरी पोहोचेन, चहा बनवून ठेव'. मेसेज वाचून थोड्या वेळाने रिया चहा बनवते, पण बराच वेळ होऊनही आई घरी परतली नाही तेव्हा ती अस्वस्थ होते. रियाची एक लहान बहीण आणि लहान भाऊ देखील घरी आईची वाट पाहत आहेत. तेवढ्यात रियाचा फोन वाजतो.

रियाने फोन उचलताच एक अनोळखी व्यक्ती तिला सांगते - 'तुझ्या आईला कोणीतरी गोळी मारली आहे' हे शब्द रियाच्या कानात घुमतात. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, तोंडातून शब्दच निघत नाहीत. ही घटना दिल्लीतील विकासपुरी आणि पीरागढ़ी भागातील आहे, जिथे दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने रियाची आई ज्योती यांना भर रस्त्यावर गोळ्या झाडल्या आणि नंतर पळून गेला. राजधानी दिल्लीत संध्याकाळी ७.३० च्या सुमारास गर्दीच्या ठिकाणी एका महिलेची हत्या करण्यात आली, मात्र मारेकऱ्याचा पत्ता लागलेला नाही. महिलेची पर्स आणि मोबाईलही घटनास्थळी पडून होता, त्यामुळे ज्योतीची हत्या दरोड्याच्या उद्देशाने झाली असावी असं म्हणता येणार नाही. मात्र, अद्याप ज्योतीच्या स्कूटीचा शोध लागलेला नाही.

मृत महिला कुरिअर कंपनीत डिलिव्हरी एजंट होतीज्योतीचा पती दीपक प्लास्टिकच्या कारखान्यात काम करतो. तीन अपत्ये असल्याने घरखर्च चालवण्यात अडचणी येत होत्या. मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी ज्योतीने पतीला मदत करण्याचा निर्णय घेतला होता. अवघ्या महिन्याभरापूर्वी तिने फ्लिपकार्टमध्ये डिलिव्हरी एजंट म्हणून नोकरी सुरू केली. आता घरची परिस्थिती चांगली होईल, मुलांना त्रास होणार नाही, या आशेवर होत्या. 

तीन मुलांच्या आईचा मारेकरी कोण?सात वाजेपर्यंत ज्योतीने मुलीला फोन केला तोपर्यंत सर्व काही ठीक होते, मग काही वेळात काय झाले की ज्योतीला गोळी मारली. तीन मुलांच्या आईचे कोण शत्रू होतं का? मुलांचे अश्रू थांबत नाहीत. त्यांच्या आईने कोणाचे काय बिघडवलं होतं? हे त्यांना समजत नाही. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ज्योती किंवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे कोणाशीही भांडण किंवा वैर नव्हते. ज्योती त्याच्या लहान कुटुंबात खूप आनंदी होत्या. छोटे छोटे क्षण आनंदाने साजरे करत होते.

घटनेवेळी स्कूटी चालवत होती महिलारोजच्या प्रमाणे ज्योती दुपारी कामाहून स्कूटीवरून घरी निघाली होती आणि संध्याकाळी तिला परतायचे होते. सकाळी ती आपल्या मुलांना शाळेत घेऊन जायची आणि नंतर त्यांना दिवसा घरी सोडायची. मुलांना घरी सोडल्यानंतरच ती कामावर निघून गेली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ज्योतीचा कोणाशीही काही संबंध नव्हता, मग तिची हत्या का झाली हा प्रश्न आहे. 

अद्याप मारेकऱ्याचा सुगावा लागलेला नाहीपोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे, मात्र अद्यापपर्यंत हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. मारेकऱ्याचाही शोध लागला नाही. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज काढण्यात आले, मात्र अद्यापपर्यंत मारेकऱ्याची ओळख पटलेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे ही घटना मीरा नगरच्या गजबजलेल्या सिग्नल परिसराच्या अगदी जवळ घडली, मात्र कोणीही गोळी झाडताना पाहिली नाही असे अनेक प्रश्न या हत्याकांडाशी निगडीत आहेत, मात्र त्याची उत्तरे अद्याप कुणालाही मिळाली नाहीत.