शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
5
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
6
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
7
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
8
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
9
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
10
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
11
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
12
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
13
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
14
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
15
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
16
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
17
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
18
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
19
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
20
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
Daily Top 2Weekly Top 5

इराणी म्हणतायेत काय कुणाची भीती? आंबिवलीतील इराणी वस्तीची दहशत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 08:47 IST

मोस्ट वाँटेंड गुन्हेगार असलेली वस्ती म्हणून हा काबिला ओळखला जातो.  काही दिवसांपूर्वी सोनसाखळीच्या चोरी प्रकरणांमध्ये मध्य प्रदेशमध्ये वाँटेंड असलेल्या एका गुन्हेगाराला देखील येथूनच ताब्यात घेण्यात आले  होते.

- मयुरी चव्हाण

कल्याण : कल्याण नजीक असलेल्या आंबिवली रेल्वे स्थानकाजवळील  अट्टल गुन्हेगारांची  वस्ती असलेला इराणी काबीला हा नेहमीच  पोलिसांच्या  हीटलिस्ट वर राहिला आहे.काबिल्यात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर  हल्ले  होण्याचे सत्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहेत.त्यामुळे या  काबिल्यांची  दहशत मोडीत  काढताना पोलिसही हतबल  झाले आहेत. या परिसरात नुकतीच पोलिसांसमोरच दोन गटात तुंबळ  हाणामारी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे इराणी   काबिल्यांची  दहशत ही दिवसेंदिवस वाढतच असल्याची  जोरदार  चर्चा  सुरू आहे. 

मोस्ट वाँटेंड गुन्हेगार असलेली वस्ती म्हणून हा काबिला ओळखला जातो.  काही दिवसांपूर्वी सोनसाखळीच्या चोरी प्रकरणांमध्ये मध्य प्रदेशमध्ये वाँटेंड असलेल्या एका गुन्हेगाराला देखील येथूनच ताब्यात घेण्यात आले  होते. आंबिवलीमध्ये  इराणी नागरिकांनी स्वतःची घरे घेतली असून  या  ठिकाणी 200-250 घरे असल्याचा अंदाज पोलिसांनी  व्यक्त केला आहे. येथील नागरिक बलुची भाषा बोलत असल्यामुळे  कारवाईसाठी गेलेल्या  पोलिसांना  ही भाषा समजत नाही. तसेच पोलिसांकडे पाहून इराणी महिला बलुची भाषेत  अर्वाच्य शब्दही वापरतात  अशी माहितीही  समोर आली आहे.गॉगल  व इतर प्रकारचे चष्मे विकण्याचा व्यवसाय करणारे इराणी हे  सोनसाखळी व  इतर दागिनेही चलाखीने  लंपास करण्यात त्यांचा हातखंडा आहेत अट्टल सोनसाखळी  चोर  हे  चो-या करून  स्टेशनजवळ  असलेल्या  कबिल्यात लपून  बसतात. गुन्हेगारीमध्ये   बहुतांश तरुण  सक्रिय असून  उंच व  धिपाड  अशी या  तरुणांची शरीरयष्टी आहे.  

        कबिल्यातील मुलांना शिक्षणात रस नसून गुन्हेगारीत करियर करण्याकडे या नागरिकांचा ओढा आहे. समन्वय साधून पोलिसांनी येथील नागरिकांना  जीवनाच्या मुख्य  प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे सुधारण्याची संधी देऊनही काबिल्याने  ती धुडकावली.कल्याण कसारा मार्गावर सोनसाखळी चोरीच्या अनेक  घटना घडत असतात.चोरी केली की  लागलीच  स्टेशन जवळ असलेल्या काबिल्यात  चोर पळ काढतात . पोलीस कारवाईसाठी आले  तर त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी रॉकेलचे डब्बे , रॉड व इतर साहित्यही काबिल्यात उपलब्ध असते. त्यामुळे हे काबिले गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान झाले असून   काबिल्याची दहशत मोडून  काढणे हे पोलिसांसमोर  मोठे आव्हान आहे.

 दागिन्यांचा मोहसोनसाखळी चोरी करण्यात  इराणी  तरबेज आहेत. इराणी टोळ्यांना  धूम स्टाईल , हातचलाखीने महिलांचे दागिने  लंपास करण्याकडे या टोळ्यांचा अधिक कल आहे. अनेक वॉन्टेड  सोनसाखळी चोर हे आंबिवली येथील काबिल्यात राहतात.  दागिने चोरी केले किती  इराणी महिला  दागिने  विकण्याचे काम करतात. तसेच काबिल्यात पोलीस आल्यावर  त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी महिलाच पुढे जातात. त्यानंतर आरोपीना  जामीन देण्याचे  कामही महिलाच  करतात.

* घरामध्ये स्वयंपाकाचे   सामान  नाहीअनेकदा पोलिसांनी आंबिवली  येथील   इराणी वस्तीत छापा टाकल्यावर  त्यांना या ठिकाणी स्वयंपाकाचे सामान कधीच आढळून आले नाही.   इराणी नागरिक घरात  स्वयंपाक करत नसून  बाहेरच  खाद्यबभ्रमंती करत असल्याचे  पोलीस सूत्रांनी  सांगितले. विशेष म्हणजे हायफाय कॉस्मेटिक्स आणि   कपडेच  इराण्यांच्या घरात असतात.

चोरीच्या आयडिया-  हातचलाखी आणि नागरिकांना  गोंधळून  टाकणे- दागिने पॉलिश  करून देण्याचा बहाणा-  बँकेत  सावज शोधून पैसे मोजून   देण्याचा बहाणा-  दागिने पिशवी ठेवा , पुढील चौकात दंगल चालू असल्याची नागरिकांना  थाप

इराणी  काबिल्यांची दहशत ही वाढत चालली नसून कमी।झालेली आहे. गेल्या दोन तीन वर्षांत पोलीस प्रशासनाने या संदर्भात  सहा ते सात मोक्का कलम लावले आहेत. या दोन वर्षात  काबिल्यामधील  जवळपास 50 आरोपी हेे बाहेरच्या राज्याांना पकडून दिले आहेत. पोलिसांना माहिती देणारे व न देणारे असे दोन गट या इराणी वस्तीत तयारझाल्याने दोन गटात हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. - विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त, कल्याण परिमंडळ 3

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरी