शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बेपत्ता महिला जातात तरी कुठे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 09:43 IST

- मीरा बोरवणकर माजी पोलिस महासंचालक, संशोधन व विकास विभाग  शातील बेपत्ता महिलांची जाहीर झालेली आकडेवारी पाहता हा विषय ...

- मीरा बोरवणकरमाजी पोलिस महासंचालक, संशोधन व विकास विभाग 

शातील बेपत्ता महिलांची जाहीर झालेली आकडेवारी पाहता हा विषय किती गंभीर आहे, याची जाणीव होते. हा प्रश्न अतिशय संवेदनशीलपणे हाताळण्याची आवश्यकता आहे. याबाबत कोणता एक विशिष्ठ घटक कारणीभूत आहे, असे नव्हे. हा एक सामाजिक प्रश्न असून तो सोडवण्यासाठी अनेक घटकांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करण्याची गरज आहे.

महिला आणि मुली बेपत्ता होण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत हे जाणून घेत त्यातील शक्य ती नेस्तनाबूत करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी राहायला हवी. महिला आणि मुली बेपत्ता  होण्यामागे वेगवेगळी कारणे असतात. काही वैयक्तिक असतात तर काही कौटुंबिक. काही घटनांमागे गुन्हेगारीचे रॅकेट असते. बेपत्ता होण्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतात आणि त्यात काही गुन्हेगारी रॅकेटचा संबंध असेल तर त्यादृष्टीने कारवाई केली जाते. बेपत्ता झाल्यावर महिलांचा शोध घेण्यासाठी धावपळ करण्याऐवजी तसे घडणारच नाही, यासाठी काय करावे लागेल, याचा विचार आणि कृती आता व्हायला हवी.

अनेक मुली घरात नाखूश असतात. ज्याच्यासोबत तिला विवाह करायचाय त्यासाठी कुटुंब मान्यता देत नाही. त्यामुळे त्या घराचा त्याग करतात. काही महिला, मुलींना महानगरीय जीवनशैलीचे आमिष दाखवून फूस लावली जाते. शहरी समृद्धीसोबत ऑनलाइन घडामोडींचा सोशल मीडिया हेही गायब होण्याचे एक कारण बनले आहे. काही कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरतात तर काही चांगल्या जीवनाच्या शोधात घराबाहेरची वाट धरतात. जग बदलत असताना आणि मुली व महिला इंटरनेट, सोशल मीडियाचा वापर करत असताना, कुटुंबे बदललेली नाहीत. बऱ्याच मुलींना अधिक स्वातंत्र्य हवे असते. त्यामुळे त्या घरातून निघून जातात.

आता आपण एकूण आकडेवारी पाहिली तर बेपत्ता महिला तसेच मुलींचे प्रमाण धास्तावून टाकणारे आहे, हे खरे. मात्र पोलिसांना येणारा अनुभवही येथे नमूद करावा लागेल. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस त्या व्यक्तीच्या शोधासाठी प्रयत्न करतात. काही दिवसांनी त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना तिचा ठावठिकाणा समजला अथवा ती व्यक्ती परत आली तरी तसे पोलिसांना कळवून तक्रार मागे घेण्याचे कष्ट कुटुंबीयांकडून घेतले जातातच, असे नाही. तसे न झाल्यामुळे ती व्यक्ती पोलिस रेकॉर्डवर कायमचीच बेपत्ता राहते. 

समस्या हाताळण्याऐवजी... सामाजिक समस्या हाताळण्याऐवजी पोलिसांवर आरोप केले जातात आणि खूप अपेक्षाही व्यक्त केल्या जातात. शोध घेण्याची जबाबदारी पोलिसांची निश्चितच आहे; पण मुळात त्या बेपत्ताच होऊ नयेत, यासाठी समाज जबाबदारी उचलण्याची तयारी दाखवेल? पंचायत, गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरी संस्थांनी प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून त्यांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. 

मानवी तस्करीचा धोकाबेपत्ता महिला किंवा मुली पसंतीच्या पुरुष, मुलांसोबत, रेल्वेस्थानक, बस स्टँडसह सार्वजनिक अथवा खासगी ठिकाणी सापडतात. काही वेळा वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमध्ये अडकल्याचेही आढळते. अशा प्रकरणांमध्ये तरुण मुली आणि महिलांचे लैंगिक हेतूंसाठी शोषण आणि मानवी तस्करी या सर्वात धोकादायक समस्या आहेत. मुली, महिलांचे शोषण, मानवी तस्करी आदींसारखी गुन्हेगारी असेल तेव्हा पोलिसांना नक्कीच प्रतिसाद द्यावा लागतो; परंतु, ते नंतर तपासात पुढे येते.  मला वाटते की, कुटुंब आणि स्थानिक समुदायांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने अनेक कायदे केले आहेत; पण केवळ कायदे करून महिला सुरक्षित राहतीलच, असे नव्हे. उपलब्ध आकडेवारी हेच दर्शवते. 

तीन वर्षांत १३ लाख महिला बेपत्तादेशामध्ये २०१९ ते २०२२ या तीन वर्षांत

१३,००००० हून अधिक महिला बेपत्ता झाल्या. सर्वात जास्त महिला मध्य प्रदेशातील असून त्या खालोखाल पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचा क्रमांक आहे. 

अठरा वर्षाहून अधिक वयाच्या १०,६१,६४८ आणि त्याहून कमी वयाच्या 

२,५२,४३० मुली या काळात बेपत्ता झाल्या. 

१,७८,४००महिला आणि 

१३,०३३ मुली महाराष्ट्रातून बेपत्ता झाल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेत दिली आहे.

टॅग्स :Womenमहिला