शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

नक्षलवादाशी सामना करण्यासाठी अत्याधुनिक गॅजेड्स वापरावे - प्रवीण दीक्षित, माजी डीजी

By पूनम अपराज | Updated: May 3, 2019 20:31 IST

कार्यकाळात सुदैवाने महाराष्ट्रात एकही नक्षलवादी हल्ला झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

ठळक मुद्दे व्यवस्थित पेट्रोलिंग करत भूसुरुंगांची माहिती काढून गेलं पाहिजे. अत्याधुनिक तंत्राचा वापर करत पेट्रोलिंगसाठी मनुष्यबळाऐवजी गॅजेट्सचा आणि ड्रोनचा वापर करणं सोयीचं ठरू शकतं.

मुंबई - गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्री महामार्गाच्या कामासाठी आणलेली 36 वाहनं जाळली. तसेच १ मे रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास सीआरपीएफच्या क्युआरटी जवानांना घेऊन जाणाऱ्या गाड्या भूसुरुंग स्फोटात उडवल्या. यामध्ये १५ जवाना शहीद झाले आहेत तर १ वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या चालकाला देखील शहिदाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, अशा नक्षलवाद्यांची मुस्काटदाबी करण्यासाठी राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी काय - काय उपाययोजना करता येऊ शकतील हे लोकमतशी बोलताना सांगितलं. विशेषतः प्रवीण दीक्षित राज्याचे पोलीस महासंचालक (डीजी) म्हणून २०१५ ते २०१६ मध्ये कामकाज पाहत होते. या त्यांच्या कार्यकाळात सुदैवाने महाराष्ट्रात एकही नक्षलवादी हल्ला झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

१ मे रोजी झालेला नक्षलवादी हल्ला भ्याड हल्ला असून अशा नक्षलवादी हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी वाहन चालकासह पोलिसांनी देखील ज्या ठिकाणी जायचं आहे. त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती घेऊन आणि व्यवस्थित पेट्रोलिंग करत भूसुरुंगांची माहिती काढून गेलं पाहिजे. तसेच अत्याधुनिक तंत्राचा वापर करत पेट्रोलिंगसाठी मनुष्यबळाऐवजी गॅजेट्सचा आणि ड्रोनचा वापर करणं सोयीचं ठरू शकतं. ड्रोनद्वारे भूसुरुंगांची माहिती मिळू शकते असं पुढे दीक्षित यांनी सांगितलं. मी डीजी असताना गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांना भूसुरुंग डिटेक्ट करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलं होत. महत्वाचं म्हणजे तेथील स्थानिकांशी आम्ही पोलिसांसोबत सुसंवाद घडवून आणला होता. त्याची खूप आम्हाला मदत झाली होती. त्याचप्रमाणे नक्षलवादी जिल्ह्यातील कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजनांचा लाभ करून दिला होता अशी माहिती दीक्षित यांनी पुढे दिली. नंबला केशव राव उर्फ बसवराज हा या नक्षलवादी हल्ल्यामागे मास्टरमाईंड असल्याची शक्यता गडचिरोली पोलिसांनी वर्तवली आहे. 

अंबुज कॉल म्हणजे नेमकं काय ?

अंबुज कॉल हा नक्षलवाद्यांची मोडस ऑपरेंडी आहे. बहुतांश वेळा अंबुज कॉलद्वारे नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ले घडवून आणले आहेत.  अंबुज कॉल म्हणजे जिल्ह्यातील एखादा प्लांट, ट्रॅकर, गाड्या जाळपोळ करायचा. त्यानंतर नक्षलींना माहीतच असतं की पोलिसांचं पथक पंचनामा करण्यासाठी येणार. त्या अनुषंगाने सिव्हिल ड्रेसमधील सिव्हिलियन नक्षलवादी हा पोलिसांच्या पथकावर नजर ठेवून असतो. पोलीस जरी खाजगी वाहनातून आले. तरी बारीक लक्ष ठेवून असलेला सिव्हिलियन नक्षलवादी जंगलातील नक्षलवाद्यांना पथकबाबत माहिती देतो. त्यानुसार पोलिसांवर हल्ला घडवून आणला जातो. यालाच अंबुज कॉल म्हणतात. २००९ साली देखील मरकेगाव, हत्तीगोटा आणि लाहेरी येथे अंबुज कॉलद्वारे ५९ पोलीस शहीद झाले होते. या तिन्ही ठिकाणी स्टोन क्रशर आणि डांबराचे ट्रक जाळून, पंचनाम्याची आलेल्या पोलिसांच्या पथकाला नक्षलींनी टार्गेट केले होते. याचीच पुनरावृत्ती १ मे रोजी झाली. भूसुरुंग हे रस्त्याचे कामकाज सुरु असताना रस्त्याचे काम करणारे कामगार आरामासाठी गेले असताना नक्षली अंडर कन्स्ट्रक्शन रस्त्याखाली जिलेटीनचे पिंप रचले जातात. याबाबत तसूभर कल्पना कामगारांना नसते. नंतर संधी मिळेल तसा भूसुरुंग नक्षलवादी घडवून आणतात. तसेच मोठ्या नाल्यातही भूसुरुंग ठेवले जातात. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीPoliceपोलिस