शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

नक्षलवादाशी सामना करण्यासाठी अत्याधुनिक गॅजेड्स वापरावे - प्रवीण दीक्षित, माजी डीजी

By पूनम अपराज | Updated: May 3, 2019 20:31 IST

कार्यकाळात सुदैवाने महाराष्ट्रात एकही नक्षलवादी हल्ला झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

ठळक मुद्दे व्यवस्थित पेट्रोलिंग करत भूसुरुंगांची माहिती काढून गेलं पाहिजे. अत्याधुनिक तंत्राचा वापर करत पेट्रोलिंगसाठी मनुष्यबळाऐवजी गॅजेट्सचा आणि ड्रोनचा वापर करणं सोयीचं ठरू शकतं.

मुंबई - गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्री महामार्गाच्या कामासाठी आणलेली 36 वाहनं जाळली. तसेच १ मे रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास सीआरपीएफच्या क्युआरटी जवानांना घेऊन जाणाऱ्या गाड्या भूसुरुंग स्फोटात उडवल्या. यामध्ये १५ जवाना शहीद झाले आहेत तर १ वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या चालकाला देखील शहिदाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, अशा नक्षलवाद्यांची मुस्काटदाबी करण्यासाठी राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी काय - काय उपाययोजना करता येऊ शकतील हे लोकमतशी बोलताना सांगितलं. विशेषतः प्रवीण दीक्षित राज्याचे पोलीस महासंचालक (डीजी) म्हणून २०१५ ते २०१६ मध्ये कामकाज पाहत होते. या त्यांच्या कार्यकाळात सुदैवाने महाराष्ट्रात एकही नक्षलवादी हल्ला झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

१ मे रोजी झालेला नक्षलवादी हल्ला भ्याड हल्ला असून अशा नक्षलवादी हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी वाहन चालकासह पोलिसांनी देखील ज्या ठिकाणी जायचं आहे. त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती घेऊन आणि व्यवस्थित पेट्रोलिंग करत भूसुरुंगांची माहिती काढून गेलं पाहिजे. तसेच अत्याधुनिक तंत्राचा वापर करत पेट्रोलिंगसाठी मनुष्यबळाऐवजी गॅजेट्सचा आणि ड्रोनचा वापर करणं सोयीचं ठरू शकतं. ड्रोनद्वारे भूसुरुंगांची माहिती मिळू शकते असं पुढे दीक्षित यांनी सांगितलं. मी डीजी असताना गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांना भूसुरुंग डिटेक्ट करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलं होत. महत्वाचं म्हणजे तेथील स्थानिकांशी आम्ही पोलिसांसोबत सुसंवाद घडवून आणला होता. त्याची खूप आम्हाला मदत झाली होती. त्याचप्रमाणे नक्षलवादी जिल्ह्यातील कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजनांचा लाभ करून दिला होता अशी माहिती दीक्षित यांनी पुढे दिली. नंबला केशव राव उर्फ बसवराज हा या नक्षलवादी हल्ल्यामागे मास्टरमाईंड असल्याची शक्यता गडचिरोली पोलिसांनी वर्तवली आहे. 

अंबुज कॉल म्हणजे नेमकं काय ?

अंबुज कॉल हा नक्षलवाद्यांची मोडस ऑपरेंडी आहे. बहुतांश वेळा अंबुज कॉलद्वारे नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ले घडवून आणले आहेत.  अंबुज कॉल म्हणजे जिल्ह्यातील एखादा प्लांट, ट्रॅकर, गाड्या जाळपोळ करायचा. त्यानंतर नक्षलींना माहीतच असतं की पोलिसांचं पथक पंचनामा करण्यासाठी येणार. त्या अनुषंगाने सिव्हिल ड्रेसमधील सिव्हिलियन नक्षलवादी हा पोलिसांच्या पथकावर नजर ठेवून असतो. पोलीस जरी खाजगी वाहनातून आले. तरी बारीक लक्ष ठेवून असलेला सिव्हिलियन नक्षलवादी जंगलातील नक्षलवाद्यांना पथकबाबत माहिती देतो. त्यानुसार पोलिसांवर हल्ला घडवून आणला जातो. यालाच अंबुज कॉल म्हणतात. २००९ साली देखील मरकेगाव, हत्तीगोटा आणि लाहेरी येथे अंबुज कॉलद्वारे ५९ पोलीस शहीद झाले होते. या तिन्ही ठिकाणी स्टोन क्रशर आणि डांबराचे ट्रक जाळून, पंचनाम्याची आलेल्या पोलिसांच्या पथकाला नक्षलींनी टार्गेट केले होते. याचीच पुनरावृत्ती १ मे रोजी झाली. भूसुरुंग हे रस्त्याचे कामकाज सुरु असताना रस्त्याचे काम करणारे कामगार आरामासाठी गेले असताना नक्षली अंडर कन्स्ट्रक्शन रस्त्याखाली जिलेटीनचे पिंप रचले जातात. याबाबत तसूभर कल्पना कामगारांना नसते. नंतर संधी मिळेल तसा भूसुरुंग नक्षलवादी घडवून आणतात. तसेच मोठ्या नाल्यातही भूसुरुंग ठेवले जातात. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीPoliceपोलिस