शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

बारबाहेर तरुणाची शस्त्राने सपासप वार करून हत्या, दोन संशयितांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 21:02 IST

उल्हासनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देलपून बसलेल्या 7 ते 8 जणांच्या टोळक्याने दिपकला मारण्यासाठी धारदार शस्त्रासह त्याच्या पाठीमागे धावले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली

उल्हासनगर -  धीरू बारमध्ये झालेल्या क्षुल्लक वादातून ७ ते ८ जणांच्या टोळक्याने मध्यरात्री अड्डीच वाजण्याच्या दरम्यान दीपक भोईर याचा बारसमोर धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. याबाबत उल्हासनगरपोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

उल्हासनगर कॅम्प नं 3 नेहरू चौकात धीरूबार असून बारमध्ये दीपक भोईर मित्रासमावेत सोमवारी रात्री गेला होता. तेथे क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यावर तो बारमधून बाहेर पडला. त्यावेळी लपून बसलेल्या 7 ते 8 जणांच्या टोळक्याने दिपकला मारण्यासाठी धारदार शस्त्रासह त्याच्या पाठीमागे धावले. जीव मुठीत घेऊन धावणारा दीपक खाली पडताच पाठलाग करणाऱ्या टोळक्यांनी त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिपकला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकाराने शहरासह दीपक भोईर राहत असलेल्या माणेरेगाव परिसरात खळबळ उडाली. मुख्य आरोपी नरेश उर्फ बबल्या याच्यासह सहकाऱ्यांना अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा सुरवातीला कुटुंबासह नातेवाईकांनी घेतल्याने मोठा पेचप्रसंग उल्हासनगर पोलिसांसमोर उभा टाकला होता.

उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोन संशयितांना अटक केल्याची माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे यांनी दिली. तसेच संशयीत आरोपीच्या मागे पोलीस पथक असल्याचे संकेत दिले. दरम्यान शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे कारण पुढे करून शिवसेनेच्या उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोन संशयितांना अटक केल्याची माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे यांनी दिली. तसेच संशयीत आरोपीच्या मागे पोलीस पथक असल्याचे संकेत दिले. दरम्यान शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे कारण पुढे करून शिवसेनेच्या नगरसेविका वसुधा बोडारे व ज्योत्स्ना जाधव यांनी महापालिका महासभेत शहर दारूबंदीचा ठराव आणला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी सदर ठराव  बहुमताने मंजूर केल्यावर शहरातील गुन्हेगारी ऐरणीवर आली. तसेच गृहमंत्री यांना याबाबत निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. यासर्व प्रकारानंतर गुन्हेगारीची संख्या कमी झाली नाही. काही वर्षांपूर्वी धीरू बारबाहेर दोन गटातील वादातून कुकरेजा नावाच्या तरुणांची हत्या होऊन शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. तसेच हाणामारीचे प्रकार येथे सुरूच असतात.शहरात गावठी दारु, अंमली पदार्थाची विक्री, हुक्का पार्लर आदींच्या अनैतिक धंद्याचा महापूर आला आहे. यातूनच गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे  बोलले जात आहे.  तसेच रात्रभर सुरू असणाऱ्या बार, डान्स बार, महिला बार, हुक्का पार्लर सुरू असल्याने गुन्हेगारी वाढल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :Murderखूनulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसArrestअटक