शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मुंब्रा भागातून अपहरण झालेली दोन मुले सापडली माटुंगा बालगृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 21:45 IST

पालकाच्या केले स्वाधीन : ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने घेतला शोध

ठाणे : मुंब्रा येथून बेपत्ता झालेल्या अरबाज (१०) आणि अरफाद (१२) या दोन मुलांचा शोध घेण्यात ठाणे पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटला यश आले आहे. या दोघांनाही आता त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी बुधवारी दिली. ही दोन्ही मुले माटुंगा बालगृहात होती.

अरफाद आणि अरबाज ही दोन मुले मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्थानकात विना पालक बेवारसरीत्या आढळल्यानंतर त्यांना माटुंगा येथील बालगृहात ठेवल्याची माहिती या बालगृहाचे समुपदेशक तुषार रघुवंशी यांनी ४ जून २०२२ रोजी ठाण्याच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटचे हवालदार एच. एम. तळेकरला दिली होती. या दोघांच्याही पालकांचा शोध घेण्यात आला मात्र ते मिळाले नसल्याचेही रघुवंशी यांनी सांगितले. मुंब्रा पोलीस ठाण्यात या दोन मुलांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याची माहितीही समोर आली. अमृतनगर येथून त्यांचे अपहरण झाल्याचेही या तक्रारीमध्ये पालकांनी म्हटले होते.

चाईल्ड प्रोटेक्शन युनिटचे पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे, जमादार शंकर जाधव, श्यामराव कदम, हवालदार सुनील साळवी, हनुमंत तळेकर, सुधाकर चौधरी, तेजश्री शिरसाठ आणि संगीता कांबळे यांच्या पथकाने या मुलांच्या पालकांचा मुंब्य्रातील अमृतनगर भागात शोध घेतला. या मुलांच्या आईचा चार वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. इमान खान (३९) हे त्यांचे वडील असल्याची बाब चौकशीमध्ये समोर आली.फोटोवरून ही दोन्ही मुले आपलीच असल्याचेही त्यांनी ओळखले. खात्री झाल्यानंतर पोलीस हवालदार सुनील साळवी यांनी माटुंगा येथील बालगृहाचे समुपदेशक रघुवंशी यांना व्हिडिओ कॉल करून त्याद्वारे मुले आणि वडिलांची भेट घडवून आणली. तेव्हा ही मुले त्यांचीच असल्याची खात्री पटली.

बेपत्ता झाल्याचे कारण अस्पष्टचाईल्ड प्रोटेक्शन युनिटने मुंबईच्या डोंगरी येथील बालकल्याण समितीकडे कागदपत्रांची पूर्तता करून या दोन्ही मुलांना ठाण्याच्या बालकल्याण समितीशी समन्वय करून पालक आणि मुलांची भेट घडवून आणली. या दोघांनाही ६ जून २०२२ रोजी त्यांच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही मुले मुंब्रा येथून कशी बेपत्ता झाली, याची माहिती मात्र त्यांना देता आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.