शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

हरविलेल्या मोबाईलचा परराज्यांमध्ये प्रवास, ३७ मोबाईल हस्तगत

By प्रशांत माने | Updated: December 6, 2022 17:50 IST

मानपाडा पोलिसांची धडक कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: सध्या मोबाईल जीवनाचा अविभाज्य भाग झाला असताना अशा परिस्थितीत तो हरवला किंवा चोरीला गेला तर मोठा त्रास सहन करावा लागतो. कारण आपले महत्वाचे नंबर आणि डाटा मोबाईलमध्ये सेव्ह असतो. हरवलेला मोबाईल पुन्हा मिळेल अशी शाश्वती नसताना मानपाडा पोलिसांनी मात्र ३७ जणांचे गहाळ झालेले मोबाईल शोधून त्यांना परत केले आहेत.

विविध ठिकाणी गेल्या दहा महिन्यात मोबाईल गहाळ झाल्याबाबतच्या अनेक तक्रारी मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. सुमारे १५० ते २०० तक्रारी होत्या. या तक्रारींच्या आधारे गहाळ झालेल्या मोबाईलच्या शोधकामी डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे आणि वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे, सुनिल तारमळे, पोलिस हवालदार राजेंद्र खिल्लारे, विजय कोळी, दिपक गडगे, पोलिस नाईक यल्लपा पाटील, प्रविण किनरे, महादेव पवार, पोलिस शिपाई महेंद्र मंझा यांचे पथक नेमण्यात आले होते.

पथकाने गहाळ झालेले मोबाईल फोन तांत्रिक विश्लेषण माहीतीच्या आधारे व सेंट्रल इकिवपमेंट आयडेंटीटी रजिस्टर (सीइआयआर) या वेब साईटचा वापर करून गहाळ झालेले मोबाईल एकूण ३७ मोबाईल फोन महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडु, कर्नाटक, बिहार या राज्यातून हस्तगत केले आहेत अशी माहीती सहाय्यक पोलिस आयुक्त कुराडे यांनी दिली. शोधलेले मोबाईल मंगळवारी तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले. मोबाईल मिळाल्याबद्दल पोलिसांचे आभार मानताना संबंधितांच्या चेह-यावर समाधान आणि आनंदाचे भाव दिसून आले. हरविलेला मोबाईल परत मिळेल ही आशा सोडली होती पण पोलिसांनी शोधून दिला यात आनंद आहेच पण त्याचबरोबर पोलिसांवरचा विश्वास अधिकच वाढला अशा प्रतिक्रिया मोबाईल मिळालेल्या नागरीकांकडून व्यक्त करण्यात आल्या.

सेंट्रल इकिवपमेंट आयडेंटीटी रजिस्टर (सीइआयआर) या वेब साईटचा वापर करून गहाळ झालेला मोबाईल शोधता येतो. मोबाईल आयएमइआय नंबर तसेच मोबाईल खरेदी केलेली पावती दिल्यास गहाळ मोबाईल शोधण्यास मदत होते. त्यामुळे नागरीकांनी मोबाईल हरविल्यास तत्काळ तक्रार दाखल करणो गरजेचे आहे जेणोकरून लोकेशन ट्रॅक करून तो तत्काळ शोधता येतो असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवलीMobileमोबाइल