शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

हरविलेल्या मोबाईलचा परराज्यांमध्ये प्रवास, ३७ मोबाईल हस्तगत

By प्रशांत माने | Updated: December 6, 2022 17:50 IST

मानपाडा पोलिसांची धडक कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: सध्या मोबाईल जीवनाचा अविभाज्य भाग झाला असताना अशा परिस्थितीत तो हरवला किंवा चोरीला गेला तर मोठा त्रास सहन करावा लागतो. कारण आपले महत्वाचे नंबर आणि डाटा मोबाईलमध्ये सेव्ह असतो. हरवलेला मोबाईल पुन्हा मिळेल अशी शाश्वती नसताना मानपाडा पोलिसांनी मात्र ३७ जणांचे गहाळ झालेले मोबाईल शोधून त्यांना परत केले आहेत.

विविध ठिकाणी गेल्या दहा महिन्यात मोबाईल गहाळ झाल्याबाबतच्या अनेक तक्रारी मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. सुमारे १५० ते २०० तक्रारी होत्या. या तक्रारींच्या आधारे गहाळ झालेल्या मोबाईलच्या शोधकामी डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे आणि वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे, सुनिल तारमळे, पोलिस हवालदार राजेंद्र खिल्लारे, विजय कोळी, दिपक गडगे, पोलिस नाईक यल्लपा पाटील, प्रविण किनरे, महादेव पवार, पोलिस शिपाई महेंद्र मंझा यांचे पथक नेमण्यात आले होते.

पथकाने गहाळ झालेले मोबाईल फोन तांत्रिक विश्लेषण माहीतीच्या आधारे व सेंट्रल इकिवपमेंट आयडेंटीटी रजिस्टर (सीइआयआर) या वेब साईटचा वापर करून गहाळ झालेले मोबाईल एकूण ३७ मोबाईल फोन महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडु, कर्नाटक, बिहार या राज्यातून हस्तगत केले आहेत अशी माहीती सहाय्यक पोलिस आयुक्त कुराडे यांनी दिली. शोधलेले मोबाईल मंगळवारी तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले. मोबाईल मिळाल्याबद्दल पोलिसांचे आभार मानताना संबंधितांच्या चेह-यावर समाधान आणि आनंदाचे भाव दिसून आले. हरविलेला मोबाईल परत मिळेल ही आशा सोडली होती पण पोलिसांनी शोधून दिला यात आनंद आहेच पण त्याचबरोबर पोलिसांवरचा विश्वास अधिकच वाढला अशा प्रतिक्रिया मोबाईल मिळालेल्या नागरीकांकडून व्यक्त करण्यात आल्या.

सेंट्रल इकिवपमेंट आयडेंटीटी रजिस्टर (सीइआयआर) या वेब साईटचा वापर करून गहाळ झालेला मोबाईल शोधता येतो. मोबाईल आयएमइआय नंबर तसेच मोबाईल खरेदी केलेली पावती दिल्यास गहाळ मोबाईल शोधण्यास मदत होते. त्यामुळे नागरीकांनी मोबाईल हरविल्यास तत्काळ तक्रार दाखल करणो गरजेचे आहे जेणोकरून लोकेशन ट्रॅक करून तो तत्काळ शोधता येतो असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवलीMobileमोबाइल