शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विरारच्या तरुण दांपत्याची शोकांतिका; पतीच्या मृत्यूनंतर २२ वर्षीय पत्नीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 16:20 IST

Virar : काही दिवसांपूर्वी नवापूर येथे वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मुलीने आत्महत्या केली होती.

नालासोपारा : विरारमध्ये राहणाऱ्या दांपत्यापैकी नवऱ्याचा मंगळवारी रात्री मृत्यू झाल्यानंतर घाबरलेल्या पत्नीने बुधवारी पहाटे गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरार पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

काही दिवसांपूर्वी नवापूर येथे वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मुलीने आत्महत्या केली होती. त्याचप्रमाणे ही घटना घडली असून नवापूरची पुनरावृत्ती असल्याची विरारमध्ये चर्चा सुरू आहे. मनवेल पाडा येथील दादूस क्लासिक या इमारतीमध्ये नरेंद्रसिंह परमार (२४) आणि त्याची पत्नी संतोष परमार (२२) हे दोघेच भाड्याने राहत होते. या दोघांचे अडीच वर्षांपूर्वी लग्न झाले होते व मूलबाळ नव्हते. काही दिवसांपूर्वी संतोषचा लहान भाऊ यांच्यासोबत राहण्यासाठी आला होता.

नरेंद्रसिंहच्या पोटात मंगळवारी संध्याकाळी खूप दुखत असल्याने त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले व नंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तो घरी आला. परत पोटात दुखत असल्याने पत्नीने त्याला इनो दिला, पण काही उपयोग झाला नाही व त्याचा मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्याचे पाहून पत्नी संतोष घाबरली आणि तिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा लहान भाऊ बुधवारी सकाळी कामावरून आल्यावर दरवाजा उघडा नसल्याचे त्याने पाहिले.

दरवाजा उघडल्यावर बहिणीने गळफास घेतलेला मृतदेह तर भाऊजीचा मृतदेह त्याने पाहिल्यावर विरार पोलिसांना घटनेची माहिती दिली. विरार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

टॅग्स :Virarविरार