शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

इन्शुरन्सच्या १ कोटी विम्यासाठी युवकाचा कांड; 'असा' बनाव रचला की पोलीसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 10:32 IST

फोन नंबरच्या मदतीने पोलीस वेल्लोरच्या अरक्कोनम भागात हरिकृष्णाच्या लपलेल्या ठिकाणी पोहोचले.

तामिळनाडू इथं मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात चेंगलपेट परिसरात लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची अपघाती नोंद करून जवळपास फाईल बंदच केली होती. परंतु काही दिवसांनी पोलिसांना अशी माहिती मिळाली ज्यामुळे पोलिसांनी नव्यानं याचा तपास सुरू केला आणि पोलिसांच्या तपासात जे काही समोर आले त्याने पोलीस हैराण झाले. ज्या व्यक्तीचा आगीत मृत्यू झाल्याचं नोंद केले होते. तो चक्क जिवंत असल्याचं तपासात समोर आले. स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी त्याने मित्राची हत्या केली होती.

काय आहे प्रकरण?सुरेश आर नावाचा एका युवक चेन्नईमध्ये राहून जिममध्ये फिजिकल ट्रेनरचे काम करायचा. मागील काही दिवसांपूर्वी तो चेन्नईतून परतून चेंगलपेटच्या अल्लानूर इथं राहायला आला. १६ सप्टेंबरला सुरेश ज्या घरात राहायचा तिथे आग लागली. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ज्याला तो सुरेश असल्याचं त्याच्या आईने सांगितले. परंतु मृत युवक सुरेशच आहे हे मानायला पोलीस तयार नव्हती. मग डिसेंबरमध्ये पोलिसांना सुरेश जिवंत असल्याची माहिती मिळाली. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

सुरेशचा मृत्यू झाल्यापासून मित्र बेपत्ता तपासादरम्यान पोलिसांना कळले की, सुरेशचा एक मित्र दिल्ली बाबू (वय ३९ वर्ष) सुरेशच्या मृत्यूपासून बेपत्ता होता. बाबूच्या कुटुंबीयांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यावरून पोलिसांना बाबूचा मोठा भाऊ पलानी याच्याकडून माहिती घेतली असता दिल्ली बाबू अनेकदा सुरेशच्या घरी जात असे आणि दोघेही मित्र होते असं कळाले. याबाबत पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सुरेश आणि दिल्लीच्या मित्राच्या चौकशी केली असता सुरेशच्या घराला आग लागली तेव्हा दिल्ली बाबूही त्याआधी त्याच ठिकाणी दिसला होता.

'असा' केला पोलिसांनी खुलासा दरम्यान, सुरेशला कोणीतरी पाहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासादरम्यान पोलिसांना हरिकृष्ण हा सुरेशचा जवळचा मित्र असल्याची माहिती मिळाली. यावर पोलीस वेल्लोर येथील हरिकृष्णाच्या घरी पोहोचले, तिथे पोलिसांना हरिकृष्णाच्या वडिलांचा फोन नंबर मिळाला. या फोन नंबरच्या मदतीने पोलीस वेल्लोरच्या अरक्कोनम भागात हरिकृष्णाच्या लपलेल्या ठिकाणी पोहोचले. पोलीस हरिकृष्णाच्या खोलीत पोहोचले तेव्हा हरिकृष्णासोबत सुरेशही तेथे आढळून आला.

यानंतर पोलिसांनी सुरेशची चौकशी केली असता सुरेशने स्वतःचा एक कोटी रुपयांचा विमा काढल्याचे समोर आले. ही विम्याची रक्कम मिळवण्यासाठी त्याने दिल्ली बाबूला मारून त्याच्या मृत्यूचा बनाव रचला जेणेकरून विमा म्हणून एक कोटी रुपये मिळावेत. या कामात सुरेशला हरिकृष्ण आणि गावातील आणखी एक मित्र कीर्ती रंजन यांचीही साथ मिळाली. सध्या पोलिसांनी तिघांनाही अटक करून तुरुंगात पाठवले आहे.