शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

इन्शुरन्सच्या १ कोटी विम्यासाठी युवकाचा कांड; 'असा' बनाव रचला की पोलीसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 10:32 IST

फोन नंबरच्या मदतीने पोलीस वेल्लोरच्या अरक्कोनम भागात हरिकृष्णाच्या लपलेल्या ठिकाणी पोहोचले.

तामिळनाडू इथं मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात चेंगलपेट परिसरात लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची अपघाती नोंद करून जवळपास फाईल बंदच केली होती. परंतु काही दिवसांनी पोलिसांना अशी माहिती मिळाली ज्यामुळे पोलिसांनी नव्यानं याचा तपास सुरू केला आणि पोलिसांच्या तपासात जे काही समोर आले त्याने पोलीस हैराण झाले. ज्या व्यक्तीचा आगीत मृत्यू झाल्याचं नोंद केले होते. तो चक्क जिवंत असल्याचं तपासात समोर आले. स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी त्याने मित्राची हत्या केली होती.

काय आहे प्रकरण?सुरेश आर नावाचा एका युवक चेन्नईमध्ये राहून जिममध्ये फिजिकल ट्रेनरचे काम करायचा. मागील काही दिवसांपूर्वी तो चेन्नईतून परतून चेंगलपेटच्या अल्लानूर इथं राहायला आला. १६ सप्टेंबरला सुरेश ज्या घरात राहायचा तिथे आग लागली. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ज्याला तो सुरेश असल्याचं त्याच्या आईने सांगितले. परंतु मृत युवक सुरेशच आहे हे मानायला पोलीस तयार नव्हती. मग डिसेंबरमध्ये पोलिसांना सुरेश जिवंत असल्याची माहिती मिळाली. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

सुरेशचा मृत्यू झाल्यापासून मित्र बेपत्ता तपासादरम्यान पोलिसांना कळले की, सुरेशचा एक मित्र दिल्ली बाबू (वय ३९ वर्ष) सुरेशच्या मृत्यूपासून बेपत्ता होता. बाबूच्या कुटुंबीयांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यावरून पोलिसांना बाबूचा मोठा भाऊ पलानी याच्याकडून माहिती घेतली असता दिल्ली बाबू अनेकदा सुरेशच्या घरी जात असे आणि दोघेही मित्र होते असं कळाले. याबाबत पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सुरेश आणि दिल्लीच्या मित्राच्या चौकशी केली असता सुरेशच्या घराला आग लागली तेव्हा दिल्ली बाबूही त्याआधी त्याच ठिकाणी दिसला होता.

'असा' केला पोलिसांनी खुलासा दरम्यान, सुरेशला कोणीतरी पाहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासादरम्यान पोलिसांना हरिकृष्ण हा सुरेशचा जवळचा मित्र असल्याची माहिती मिळाली. यावर पोलीस वेल्लोर येथील हरिकृष्णाच्या घरी पोहोचले, तिथे पोलिसांना हरिकृष्णाच्या वडिलांचा फोन नंबर मिळाला. या फोन नंबरच्या मदतीने पोलीस वेल्लोरच्या अरक्कोनम भागात हरिकृष्णाच्या लपलेल्या ठिकाणी पोहोचले. पोलीस हरिकृष्णाच्या खोलीत पोहोचले तेव्हा हरिकृष्णासोबत सुरेशही तेथे आढळून आला.

यानंतर पोलिसांनी सुरेशची चौकशी केली असता सुरेशने स्वतःचा एक कोटी रुपयांचा विमा काढल्याचे समोर आले. ही विम्याची रक्कम मिळवण्यासाठी त्याने दिल्ली बाबूला मारून त्याच्या मृत्यूचा बनाव रचला जेणेकरून विमा म्हणून एक कोटी रुपये मिळावेत. या कामात सुरेशला हरिकृष्ण आणि गावातील आणखी एक मित्र कीर्ती रंजन यांचीही साथ मिळाली. सध्या पोलिसांनी तिघांनाही अटक करून तुरुंगात पाठवले आहे.