शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मानलेल्या भावानेच दगा दिला; मैत्रिणीसोबत बोलताना अचानक चाकूनं वार केला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 08:30 IST

पहिल्या मजल्यावर पायलचा खासगी क्लास आहे. या क्लासमध्ये पायल रविवारी सकाळी नऊ वाजता आली. दोन वर्ग मैत्रिणींसमवेत ती बोलत असतानाच तिथं निखिल आला.

सातारा : त्याचं घरात येणं-जाणं असायचं. पायलच्या चुलत भावाचा तो मित्र असल्याने घरातले सगळेचजण त्याला दादा म्हणूनच हाक मारायचे, तर पायल गुरूभाऊ मानायची. एवढेच नव्हे, तर पायल काॅलेजला जाताना कधी कधी तो तिला दुचाकीवरून सोडायलाही जायचा. असे असताना अचानक त्याने पायलचा अत्यंत निर्दयपणे खून केल्याने पायलच्या घरातल्यांना मानसिक धक्का बसलाय.

कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील पायल साळुंखे (वय १७) या महाविद्यालयीन युवतीचा खून झाल्यानंतर या घटनेचे अनेक कंगोरे समोर आले. पायल गावाच्या बाहेर असलेल्या वस्तीवर राहत होती, तर निखिल हा पिंपोडे गावात राहत आहे. पायलचा चुलत भाऊ आणि निखिल चांगले मित्र. त्यामुळे निखिलचं त्यांच्या घरी येणं-जाणं असायचं. पायलच्या घरापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर काॅलेज आहे. काॅलेजला कधी उशीर झालाच तर निखिल म्हणे तिला दुचाकीवरून सोडायलाही जायचा. त्यामुळे पायलनं म्हणे त्याला गुरूभाऊ मानलं होतं. निखिल असं काय करेल, हे कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पायलचा जीवघेण्याइतकं मोठं कारण काय होतं, हे आता पोलिसांच्या तपासात समोर येईलच; पण पायलच्या घरातल्यांनी निखिलवर टाकलेल्या विश्वासामुळे मानलेल्या नात्यांचा अशा घटनांमुळे समाजाचा विश्वासच उडू लागलाय हे मात्र निश्चित.

दोन मैत्रिणींसमोरच चाकूचे वार

पहिल्या मजल्यावर पायलचा खासगी क्लास आहे. या क्लासमध्ये पायल रविवारी सकाळी नऊ वाजता आली. दोन वर्ग मैत्रिणींसमवेत ती बोलत असतानाच तिथं निखिल आला. तिच्याशी काहीही न बोलता त्याने अचानक तिच्या पोटात सपासप चाकूने वार केले. हे पाहून तिच्या दोन वर्ग मैत्रिणी किंचाळल्या. त्या दोन मुली खाली ओरडत आल्या. तेव्हा आजूबाजूच्या दुकानदारांना याची माहिती मिळाली. तोपर्यंत निखिल तेथून पसार झाला. पायल रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

पायलनं अखेर शिक्षकांनाच सांगितलं..

पायलच्या खासगी क्लासच्या शिक्षकांची आई पिंपोडेतीलच एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. आईला पाहण्यासाठी शिक्षक त्या रुग्णालयात गेले होते, तर इकडे त्यांच्या क्लासमध्ये पायलवर वार झाले. योगायोगाने पायललाही नागरिकांनी त्याच रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. तेव्हा पायल थोडीफार शुद्धीवर होती. तिच्या शिक्षकांना आणि डाॅक्टरांना तिने निखिलने मारले असल्याचे सांगितले; पण तिची प्रकृती बिघडू लागल्याने तिला साताऱ्याला नेण्यात आले. यावेळी ती बेशुद्ध पडली. साताऱ्यात पोहोचल्यानंतर तिच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. मात्र, शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच पायलने या जगाचा निरोप घेतला. परिणामी मृत्यूपूर्व जबाब तिचा अखेर राहिलाच.