शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नव्या बुलेटचा आनंद औटघटकेचा; ग्रामपंचायत सदस्याची भोसकून हत्या, अंबाजोगाईमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2022 23:35 IST

धारदार शस्त्राने केले वार

- अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई: मूळचे वाहनचालक असलेले गोरखनाथ सीताराम घनघाव (वय ५०,रा. चनई ता. अंबाजोगाई) दोन महिन्यांपूर्वी गावगाड्याच्या राजकारणात उतरले. ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून गेल्यावर विजयादशमीच्या मुहूर्तावर त्यांनी नवी बुलेट खरेदी केली; पण नियतीच्या मनात काही औरच होते. गावात झालेल्या वादात त्यांच्यावर शस्त्राने सपासप वार झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ५ ऑक्टोबर रोजीखुनाच्या या थरारक घटनेने चनई हादरली.

गोरखनाथ सीताराम घनघाव यांनी दोन महिन्यांपूर्वी चनई  ग्रामपंचायत निवडणुकीत नशीब अजमावले. नशिबाने त्यांना साथ दिली आणि सदस्य म्हणून ते निवडून आले होते. दुपारी चार वाजता गावात रेशनवाटपावरून वाद झाला. याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी आठ ते दहा जणांचा जमाव गोरखनाथ यांच्या घराच्या दिशेने चालून आला. यावेळी शिवीगाळ करत त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यात ते गंभीर जखमी झाले. मध्यस्थीसाठी आलेला एक जखमी झाला आहे. दोघांना तातडीने स्वाराती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना गोरखनाथ घनघाव यांचा मृत्यू झाला.  शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावात तणाव, पाच संशयित ताब्यात

या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.  शहर पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड