शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

नवरी पळाली भुर्रर्र...नवरा पाहतच राहिला; दागिने आणि रोकड घेऊन पोबारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 10:05 IST

मालाड पोलिसांत गुन्हा दाखल, नववधू आशाला लग्नाच्या आधी दागिने घातले होते. २९ मार्च रोजी मंदिरात त्यांचे लग्न पार पडले. दुसऱ्या दिवशी कदम यांनी व्यावसायिकाशी संपर्क साधून न्यायालयात लग्नाची नोंदणी करावी, अशी विनंती केली.

मुंबई : लग्नाच्या तीन दिवसांनंतर नववधू साडेचार लाखांच्या दागिन्यांसह पसार झाली. मालाडमध्ये हा प्रकार घडला असून, याप्रकरणी पोलिसांनी आशा गायकवाड, कमलेश कदम आणि तिची मावशी मनीषा कश्यप यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार कुटुंबाचे मालाड येथे हॉस्पिटल आहे. ते त्यांच्या २८ वर्षीय मुलासाठी वधूच्या शोधात होते. मुलाच्या अपंगत्वामुळे  लग्न जुळविण्यासाठी त्यांनी एजंटकडे जाण्याचे ठरविले. पोलिसांना दिलेल्या जबाबात तक्रारदाराने सांगितले की, कमलेश कदम नावाच्या एजंटला ते भेटले, त्याने त्यांची आशा गायकवाड नावाच्या महिलेशी ओळख करून दिली. आशाने दावा केला की, ती अनाथ असून तिचे संगोपन तिची मावशी मनीषा कश्यप यांनी केले. कुटुंबीयांनी होकार दिल्यानंतर कदम यांनी तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची मागणी केली. 

दरम्यान, नववधू आशाला लग्नाच्या आधी दागिने घातले होते. २९ मार्च रोजी मंदिरात त्यांचे लग्न पार पडले. दुसऱ्या दिवशी कदम यांनी व्यावसायिकाशी संपर्क साधून न्यायालयात लग्नाची नोंदणी करावी, अशी विनंती केली. तेव्हा सासरची मंडळी नोंदणी करायला न्यायालयात गेले असता, मनीषाने सह्या करण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. ते पैसेही तिला देण्यात आले.  यानंतर नववधू आशा वराच्या घरी गेली आणि तीन दिवस तिथे राहिली. त्यानंतर १ एप्रिल रोजी तिने लग्नात दिलेले सर्व दागिने परिधान केले आणि बाजारात जाऊन येते, असे सांगून बाहेर पडली. उशिरापर्यंत ती न परतल्याने वराच्या वडिलांनी तिच्या फोनवर फोन केला असता तो बंद होता. त्यांनी कदम आणि कश्यप यांनाही फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोदेखील लागत नव्हता. त्यानंतर त्यांनी पत्नीच्या फोनवरून पुन्हा आशाच्या नंबरवर कॉल केला. तेव्हा तिने फोन उचलला आणि त्यांना सांगितले की, ती विवाहित आहे. तिला दोन मुले आहेत आणि तिला पैशांची नितांत गरज आहे. पैशांसाठी कदम आणि मनीषा यांच्या सांगण्यावरून तिने लग्न केल्याचीही कबुली दिली. 

आम्ही दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांची कार्यपद्धती पाहता, असे दिसते की ते एखाद्या टोळीचा भाग आहेत. आतापर्यंत आम्हाला आढळलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचा संशय आहे. - धनंजय लिगाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालाड पोलीस ठाणे