शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
2
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
3
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
4
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
5
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
6
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
7
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
8
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
9
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
10
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
11
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
12
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
13
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
14
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
15
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
16
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
17
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

नवरी पळाली भुर्रर्र...नवरा पाहतच राहिला; दागिने आणि रोकड घेऊन पोबारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 10:05 IST

मालाड पोलिसांत गुन्हा दाखल, नववधू आशाला लग्नाच्या आधी दागिने घातले होते. २९ मार्च रोजी मंदिरात त्यांचे लग्न पार पडले. दुसऱ्या दिवशी कदम यांनी व्यावसायिकाशी संपर्क साधून न्यायालयात लग्नाची नोंदणी करावी, अशी विनंती केली.

मुंबई : लग्नाच्या तीन दिवसांनंतर नववधू साडेचार लाखांच्या दागिन्यांसह पसार झाली. मालाडमध्ये हा प्रकार घडला असून, याप्रकरणी पोलिसांनी आशा गायकवाड, कमलेश कदम आणि तिची मावशी मनीषा कश्यप यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार कुटुंबाचे मालाड येथे हॉस्पिटल आहे. ते त्यांच्या २८ वर्षीय मुलासाठी वधूच्या शोधात होते. मुलाच्या अपंगत्वामुळे  लग्न जुळविण्यासाठी त्यांनी एजंटकडे जाण्याचे ठरविले. पोलिसांना दिलेल्या जबाबात तक्रारदाराने सांगितले की, कमलेश कदम नावाच्या एजंटला ते भेटले, त्याने त्यांची आशा गायकवाड नावाच्या महिलेशी ओळख करून दिली. आशाने दावा केला की, ती अनाथ असून तिचे संगोपन तिची मावशी मनीषा कश्यप यांनी केले. कुटुंबीयांनी होकार दिल्यानंतर कदम यांनी तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची मागणी केली. 

दरम्यान, नववधू आशाला लग्नाच्या आधी दागिने घातले होते. २९ मार्च रोजी मंदिरात त्यांचे लग्न पार पडले. दुसऱ्या दिवशी कदम यांनी व्यावसायिकाशी संपर्क साधून न्यायालयात लग्नाची नोंदणी करावी, अशी विनंती केली. तेव्हा सासरची मंडळी नोंदणी करायला न्यायालयात गेले असता, मनीषाने सह्या करण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. ते पैसेही तिला देण्यात आले.  यानंतर नववधू आशा वराच्या घरी गेली आणि तीन दिवस तिथे राहिली. त्यानंतर १ एप्रिल रोजी तिने लग्नात दिलेले सर्व दागिने परिधान केले आणि बाजारात जाऊन येते, असे सांगून बाहेर पडली. उशिरापर्यंत ती न परतल्याने वराच्या वडिलांनी तिच्या फोनवर फोन केला असता तो बंद होता. त्यांनी कदम आणि कश्यप यांनाही फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोदेखील लागत नव्हता. त्यानंतर त्यांनी पत्नीच्या फोनवरून पुन्हा आशाच्या नंबरवर कॉल केला. तेव्हा तिने फोन उचलला आणि त्यांना सांगितले की, ती विवाहित आहे. तिला दोन मुले आहेत आणि तिला पैशांची नितांत गरज आहे. पैशांसाठी कदम आणि मनीषा यांच्या सांगण्यावरून तिने लग्न केल्याचीही कबुली दिली. 

आम्ही दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांची कार्यपद्धती पाहता, असे दिसते की ते एखाद्या टोळीचा भाग आहेत. आतापर्यंत आम्हाला आढळलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचा संशय आहे. - धनंजय लिगाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालाड पोलीस ठाणे