शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

ह्दयद्रावक! रेल्वे ट्रॅकवर सेल्फीचा नाद २ भावांसाठी जीवघेणा ठरला; दिव्यांग भावाचा पाय घसरला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 19:01 IST

रेल्वे पटरीवर दोघं जण सेल्फी घेत होते. ज्यात एक दिव्यांग होता. समोरून वेगाने येणाऱ्या ट्रेनने या दोघांना धडक दिली

ठळक मुद्देसमोरून वेगाने येणाऱ्या ट्रेनच्या धडकेत दोघाही भावांचा जागीच मृत्यू झाला.एकाच कुटुंबातील दोन युवकांचा ट्रेन अपघातात मृत्यू झाल्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. युवकांच्या मृत्यूची बातमी कळताच जिल्हा रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी गर्दी केली होती.

अलीकडे सोशल मीडियाच्या दुनियेत मोबाईलवर फोटो घेण्याचं वेड अनेक तरूणांना लागलं आहे. जीव धोक्यात घालून सेल्फी घेण्याचे प्रकार सर्रासपणे घडतात. यामुळे अनेक दुर्घटना घडल्याचं ऐकायला मिळालं आहे.  उत्तर प्रदेशाच्या फिरोजाबाद येथे रसूलपूर परिसरात रेल्वे ट्रॅकवर सेल्फी घेताना २ चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत.

माहितीनुसार, मृतांमध्ये एका दिव्यांगाचा समावेश होता. सेल्फी घेताना दिव्यांग रेल्वे पटरीवर पडला त्याचवेळी त्याला वाचवण्यासाठी सरसावलेल्या दुसरा भाऊही ट्रेनच्या अपघातात ठार झाला. हे दोघंही सकाळी फिरता फिरता रसूलपूर येथील रेल्वे पटरीजवळ पोहचले होते. दोघं रेल्वे पटरीवर उभं राहून मोबाईलमधून सेल्फी घेत होते. तेव्हा अचानक समोरून वेगाने ट्रेन आली. त्याचवेळी दिव्यांग असलेल्या भावाचा पाय पटरीत अडकला आणि तो तिथेच पडला.

प्रत्यक्षदर्शी धमेंद्र कुमार याने सांगितले की, रेल्वे पटरीवर दोघं जण सेल्फी घेत होते. ज्यात एक दिव्यांग होता. समोरून वेगाने येणाऱ्या ट्रेनने या दोघांना धडक दिली. फिरोजाबादच्या रसूलपूर भागातील ३० फूट रोड नवीगंज येथे राहणारे सलमान आणि वसीम सकाळी बाजारात जाण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. मात्र फिरता फिरता दोघं रेल्वे पटरीजवळ पोहचले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघं रेल्वे पटरीवर उभं राहून सेल्फी घेत होते. त्यातील पायाने दिव्यांग असलेला सलमान रेल्वे पटरीवरून बाजूला जाताना त्याचा पाय घसरला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ वसीम तिथे पोहचला असता तोवर खूप उशीर झाला होता.

समोरून वेगाने येणाऱ्या ट्रेनच्या धडकेत दोघाही भावांचा मृत्यू झाला. घटनास्थळीच या दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना तात्काळ सूचना दिली. तेव्हा सीओ सिटी फिरोजाबाद येथील हरी मोहन यांनी रसूलपूर परिसरात दोन युवकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचं कळवलं. मृतदेह पडलेल्या ठिकाणचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत. ज्या ट्रेनने हा अपघात झाला ती हावडाहून दिल्ली येथे जात होती. एकाच कुटुंबातील दोन युवकांचा ट्रेन अपघातात मृत्यू झाल्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. युवकांच्या मृत्यूची बातमी कळताच जिल्हा रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी गर्दी केली होती. सलमान हा दोन्ही पायांनी दिव्यांग होता असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात