शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

बापरे! ऊसतोड मजूराचा संशयास्पद मृत्यू; अंत्यविधी न करता प्रेत मिठात पुरुन ठेवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 14:51 IST

४ नोव्हेंबरला ईश्वर गावाकडे परत निघाला तेव्हा त्याने वडिलांना फोन केला होता.

नंदूरबार - जिल्ह्यातील धडगाव येथील ईश्वर वळवी या ऊसतोड कामगाराचा सोलापूर जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांना धक्का बसला आहे. ईश्वर वळवी हे माळशिरस तालुक्यातील तोंडले गावात ऊसतोडीसाठी गेले होते. त्याठिकाणी वळवी यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना देण्यात आली. त्यावरून कुटुंबीयांनी मुकादम आट्या वळवी, तोंडलेतील रवी चव्हाण, मनोज चव्हाण यांची सखोल चौकशी करून गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली आहे. 

या प्रकरणाबाबत मृत ईश्वर वळवीचा लहान भाऊ सागर वळवी म्हणाला की, मुकादमानं २ तुकडी गावात आहेत असं सांगून नेले. परंतु प्रत्यक्षात केवळ ५-६ जण कामाच्या ठिकाणी होते. तेव्हा ईश्वरनं ठेकेदार आणि मुकादमांना आणखी काही माणसे लागतील असं सांगितले. तेव्हा मुकादमांनी जितके आहेत तितक्यांनी ऊसतोड करा असं सांगितले. त्यावरून वाद झाला त्यात ईश्वरला मारहाण करण्यात आली. मारहाण केल्यानंतर दहशत निर्माण झाली. ४ नोव्हेंबरला ईश्वर गावाकडे परत निघाला तेव्हा त्याने वडिलांना फोन केला होता. मला मारहाण होत असून माझ्या जीवाला धोका आहे असं म्हटलं होते. 

त्यानंतर भावाचा फोन कट झाला. आम्ही ५ तारखेला मनमाड येथे निघण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यात मनमाड पोलिसांचा आम्हाला फोन आला. एक मृतदेह सापडलाय. तो व्यक्ती तुमच्या घरचाच आहे का हे ओळख पटवण्यासाठी व्हॉट्सअपवर फोटो पाठवला. हा फोटो बघितल्यानंतर तो ईश्वरच होता हे दिसले. आदल्यादिवशी ईश्वरचं फोन आला आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या मृत्यूची बातमी समजल्याने आम्हाला धक्का बसला. त्यामुळे जे माझ्या भावाला घेऊन गेले होते. ज्यांनी मारहाण केली त्यांनीच माझ्या भावाला मारलं असा आरोप मृत व्यक्तीचा भाऊ सागर वळवीनं केले आहे. 

मृतदेह मिठात पुरुन ठेवलापोलिसांच्या सांगण्यानुसार कुटुंबाने मनमाड गाठत त्याठिकाणाहून ईश्वरचं प्रेत आणलं. त्याच्या मृतदेहावर अनेक जखमा असल्याचं नातेवाईकांनी म्हटलं. ही आत्महत्या नसून त्याला मारहाणीनंतर गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मात्र कुटुंबीयांनी मृत ईश्वर वळवीवर अंत्यविधी न करता त्याचे प्रेत मिठात पुरून ठेवले आहे. जोपर्यंत आरोपींना शिक्षा होणार नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.