शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! ऊसतोड मजूराचा संशयास्पद मृत्यू; अंत्यविधी न करता प्रेत मिठात पुरुन ठेवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 14:51 IST

४ नोव्हेंबरला ईश्वर गावाकडे परत निघाला तेव्हा त्याने वडिलांना फोन केला होता.

नंदूरबार - जिल्ह्यातील धडगाव येथील ईश्वर वळवी या ऊसतोड कामगाराचा सोलापूर जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांना धक्का बसला आहे. ईश्वर वळवी हे माळशिरस तालुक्यातील तोंडले गावात ऊसतोडीसाठी गेले होते. त्याठिकाणी वळवी यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना देण्यात आली. त्यावरून कुटुंबीयांनी मुकादम आट्या वळवी, तोंडलेतील रवी चव्हाण, मनोज चव्हाण यांची सखोल चौकशी करून गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली आहे. 

या प्रकरणाबाबत मृत ईश्वर वळवीचा लहान भाऊ सागर वळवी म्हणाला की, मुकादमानं २ तुकडी गावात आहेत असं सांगून नेले. परंतु प्रत्यक्षात केवळ ५-६ जण कामाच्या ठिकाणी होते. तेव्हा ईश्वरनं ठेकेदार आणि मुकादमांना आणखी काही माणसे लागतील असं सांगितले. तेव्हा मुकादमांनी जितके आहेत तितक्यांनी ऊसतोड करा असं सांगितले. त्यावरून वाद झाला त्यात ईश्वरला मारहाण करण्यात आली. मारहाण केल्यानंतर दहशत निर्माण झाली. ४ नोव्हेंबरला ईश्वर गावाकडे परत निघाला तेव्हा त्याने वडिलांना फोन केला होता. मला मारहाण होत असून माझ्या जीवाला धोका आहे असं म्हटलं होते. 

त्यानंतर भावाचा फोन कट झाला. आम्ही ५ तारखेला मनमाड येथे निघण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यात मनमाड पोलिसांचा आम्हाला फोन आला. एक मृतदेह सापडलाय. तो व्यक्ती तुमच्या घरचाच आहे का हे ओळख पटवण्यासाठी व्हॉट्सअपवर फोटो पाठवला. हा फोटो बघितल्यानंतर तो ईश्वरच होता हे दिसले. आदल्यादिवशी ईश्वरचं फोन आला आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या मृत्यूची बातमी समजल्याने आम्हाला धक्का बसला. त्यामुळे जे माझ्या भावाला घेऊन गेले होते. ज्यांनी मारहाण केली त्यांनीच माझ्या भावाला मारलं असा आरोप मृत व्यक्तीचा भाऊ सागर वळवीनं केले आहे. 

मृतदेह मिठात पुरुन ठेवलापोलिसांच्या सांगण्यानुसार कुटुंबाने मनमाड गाठत त्याठिकाणाहून ईश्वरचं प्रेत आणलं. त्याच्या मृतदेहावर अनेक जखमा असल्याचं नातेवाईकांनी म्हटलं. ही आत्महत्या नसून त्याला मारहाणीनंतर गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मात्र कुटुंबीयांनी मृत ईश्वर वळवीवर अंत्यविधी न करता त्याचे प्रेत मिठात पुरून ठेवले आहे. जोपर्यंत आरोपींना शिक्षा होणार नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.