शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

बापरे! ऊसतोड मजूराचा संशयास्पद मृत्यू; अंत्यविधी न करता प्रेत मिठात पुरुन ठेवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 14:51 IST

४ नोव्हेंबरला ईश्वर गावाकडे परत निघाला तेव्हा त्याने वडिलांना फोन केला होता.

नंदूरबार - जिल्ह्यातील धडगाव येथील ईश्वर वळवी या ऊसतोड कामगाराचा सोलापूर जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांना धक्का बसला आहे. ईश्वर वळवी हे माळशिरस तालुक्यातील तोंडले गावात ऊसतोडीसाठी गेले होते. त्याठिकाणी वळवी यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना देण्यात आली. त्यावरून कुटुंबीयांनी मुकादम आट्या वळवी, तोंडलेतील रवी चव्हाण, मनोज चव्हाण यांची सखोल चौकशी करून गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली आहे. 

या प्रकरणाबाबत मृत ईश्वर वळवीचा लहान भाऊ सागर वळवी म्हणाला की, मुकादमानं २ तुकडी गावात आहेत असं सांगून नेले. परंतु प्रत्यक्षात केवळ ५-६ जण कामाच्या ठिकाणी होते. तेव्हा ईश्वरनं ठेकेदार आणि मुकादमांना आणखी काही माणसे लागतील असं सांगितले. तेव्हा मुकादमांनी जितके आहेत तितक्यांनी ऊसतोड करा असं सांगितले. त्यावरून वाद झाला त्यात ईश्वरला मारहाण करण्यात आली. मारहाण केल्यानंतर दहशत निर्माण झाली. ४ नोव्हेंबरला ईश्वर गावाकडे परत निघाला तेव्हा त्याने वडिलांना फोन केला होता. मला मारहाण होत असून माझ्या जीवाला धोका आहे असं म्हटलं होते. 

त्यानंतर भावाचा फोन कट झाला. आम्ही ५ तारखेला मनमाड येथे निघण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यात मनमाड पोलिसांचा आम्हाला फोन आला. एक मृतदेह सापडलाय. तो व्यक्ती तुमच्या घरचाच आहे का हे ओळख पटवण्यासाठी व्हॉट्सअपवर फोटो पाठवला. हा फोटो बघितल्यानंतर तो ईश्वरच होता हे दिसले. आदल्यादिवशी ईश्वरचं फोन आला आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या मृत्यूची बातमी समजल्याने आम्हाला धक्का बसला. त्यामुळे जे माझ्या भावाला घेऊन गेले होते. ज्यांनी मारहाण केली त्यांनीच माझ्या भावाला मारलं असा आरोप मृत व्यक्तीचा भाऊ सागर वळवीनं केले आहे. 

मृतदेह मिठात पुरुन ठेवलापोलिसांच्या सांगण्यानुसार कुटुंबाने मनमाड गाठत त्याठिकाणाहून ईश्वरचं प्रेत आणलं. त्याच्या मृतदेहावर अनेक जखमा असल्याचं नातेवाईकांनी म्हटलं. ही आत्महत्या नसून त्याला मारहाणीनंतर गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मात्र कुटुंबीयांनी मृत ईश्वर वळवीवर अंत्यविधी न करता त्याचे प्रेत मिठात पुरून ठेवले आहे. जोपर्यंत आरोपींना शिक्षा होणार नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.