शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

ह्द्रयद्रावक! एकाच कुटुंबात ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, ३ बहिणींपैकी २ गर्भवती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 11:12 IST

पोलिसांना मृतदेह शोधण्यास खूप उशीर झाला. या प्रकरणी पोलिसांनी सासरकडील काही लोकांना ताब्यात घेतले आहे

जयपूर- राजस्थानात एक ह्द्रयद्रावक घटना समोर आली आहे. जयपूरच्या दूदू परिसरात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृतदेह विहिरात आढळला आहे. या खळबळजनक घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. प्रथमदर्शनी पोलिसांनी या मृत्यूचं कारण आत्महत्या असल्याचं वर्तवलं आहे. मृतकांमध्ये ३ बहिणींचा समावेश आहे. ज्यांचे लग्न एकाच कुटुंबात कमी वयात झाले होते आणि त्यांना २ मुले होती. यातील २ महिला गर्भवती होत्या. 

पोलिसांच्या माहितीनुसार, २५ मे रोजी तिन्ही बहिणी बाजाराच्या निमित्ताने घरातून बाहेर पडल्या होत्या. परंतु जेव्हा त्या घरी परतल्या नाहीत तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी विविध ठिकाणी शोध घेतला आणि पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तर दुसरीकडे या तीन बहिणींचा चुलत भाऊ हेमराज मीणा याने आरोप लावलाय की, माझ्या एका बहिणीला तिच्या सासरच्या माणसांनी बेदम मारहाण केली होती. आमच्या बहिणींची हत्या झाली आहे असं त्याने म्हटलं. 

पोलिसांना मृतदेह शोधण्यास खूप उशीर झाला. या प्रकरणी पोलिसांनी सासरकडील काही लोकांना ताब्यात घेतले आहे. मृतांमध्ये काली देवी(२७), ममता मीणा(२३) आणि कमलेश मीणा(२०) तर हर्षित(४) आणि २० महिन्याचा एका चिमुकलाही होता. ममता आणि कमलेश दोघीही गर्भवती होत्या. जयपूर ग्रामीण एसपी मनीष अग्रवाल म्हणाले की, या मृत ३ महिलांपैकी एकीने तिच्या व्हॉट्सअपवर एक स्टेटस पोस्ट केले होते. ती सासरच्या छळाला कंटाळली होती. त्यामुळे मरणं चांगले आहे असं तिने म्हटलं होते. मृत महिलांच्या वडिलांनी सासरच्या लोकांविरोधात हुंड्यासाठी सातत्याने छळ करत असल्याचा गुन्हा नोंदवला. 

या तिन्ही बहिणींनी जीवापाड मेहनत घेत शिक्षण पूर्ण करून आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतु तिन्हीचे पती अशिक्षित असल्याने दारू पिऊन मारहाण करत असे. ते व्यसनाधीन होते. वडिलोपार्जित संपत्ती विकून आयुष्य जगत होते. कुठलेही काम करत नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या महरानी कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या कमलेशनं सेंट्रल यूनिवर्सिटीत प्रवेश घेतला होता. तर तिचा पती सहावीपर्यंत शिकला होता. ममताचं पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेत निवड झाली होती. तर मोठी बहीण काली बीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. मात्र या तिघी बहिणींच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.