शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ह्द्रयद्रावक! एकाच कुटुंबात ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, ३ बहिणींपैकी २ गर्भवती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 11:12 IST

पोलिसांना मृतदेह शोधण्यास खूप उशीर झाला. या प्रकरणी पोलिसांनी सासरकडील काही लोकांना ताब्यात घेतले आहे

जयपूर- राजस्थानात एक ह्द्रयद्रावक घटना समोर आली आहे. जयपूरच्या दूदू परिसरात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृतदेह विहिरात आढळला आहे. या खळबळजनक घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. प्रथमदर्शनी पोलिसांनी या मृत्यूचं कारण आत्महत्या असल्याचं वर्तवलं आहे. मृतकांमध्ये ३ बहिणींचा समावेश आहे. ज्यांचे लग्न एकाच कुटुंबात कमी वयात झाले होते आणि त्यांना २ मुले होती. यातील २ महिला गर्भवती होत्या. 

पोलिसांच्या माहितीनुसार, २५ मे रोजी तिन्ही बहिणी बाजाराच्या निमित्ताने घरातून बाहेर पडल्या होत्या. परंतु जेव्हा त्या घरी परतल्या नाहीत तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी विविध ठिकाणी शोध घेतला आणि पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तर दुसरीकडे या तीन बहिणींचा चुलत भाऊ हेमराज मीणा याने आरोप लावलाय की, माझ्या एका बहिणीला तिच्या सासरच्या माणसांनी बेदम मारहाण केली होती. आमच्या बहिणींची हत्या झाली आहे असं त्याने म्हटलं. 

पोलिसांना मृतदेह शोधण्यास खूप उशीर झाला. या प्रकरणी पोलिसांनी सासरकडील काही लोकांना ताब्यात घेतले आहे. मृतांमध्ये काली देवी(२७), ममता मीणा(२३) आणि कमलेश मीणा(२०) तर हर्षित(४) आणि २० महिन्याचा एका चिमुकलाही होता. ममता आणि कमलेश दोघीही गर्भवती होत्या. जयपूर ग्रामीण एसपी मनीष अग्रवाल म्हणाले की, या मृत ३ महिलांपैकी एकीने तिच्या व्हॉट्सअपवर एक स्टेटस पोस्ट केले होते. ती सासरच्या छळाला कंटाळली होती. त्यामुळे मरणं चांगले आहे असं तिने म्हटलं होते. मृत महिलांच्या वडिलांनी सासरच्या लोकांविरोधात हुंड्यासाठी सातत्याने छळ करत असल्याचा गुन्हा नोंदवला. 

या तिन्ही बहिणींनी जीवापाड मेहनत घेत शिक्षण पूर्ण करून आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतु तिन्हीचे पती अशिक्षित असल्याने दारू पिऊन मारहाण करत असे. ते व्यसनाधीन होते. वडिलोपार्जित संपत्ती विकून आयुष्य जगत होते. कुठलेही काम करत नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या महरानी कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या कमलेशनं सेंट्रल यूनिवर्सिटीत प्रवेश घेतला होता. तर तिचा पती सहावीपर्यंत शिकला होता. ममताचं पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेत निवड झाली होती. तर मोठी बहीण काली बीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. मात्र या तिघी बहिणींच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.