शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

नगरसेविकेच्या २ मुलांचा संशयास्पद मृत्यू; सासरवाडीला गेले अन् परतलेच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 08:29 IST

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसही घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले.

सुपौल – बिहारच्या सुपौल जिल्ह्यात डबल मर्डरचं प्रकरण उघडकीस आल्यानं परिसरात खळबळ माजली आहे. याठिकाणी एका नगरसेविकेच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नगरसेविका माला देवी यांची मुले सासरी गेली होती. परंतु दुसऱ्या दिवशी दोघांचे मृतदेह कोसी नदीकिनारे सापडले. या घटनेला राजकीय पार्श्वभूमी असल्याचा संशय काहींनी व्यक्त केला आहे. परंतु नगरसेविका माला देवी यांनी जर पोलिसांनी योग्यप्रकारे तपास केल्यास हत्येचा खुलासा होऊ शकतो असं म्हटलं आहे.

नदीवर तरंगत होते दोन्ही मुलांचे मृतदेह

मधेपुरा वार्ड नंबर ८ च्या नगरसेविका माला देवींचा मोठा मुलगा मिठ्ठू याचं सासर सुपौलमधील डुमरिया येथे होते. मिठ्ठू त्याच्या भावासोबत रात्री उशीरा मधेपुराहून सासरवाडीला जाण्यासाठी निघाला होता. पूर्ण रात्र दोघं भाऊ घरच्यांच्या संपर्कात होते. परंतु बुधवारी सकाळी नगरसेविकेला काही लोकांनी फोन करत दोन युवकांचा मृतदेह कोसी नदीच्या पाण्यावर तरंगत असल्याची माहिती दिली.

नदीकिनारी सापडली सफेद रंगाची बाइक

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसही घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. त्याचसोबत सफेद रंगाची एक बाइकही जप्त केली. माला देवी म्हणाल्या की, माझा मुलगा त्याच्या दीड महिन्याच्या मुलाला कपडे देण्यासाठी सासरवाडीला गेला होता. संध्याकाळ झाली असल्याने त्याला जाण्यापासून रोखलं होतं. परंतु मुलाला पाहण्यासाठी तो भावाला सोबत घेऊन सासरी गेला. परंतु आता ते दोघंही कधीच त्यांच्या आईला भेटणार नाहीत असं सांगत माला देवी भावूक झाल्या.

पोलिसांनी तपासासाठी बनवलं पथक

नगरसेविकेच्या मुलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी डीएसपी इंद्र प्रकाश यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतरच या हत्याकांडामागे नेमके कोण आहे याचा खुलासा होऊ शकेल. सध्या पोलिसांनी संशयास्पद मृत्यू म्हणून प्रकरणाची नोंद केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. जेणेकरुन लवकरात लवकर या प्रकरणाचा उलगडा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.   

टॅग्स :Biharबिहार