शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

केवळ निर्भयाच्या गुन्हेगारांना नाही तर समाजातील 'या' दुष्प्रवृत्तीला मिळालेली शिक्षा - उज्ज्वल निकम

By पूनम अपराज | Updated: March 20, 2020 11:56 IST

आम्ही जेव्हा कठोर शिक्षेची मागणी करतो तेव्हा ती केवळ गुन्हेगारासाठी नाही तर समाजातील अशा प्रवृत्तीच्या प्रत्येकासाठी असते जे अशा कृत्याचा विचार करतात, असे पुढे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले.

ठळक मुद्देया दोषींप्रमाणे कोणी कायद्याशी खेळतं किंवा आव्हान देतं ते अत्यंत चुकीचं आहे. लोकांमध्ये कायद्याप्रती सन्मान आणि विश्वास निर्माण झाला पाहिजे. फासावर लटवलेल्या चार नराधमांच्या वकिलाने न्यायव्यवस्थेचा जो वेळ वाया घालवला, ते व्यावसायिक गैरवर्तन म्हणून आढळल्यास बार कौंसिलसह न्यायालय देखील त्याचा गंभीरपणे विचार करू शकतं.

पूनम अपराज 

मुंबई -  संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या दिल्ली बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार आरोपींना आज पहाटे तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात आले. पहाटे साडेपाच वाजता जल्लादाने  खटका ओढला आणि चारही आरोपींना फासावर लटकवले आणि गेल्या सव्वासात वर्षांपासून न्यायाची वाट पाहत असलेल्या दिल्लीतीत निर्भयाला न्याय मिळाला. ही शिक्षा फक्त या चार गुन्हेगारांना झालेली नाही तर समाजातील दुष्प्रवृत्तीला मिळालेली शिक्षा आहे अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.आम्ही जेव्हा कठोर शिक्षेची मागणी करतो तेव्हा ती केवळ गुन्हेगारासाठी नाही तर समाजातील अशा प्रवृत्तीच्या प्रत्येकासाठी असते जे अशा कृत्याचा विचार करतात, असे पुढे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले. फासावर लटवलेल्या चार नराधमांच्या वकिलाने न्यायव्यवस्थेचा जो वेळ वाया घालवला, ते व्यावसायिक गैरवर्तन म्हणून आढळल्यास बार कौंसिलसह न्यायालय देखील त्याचा गंभीरपणे विचार करू शकतं. तसेच चार दोषींनी फाशी लांबविण्यासाठी जो काही कायदेशीर पर्यायांचा फायदा घेतला. त्यामुळे न्यायालयाच्या न्यायव्यवस्थेवर शंका निर्माण करणारी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती. मात्र, अखेर न्याय मिळाला. या दोषींप्रमाणे कोणी कायद्याशी खेळतं किंवा आव्हान देतं ते अत्यंत चुकीचं आहे. लोकांमध्ये कायद्याप्रती सन्मान आणि विश्वास निर्माण झाला पाहिजे. एखादी याचिका कितीवेळा केली पाहिजे यावर विचार होणं गरजेचं आहे. पुनर्विचार याचिकेसाठीही मर्यादा असायला हवी असे देखील निकम पुढे म्हणाले. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपUjjwal Nikamउज्ज्वल निकमMumbaiमुंबई