शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल या महिन्यात येण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 18:58 IST

फेब्रुवारी महिन्यात सुनावणी पार पडली

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय कोर्टच निकालाची तारीख आणि निकालाची घोषणा करेल असे पुढे रवीश कुमार यांनी सांगितले. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी भारताची बाजू मांडली होती.

नवी दिल्ली - हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवल्याचा स्पष्ट आरोप भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केला होता. पाकिस्तानने या प्रकरणात व्हिएन्ना करार पायदळी तुडवला आहे. त्यामुळे कुलभूषण यांची तातडीने मुक्तता करण्यात यावी अशी मागणी भारतने केली होती. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी भारताची बाजू मांडली होती. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्ट ह्याच महिन्यात निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार कुलभूषण जाधव प्रकरणी येत्या काही आठवड्यात निकाल येण्याची शक्यता असून याबाबत तोंडी माहिती मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टच निकालाची तारीख आणि निकालाची घोषणा करेल असे पुढे रवीश कुमार यांनी सांगितले. 

कसं घेतलं कुलभूषण यांना पाकिस्तानने ताब्यात ?

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून मार्च २०१६ मध्ये भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण सुधीर जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यांच्यावर लष्करी न्यायालयात खटला चालविण्यात येऊन ताबडतोब एप्रिल २०१७ मध्ये फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली. भारताने प्रचंड दबाव आणल्यानंतर पाकिस्तानने कुलभूषण यांच्या पत्नी व आईला त्यांना भेटण्याची परवानगी दिली. या भेटीच्या वेळीही दोघींना अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली. पाकिस्तानच्या या जुलुमाविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली.

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने २०१७ मध्ये कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देऊन पाकिस्तानचे नाक दाबले. या खटल्यात भारताची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी पाकिस्तानला बेनकाब केले. व्हिएन्ना करारानुसार एखाद्या परदेशी नागरिकाला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याला उच्चस्तरीय मदत देण्यात यावी, कायदेशीर बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी असा जागतिक करार करण्यात आला आहे. पाकिस्तानने या कराराचे उल्लंघन करून कुलभूषण यांना कोणत्याही प्रकारे बचावाची संधी दिली नाही. कुलभूषण जाधव हे दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचा एकही पुरावा पाकिस्तानला देता आला नाही. कुलभूषण यांचा कबुलीजबाबही दबावाखाली घेण्यात आल्याचे स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे कुलभूषण यांची तात्काळ मुक्तता करण्यात यावी अशी मागणी साळवे यांनी केली होती. या खटल्याचा निकाल लवकरच ह्या महिन्यात लागण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने भारताचे लक्ष आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निकालाकडे लागले आहे. 

 

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवInternationalआंतरराष्ट्रीयCourtन्यायालयPakistanपाकिस्तान