शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आधी केरळ, आता कर्नाटक..२ राज्य पण तस्करीची कहाणी सारखीच; राजकीय कनेक्शननं संशय वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 12:17 IST

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने तस्करीशी जोडल्या गेलेल्या मंत्र्‍याचे नाव उघड करावे अशी मागणी भाजपाने केली आहे

नवी दिल्ली - तेच सोनं, तीच तस्करी आणि दुबई कनेक्शन...५ वर्षापूर्वी केरळमध्ये सोने तस्करीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. तेच आता कर्नाटकात होताना दिसत आहे. केरळमध्येही तत्कालीन नेत्यांभोवती संशयाचं वादळ होते, आज पुन्हा नेत्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित होत आहे. कर्नाटकातील कन्नड अभिनेत्री रान्या राव तस्करी प्रकरणी चर्चेत आली आहे. रान्या रावला ३ मार्च रोजी दुबईच्या सोने तस्करी आरोपात बंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून तब्बल १५ किलो सोने जप्त करण्यात आले आहे ज्याची किंमत १२.५६ कोटी इतकी आहे.

तपासात रान्याचे राजकीय कनेक्शन समोर आले आहे. रान्याच्या फोनमध्ये अनेक नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक सापडले. त्यात सध्याचे आणि माजी मंत्र्‍यांचाही समावेश आहे. या प्रकरणाचा डीआरआय तपास करत असून इतक्या प्रभावशाली लोकांसोबत रान्याचा संपर्क कसा, या संपूर्ण संघटित नेटवर्कचं संभाव्य कनेक्शन तपासलं जात आहे. 

भाजपाचा दावा काय?

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने तस्करीशी जोडल्या गेलेल्या मंत्र्‍याचे नाव उघड करावे अशी मागणी भाजपाने केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणात समोर आलेल्या मंत्र्‍यांच्या नावाचा खुलासा करावा. रान्याने ३० हून अधिक वेळा परदेश दौरा केला, इथं परतल्यावर तिला प्रोटोकॉल दिला होता. एक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी म्हणून रान्याला विमानतळावर पोलीस एस्कॉर्टसह स्पेशल ट्रिटमेंट मिळाली आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष बीवाय विजेयद्र यांनी सांगितले. रान्या राव आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांची मुलगी आहे. रान्या रावला तपासातून सूट दिले होती म्हणजे ती मंत्र्‍यासह अनेक दिग्गजांच्या संपर्कात होती हे दिसून येते. हवाला ऑपरेटर, सोने तस्करी करणारे माफिया, आमदार आणि माजी मंत्री हे सर्व यात सहभागी आहेत. या सर्वांची नावे जाहीर केली पाहिजेत अशी मागणी भाजपाने केली. 

दरम्यान, या प्रकरणाशी निगडीत राजकीय कनेक्शनची चौकशी करायला हवी. या घोटाळ्याची तुलना भाजपाने केरळातील अशाच प्रकरणाशी केली. ५ जुलै २०२० रोजी केरळच्या तिरूवनंतपुरम विमानतळावर अधिकाऱ्यांनी ३० किलोहून अधिक सोने असलेली बॅग पकडली होती. यात १५ कोटीहून अधिक सोने होते. याचा तपास केला असता स्वप्ना सुरेश, संदीप नायर यांना बंगळुरूत अटक करण्यात आली. तपासात या सोने तस्करांच्या टोळीला राजकीय वरदहस्त असल्याचं समोर आले. या प्रकाराने केरळमधील सत्ताधारी वामपंथी सरकार वादात सापडलं होते.  

टॅग्स :GoldसोनंSmugglingतस्करी