शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

औरंगाबादमध्ये बेफाम वाहन चालकांविरोधात पोलीस नोंदविणार गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 14:04 IST

निष्काळजीपणे वाहने पळविणाऱ्यांविरोधात आता दंडात्मक कारवाईसोबतच गुन्हे नोंदविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

औरंगाबाद : नियम मोडून वाहन चालविल्याने अपघात होतात, हे माहीत असूनही निष्काळजीपणे वाहने पळविणाऱ्यांविरोधात आता दंडात्मक कारवाईसोबतच गुन्हे नोंदविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. विशेष म्हणजे यात ट्रिपलसीट दुचाकीचालक आणि राँगसाईडने वाहने पळविणारे वाहनचालक पोलिसांच्या हिटलिस्टवर आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, जालना रस्त्यावर जडवाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी बीड बायपास हा पर्यायी रस्ता उपलब्ध करण्यात आला होता. आता बायपासच्या पलीकडे नागरी वसाहती अस्तित्वात आल्याने या रस्त्यावरील रहदारीत प्रचंड वाढ झाली. परिणामी, या रस्त्यावर अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. आॅगस्ट महिन्यात बायपासवर वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचे मृत्यू झाले. अपघात रोखण्यासाठी बायपासवरील जडवाहतूक सकाळी आणि सायंकाळी प्रायोगिक तत्त्वावर बंद करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी नुकताच घेतला. असे असताना आज आणखी एका जणाचा अपघातात मृत्यू झाला. सुसाट जीपचालकामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले. बायपासवर राँगसाईडने वाहने पळविणाऱ्यांमुळेही प्राणांतिक अपघाताचा धोका अधिक आहे. 

गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले ट्रिपलसीट दुचाकीचालक, सुसाट आणि राँगसाईडने वाहनचालक, सिग्नल तोडून पळणाऱ्या वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका अधिक असतो. सिग्नल तोडून पळणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. शिवाय कारवाई करणाऱ्या पोलिसांनाही जीव धोक्यात घालावा लागतो. या कारवाईचा क ोणताही परिणाम वाहनचालकांवर होत नसल्याने अशा वाहनचालकांविरोधात भादंवि २७९ कलमानुसार गुन्हे नोंदविण्याचे आदेश देण्यात आले.-डॉ. दीपाली धाटे-घाडगे, पोलीस उपायुक्त