शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तामिळनाडूत पोलिसांनी जप्त केले ५०० कोटींचे पाचूचे शिवलिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 05:25 IST

त्रिची : तामिळनाडू पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) मूर्ती शाखेने (आयडॉल विंग) तंजावूर येथील एका व्यक्तीच्या बँक लॉकरमधून तब्बल ...

त्रिची : तामिळनाडू पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) मूर्ती शाखेने (आयडॉल विंग) तंजावूर येथील एका व्यक्तीच्या बँक लॉकरमधून तब्बल ५०० कोटी रुपये किमतीचे पाचूचे शिवलिंग जप्त केले आहे.

सीआयडीच्या मूर्ती शाखेचे एडीजीपी के. जयंती मुरली यांनी चेन्नईत पत्रकारांना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, तंजावूर येथील अरुलानंद नगरातील लंगवल होम्स येथे पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे छापा मारला. एन. एस. अरुण याची चौकशी करण्यात आली. 

अरुण याने पोलिसांना सांगितले की, त्याचे ८० वर्षीय वडील एन. ए. सामियप्पन यांनी तंजावूर येथील एका बँक लॉकरमध्ये हे शिवलिंग ठेवले आहे. त्यानुसार पोलिसांनी सामियप्पन याची चौकशी केली. त्याने बँक लॉकरमधून शिवलिंग काढून दिले.पोलिसांनी सांगितले की, एकाच पाचूमध्ये काेरण्यात आलेल्या या शिवलिंगाचे वजन ५३० ग्रॅम असून उंची ८ सें.मी. आहे. रत्नपारखींद्वारे त्याची शुद्धता तपासण्यात आली. त्यात शिवलिंग शुद्ध पाचूचे असल्याचे आढळून आले. त्याची बाजारभावानुसार किंमत ५०० कोटी रुपये आहे.

मंदिरातून चोरल्याची शंकापोलिसांनी सांगितले की, हे शिवलिंग दक्षिण भारतातील एखाद्या मंदिरातून चोरलेले असू शकते. ते कोणत्या मंदिराशी संबंधित आहे, याचा शोध वैज्ञानिक तपासणीच्या माध्यमातून घेतला जाईल. २०१६ मध्ये नागपट्टीणम जिल्ह्यातील थिरुकुवलाई येथील शिवमंदिरातून एक पाचूचे शिवलिंग चोरीला गेले होते. ते हेच आहे का, हेही पडताळून पाहिले जात आहे.इंडिया प्राईड प्रकल्पाचे सहसंस्थापक एस. विजयकुमार यांनी सांगितले की, शिवलिंगाची अंदाजित किंमत ५०० कोटी रुपये गृहित धरणे ही निव्वळ कल्पना आहे. दक्षिण भारतातील मंदिरातून पाचूच्या शिवलिंगांच्या चोऱ्या होण्याच्या घटना १९८० च्या दशकापासून घडत आहेत.