शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आरोप फेटाळलेत; उच्च न्यायालयात दाखल केले प्रतिज्ञापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 02:59 IST

इराणी यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनदरम्यान इराणी, त्यांची पत्नी आणि दोन मुलांना पोलिसांनी १६ मे रोजी त्यांच्या गोरेगाव (पश्चिम) येथील  राहत्या घराबाहेर विनाकारण मारहाण केली

मुंबई : मार्च अखेरपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना पोलिसांनी काही पादचाऱ्यांना मारहाण केल्याने त्यात काही लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी फेटाळला. तसे प्रतिज्ञापत्र शुक्रवारी उच्च न्यायालयात दाखल केले. जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक इकबाल आवळकर यांनी मानवाधिकार कार्यकर्ते व वकील फिरदौस इराणी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर प्रतिज्ञापत्र दाखल केले.

इराणी यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनदरम्यान इराणी, त्यांची पत्नी आणि दोन मुलांना पोलिसांनी १६ मे रोजी त्यांच्या गोरेगाव (पश्चिम) येथील  राहत्या घराबाहेर विनाकारण मारहाण केली. लॉकडाऊनमधील निर्बंधाच्या नावाखाली पोलिसांनी अनेक लोकांना नाहक मारहाण केल्याचे सिद्ध करण्यासाठी इराणी यांनी मानवी अधिकार संघटनेचा अहवालाचा न्यायालयाला हवाला दिला. पोलिसांच्या मारहाणीत १५ जणांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यात मुंबईतील समीर जमाल खान व राजू वेलू देवेंद्र अशी पीडितांची नावे आहेत. दक्षिण मुंबई व जुहू पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मारहाण केल्याने खान याचा मृत्यू झाला, असे इराणी यांनी याचिकेत म्हटले आहे. आवळकर यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, खान हातगाडीवरून रेफ्रिजरेटर आणि काही कपडे नळबाजारात नेत होता. त्याला कोणत्याही पोलिसाने अडविले नव्हते, हे सीसीटीव्ही फुटेजवरून सिद्ध होते.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसHigh Courtउच्च न्यायालय