शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आरोप फेटाळलेत; उच्च न्यायालयात दाखल केले प्रतिज्ञापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 02:59 IST

इराणी यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनदरम्यान इराणी, त्यांची पत्नी आणि दोन मुलांना पोलिसांनी १६ मे रोजी त्यांच्या गोरेगाव (पश्चिम) येथील  राहत्या घराबाहेर विनाकारण मारहाण केली

मुंबई : मार्च अखेरपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना पोलिसांनी काही पादचाऱ्यांना मारहाण केल्याने त्यात काही लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी फेटाळला. तसे प्रतिज्ञापत्र शुक्रवारी उच्च न्यायालयात दाखल केले. जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक इकबाल आवळकर यांनी मानवाधिकार कार्यकर्ते व वकील फिरदौस इराणी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर प्रतिज्ञापत्र दाखल केले.

इराणी यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनदरम्यान इराणी, त्यांची पत्नी आणि दोन मुलांना पोलिसांनी १६ मे रोजी त्यांच्या गोरेगाव (पश्चिम) येथील  राहत्या घराबाहेर विनाकारण मारहाण केली. लॉकडाऊनमधील निर्बंधाच्या नावाखाली पोलिसांनी अनेक लोकांना नाहक मारहाण केल्याचे सिद्ध करण्यासाठी इराणी यांनी मानवी अधिकार संघटनेचा अहवालाचा न्यायालयाला हवाला दिला. पोलिसांच्या मारहाणीत १५ जणांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यात मुंबईतील समीर जमाल खान व राजू वेलू देवेंद्र अशी पीडितांची नावे आहेत. दक्षिण मुंबई व जुहू पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मारहाण केल्याने खान याचा मृत्यू झाला, असे इराणी यांनी याचिकेत म्हटले आहे. आवळकर यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, खान हातगाडीवरून रेफ्रिजरेटर आणि काही कपडे नळबाजारात नेत होता. त्याला कोणत्याही पोलिसाने अडविले नव्हते, हे सीसीटीव्ही फुटेजवरून सिद्ध होते.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसHigh Courtउच्च न्यायालय