शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आरोप फेटाळलेत; उच्च न्यायालयात दाखल केले प्रतिज्ञापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 02:59 IST

इराणी यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनदरम्यान इराणी, त्यांची पत्नी आणि दोन मुलांना पोलिसांनी १६ मे रोजी त्यांच्या गोरेगाव (पश्चिम) येथील  राहत्या घराबाहेर विनाकारण मारहाण केली

मुंबई : मार्च अखेरपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना पोलिसांनी काही पादचाऱ्यांना मारहाण केल्याने त्यात काही लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी फेटाळला. तसे प्रतिज्ञापत्र शुक्रवारी उच्च न्यायालयात दाखल केले. जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक इकबाल आवळकर यांनी मानवाधिकार कार्यकर्ते व वकील फिरदौस इराणी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर प्रतिज्ञापत्र दाखल केले.

इराणी यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनदरम्यान इराणी, त्यांची पत्नी आणि दोन मुलांना पोलिसांनी १६ मे रोजी त्यांच्या गोरेगाव (पश्चिम) येथील  राहत्या घराबाहेर विनाकारण मारहाण केली. लॉकडाऊनमधील निर्बंधाच्या नावाखाली पोलिसांनी अनेक लोकांना नाहक मारहाण केल्याचे सिद्ध करण्यासाठी इराणी यांनी मानवी अधिकार संघटनेचा अहवालाचा न्यायालयाला हवाला दिला. पोलिसांच्या मारहाणीत १५ जणांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यात मुंबईतील समीर जमाल खान व राजू वेलू देवेंद्र अशी पीडितांची नावे आहेत. दक्षिण मुंबई व जुहू पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मारहाण केल्याने खान याचा मृत्यू झाला, असे इराणी यांनी याचिकेत म्हटले आहे. आवळकर यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, खान हातगाडीवरून रेफ्रिजरेटर आणि काही कपडे नळबाजारात नेत होता. त्याला कोणत्याही पोलिसाने अडविले नव्हते, हे सीसीटीव्ही फुटेजवरून सिद्ध होते.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसHigh Courtउच्च न्यायालय