शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आरोप फेटाळलेत; उच्च न्यायालयात दाखल केले प्रतिज्ञापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 02:59 IST

इराणी यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनदरम्यान इराणी, त्यांची पत्नी आणि दोन मुलांना पोलिसांनी १६ मे रोजी त्यांच्या गोरेगाव (पश्चिम) येथील  राहत्या घराबाहेर विनाकारण मारहाण केली

मुंबई : मार्च अखेरपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना पोलिसांनी काही पादचाऱ्यांना मारहाण केल्याने त्यात काही लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी फेटाळला. तसे प्रतिज्ञापत्र शुक्रवारी उच्च न्यायालयात दाखल केले. जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक इकबाल आवळकर यांनी मानवाधिकार कार्यकर्ते व वकील फिरदौस इराणी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर प्रतिज्ञापत्र दाखल केले.

इराणी यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनदरम्यान इराणी, त्यांची पत्नी आणि दोन मुलांना पोलिसांनी १६ मे रोजी त्यांच्या गोरेगाव (पश्चिम) येथील  राहत्या घराबाहेर विनाकारण मारहाण केली. लॉकडाऊनमधील निर्बंधाच्या नावाखाली पोलिसांनी अनेक लोकांना नाहक मारहाण केल्याचे सिद्ध करण्यासाठी इराणी यांनी मानवी अधिकार संघटनेचा अहवालाचा न्यायालयाला हवाला दिला. पोलिसांच्या मारहाणीत १५ जणांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यात मुंबईतील समीर जमाल खान व राजू वेलू देवेंद्र अशी पीडितांची नावे आहेत. दक्षिण मुंबई व जुहू पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मारहाण केल्याने खान याचा मृत्यू झाला, असे इराणी यांनी याचिकेत म्हटले आहे. आवळकर यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, खान हातगाडीवरून रेफ्रिजरेटर आणि काही कपडे नळबाजारात नेत होता. त्याला कोणत्याही पोलिसाने अडविले नव्हते, हे सीसीटीव्ही फुटेजवरून सिद्ध होते.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसHigh Courtउच्च न्यायालय