शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

गुन्हेगारांना मारण्याचा परवाना पोलिसांना दिलेला नाही; उच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 07:57 IST

लखनभय्या बनावट चकमक प्रकरणात प्रदीप शर्माला शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: २००६ च्या लखनभय्या बनावट चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाने महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली. रामनारायण गुप्ता याच्यावर १० गुन्हे दाखल केले असले तरी पोलिस किंवा अन्य कोणालाही त्याच्या हत्येचा परवाना दिलेला नाही. याप्रकरणात कायद्याचे पालन करण्याऐवजी पोलिसांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत रामनारायणची हत्या केली. नागरिकांचे रक्षण करणे, हे सर्व आरोपी पोलिसांचे कर्तव्य होते. मात्र, ते त्यांचे कृत्य त्यांच्या कर्तव्याशी विसंगत होते, असेही न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे.

पोलिसांना गणवेशधारी गुन्हेगार होण्याची मुभा नाही!

पोलिस कोठडीत होणाऱ्या मृत्यूंना आळा घातला पाहिजे. त्याकडे गांभीर्याने पाहून कठोर पावले उचलावी लागतील. सरकारचे शस्त्र आणि नागरिकांचे रक्षणकर्ते, कायद्याचे पालन करणारे पोलिसच आरोपी असल्याने त्यांना दया दाखवण्यास जागा नाही. कायदा हातात घेऊन नागरिकांविरोधात क्रूर गुन्हा करण्याची त्यांना परवानगी नाही. कायद्याच्या पालनकर्त्यांना गणवेशधारी गुन्हेगार म्हणून कर्तव्य करण्याची परवानगी देऊ शकत नाही. जर, अशा कृत्यांना परवानगी दिली तर अराजकता माजेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

राज्य एसआयटीची कामगिरी लज्जास्पद

  • या घटनेचा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अनिल भेडा याची आरोप निश्चितीपूर्वी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्याचे अपहरण आणि हत्येचा तपास २०११ पासून राज्य सीआयडीकडे आहे.
  • सरकारी वकिलांनी या तपासाचा अहवाल सादर केला असता तपासात काहीही प्रगती नसल्याचे आमच्या निदर्शनास आले. 
  • हत्येला एका दशकाहून अधिक काळ लोटला तरीही तपास पूर्ण झालेला नाही, ही बाब लज्जास्पद आहे. या घटनेतला एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अनिल भेडाची न्यायालयात साक्ष देण्यापूर्वी हत्या करण्यात आली. त्याचे मारेकरी अद्याप मोकाट आहेत. 
  • ही न्यायाची चेष्टा आहे. कायद्याचे पालन करण्याचे ज्यांचे कर्तव्य आहे, अशा पोलिसांनी भेडाच्या मारेकऱ्यांना शोधण्याची तसदी घेतलेली नाही.
  • पोलिसांचा यंत्रणेवरचा विश्वास उडू नये, यासाठी सीआयडी तपास पूर्ण करेल, अशी आशा आम्ही करतो, असेही न्यायालयाने नमूद केले. 

काय आहे प्रकरण?

  • ११ नोव्हेंबर २००६ रोजी पोलिसांनी रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभय्या व त्याचा मित्र अनिल भेडा यांना वाशीमधून पकडले आणि वर्सोवा येथे लखनभय्याची बनावट चकमकीत हत्या केली. तर अनिल भेडाला एक महिना डांबून ठेवले.
  • याप्रकरणी लखनभय्याच्या भावाने उच्च न्यायालयात धाव घेत हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्याची विनंती केली.
  • न्यायालयाने त्याचे म्हणणे मान्य करत एसआयटी स्थापन केली आणि एसआयटीने सखोल तपास करून शर्मा व अन्य पोलिसांनी लखनभय्याची बनावट चकमकीत हत्या केल्याचे उघड केले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
  • २०१३ मध्ये सत्र न्यायालयाने २२ आरोपींपैकी २१ जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर प्रदीप शर्माची निर्दोष सुटका केली. या सर्वांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. तर लखनभय्याचा भाऊ आणि राज्य सरकारने प्रदीप शर्माच्या निर्दोष मुक्तततेला उच्च न्यायालयात आव्हान दिले.

एसआयटीचे केले कौतुक

आरोपींनी केलेला गुन्हा उजेडात आणण्यासाठी एसआयटीने प्रामाणिकपणे मेहनत घेतली. अनेक साक्षीदार फितूर होत असतानाही एसआयटीने उल्लेखनीय कामगिरी केली. एसआयटीचे प्रमुख के. एम. एम. प्रसन्ना, मनोज चाळके, विनय घोरपडे, सुनील गावकर यांनी प्रामाणिकपणे काम करत पुरावे गोळा केले.

टॅग्स :Pradeep Sharmaप्रदीप शर्माMumbaiमुंबईPoliceपोलिसHigh Courtउच्च न्यायालय