शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

PMC बँक प्रकरण : आम्ही जादूगार नाही की कांडी फिरवताच चमत्कार होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 19:39 IST

कोर्टाचा याचिकाकर्त्यांना सबुरीचा सल्ला

ठळक मुद्दे याप्रकरणी पुढील सुनावणी १९ नोव्हेंबरला होणार आहे. १३ नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून आरबीआयला निर्देश आज देण्यात आले आहेत. तुम्ही पीएमसी बँक खातेदारांचे बँकेत अडकलेले पैसे वाचविण्यासाठी काय पावलं उचलीत असा सवाल आरबीआयला विचारला आहे.

मुंबई - PMC (पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र सहकारी) बँक प्रकरणी खातेदारांना दिलासा मिळावा म्हणून काय पावलं उचलली? याबाबत १३ नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे मुंबईउच्च न्यायालयाकडून आरबीआयला निर्देश आज देण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी १९ नोव्हेंबरला होणार आहे. आज सुनावणीदरम्यान 'आम्ही जादूगर नाही की कांडी फिरवताच चमत्कार होईल' असा कोर्टाने याचिकाकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.पीएमसी बँक प्रकरणी खातेदारांना आरबीआयने बँकेतून पैसे काढण्यासाठी घातलेल्या मर्यादेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. आरबीआयच्या वतीने वकील व्यंकटेश धोंड यांनी युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालायने तुम्ही पीएमसी बँक खातेदारांचे बँकेत अडकलेले पैसे वाचविण्यासाठी काय पावलं उचलीत असा सवाल आरबीआयला विचारला आहे.ऐन सणासुदीच्या कालावधीत हजारो खातेदारांना आर्थिकदृट्या असहाय्य बनविलेल्या पीएमसीच्या घोटाळ्याप्रकरणी जलद कार्यवाही करावी, या मागणीसाठी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या सहआयुक्त राजवर्धन यांन खातेदारांच्या तीन स्वतंत्र शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेवून गाऱ्हाणी मांडली. याप्रकरणाचा तपास जलदगतीने सुरु असून महिन्याभरात बॅँकेचे कामकाज पूर्ववत सुरु केले जाईल, असे आश्वासन राजवर्धन यांनी दिले असल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले होते.अनिमियत कर्ज प्रकरणामुळे तोट्यात आलेल्या पीएमसी बॅँकेच्या ठेवीदारांवर आपली रक्कम काढण्यात गेल्या दीड महिन्यापासून निर्बंध घातले आहेत. तसेच आता मुंबई उच्च न्यायालयाने देखील आरबीआयला सवाल करत खातेदारांना तूर्तास दिलासा दिला आहे. 

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकHigh Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबईReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक