शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीने आत्महत्येपूर्वी मांडली व्यथा; घर प्रकरणी फसवणूक, अन्य यंत्रणांवरही ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 07:26 IST

उच्च न्यायालयाने तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसह मोहिनी यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : घराच्या प्रकरणात झालेल्या फसवणुकीनंतर सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यात न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीने दोन मुलांसह आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून समोर आली आहे. या चिठ्ठीत न्यायव्यवस्थेसह इतरही महत्त्वाच्या व्यक्तींप्रती नाराजी व्यक्त केली आहे. 

स्वातंत्र्यसैनिक नारायणदास कामवायनी यांच्या पत्नी मोहिनी (८७) यांनी मुलगा दिलीप (६७) व दिव्यांग मुलगी कांता (६५) यांच्यासह आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वाशी सेक्टर ४ येथे त्या दोन मुलांसह राहायला होत्या. त्यांचे घरावरून एका परिचयाच्या व्यक्तीसोबत कायदेशीर वाद सुरू होता. या व्यक्तीने ते घर बळकावण्याचा प्रयत्न करून आपल्यावरच गुन्हा दाखल केल्याचा आरोप मोहिनी यांनी केला होता.

या प्रकरणात उच्च न्यायालयाने तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसह मोहिनी यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. मात्र, नुकसानभरपाईऐवजी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. यासाठी त्या २०१२ मध्ये उपोषणालाही बसल्या होत्या. न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशाराही त्यांनी तत्कालीन राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात दिला होता. २०१६ नंतर हे प्रकरण लांबत गेल्याने मोहिनी यांनी शनिवारी रात्री विषारी औषध प्राशन करुन दोन मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न केला. 

मोहिनी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत न्यायव्यवस्था व इतर यंत्रणा आपल्याला न्याय देऊ शकल्या नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी उल्लेख केलेल्या जुन्या प्रकरणात यापूर्वीच गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. - रमेश चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक, वाशी