शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बापरे...! मोटारसायकल, स्कूटरवरून तब्बल 42 हजार किलो तांदळाची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 19:16 IST

आसामच्या सालचापरा रेल्वे टर्मिनलमधून 9119 क्विंटल (9.19 लाख किलो) तांदूळ 57 ट्रकांमधून मणिपूरच्या कोईरेंगेईला पाठविण्यात आला होता.

नवी दिल्ली : मोटारसायकल, स्कूटरवरून 42 हजार किलो तांदूळ चोरी करण्यात आले? हे कोणाला सांगून खरे वाटेल का? नाही ना...पण भारतीय खाद्य निगम (एफसीआई) च्या अधिकाऱ्यांनी हा प्रताप करून दाखविला आहे. आसाममध्ये काही अधिकाऱ्यांवर खासगी ट्रान्सपोर्टशी हातमिळविणी करत तब्बल 2.60 लाख किलोंचा तांदूळ चोरल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी तांदूळ ट्रकातून नेण्यात आल्याचे जरी म्हटले असले तरीही रजिस्टरमध्ये स्कूटर आणि बाईकचे नंबर दिले आहेत. 

आसामच्या सालचापरा रेल्वे टर्मिनलमधून 9119 क्विंटल (9.19 लाख किलो) तांदूळ 57 ट्रकांमधून मणिपूरच्या कोईरेंगेईला पाठविण्यात आला होता. 7 ते 22 मार्च, 2016 या काळात रवाना झालेल्या या तांदळाच्या ट्रकांना 275.5 किमीचे अंतर कापण्यासाठी दोन महिने लागले. खासगी ट्रान्सपोर्ट झेनिथ एंटरप्रायझेसच्या ट्रकांना तांदूळ वाहतुकीचा परवाना देण्यात आला होता. एफसीआयच्या तक्रारीनंतर सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास  केला आहे. 

तपासामध्ये अशी माहिती समोर आली की, 16 ट्रकमधून 85 लाख रुपयांचा 2601.63 क्विंटल तांदूळ सालचापरा येथून बाहेर पडला खरा पण अपेक्षित ठिकाणी पोहोचलाच नाही. मात्र, रजिस्टरमध्ये हा तांदूळ कोईरेंगेईला पोहोचल्याचे नमूद करण्यात आले आहे. ट्रान्सपोर्टरने दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे की, रस्त्यात ट्रक बिघडल्याने दुसऱ्या ट्रकांमधून हा तांदूळ पोहोचविण्यात आला. मात्र, चौकशीमध्ये असे आढळले की, या बिघडलेल्या ट्रकांमधून तांदळाची पोती ज्या वाहनांमध्ये भरण्यात आली ती वाहने ट्रक नव्हतीच. 

या वाहनांच्या क्रमांकावर आरटीओकडे एलएमएल स्कूटर, होंडा अॅक्टिव्हा, बाईक, बस, पाण्याचे टँकर, व्हॅन, कार सह अन्य प्रकारच्या वाहनांची नोंद आहे. तर काही नंबर असे दिलेले आहेत, की हे नंबरच आरटीओकडे रजिस्टर नाहीत. चोरी झालेल्या तांदळांपैकी 26,300 किलो स्कूटर आणि 16,300 किलो बाइकवरून नेण्यात आल्याची नोंद आहे.