शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बापरे...! मोटारसायकल, स्कूटरवरून तब्बल 42 हजार किलो तांदळाची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 19:16 IST

आसामच्या सालचापरा रेल्वे टर्मिनलमधून 9119 क्विंटल (9.19 लाख किलो) तांदूळ 57 ट्रकांमधून मणिपूरच्या कोईरेंगेईला पाठविण्यात आला होता.

नवी दिल्ली : मोटारसायकल, स्कूटरवरून 42 हजार किलो तांदूळ चोरी करण्यात आले? हे कोणाला सांगून खरे वाटेल का? नाही ना...पण भारतीय खाद्य निगम (एफसीआई) च्या अधिकाऱ्यांनी हा प्रताप करून दाखविला आहे. आसाममध्ये काही अधिकाऱ्यांवर खासगी ट्रान्सपोर्टशी हातमिळविणी करत तब्बल 2.60 लाख किलोंचा तांदूळ चोरल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी तांदूळ ट्रकातून नेण्यात आल्याचे जरी म्हटले असले तरीही रजिस्टरमध्ये स्कूटर आणि बाईकचे नंबर दिले आहेत. 

आसामच्या सालचापरा रेल्वे टर्मिनलमधून 9119 क्विंटल (9.19 लाख किलो) तांदूळ 57 ट्रकांमधून मणिपूरच्या कोईरेंगेईला पाठविण्यात आला होता. 7 ते 22 मार्च, 2016 या काळात रवाना झालेल्या या तांदळाच्या ट्रकांना 275.5 किमीचे अंतर कापण्यासाठी दोन महिने लागले. खासगी ट्रान्सपोर्ट झेनिथ एंटरप्रायझेसच्या ट्रकांना तांदूळ वाहतुकीचा परवाना देण्यात आला होता. एफसीआयच्या तक्रारीनंतर सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास  केला आहे. 

तपासामध्ये अशी माहिती समोर आली की, 16 ट्रकमधून 85 लाख रुपयांचा 2601.63 क्विंटल तांदूळ सालचापरा येथून बाहेर पडला खरा पण अपेक्षित ठिकाणी पोहोचलाच नाही. मात्र, रजिस्टरमध्ये हा तांदूळ कोईरेंगेईला पोहोचल्याचे नमूद करण्यात आले आहे. ट्रान्सपोर्टरने दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे की, रस्त्यात ट्रक बिघडल्याने दुसऱ्या ट्रकांमधून हा तांदूळ पोहोचविण्यात आला. मात्र, चौकशीमध्ये असे आढळले की, या बिघडलेल्या ट्रकांमधून तांदळाची पोती ज्या वाहनांमध्ये भरण्यात आली ती वाहने ट्रक नव्हतीच. 

या वाहनांच्या क्रमांकावर आरटीओकडे एलएमएल स्कूटर, होंडा अॅक्टिव्हा, बाईक, बस, पाण्याचे टँकर, व्हॅन, कार सह अन्य प्रकारच्या वाहनांची नोंद आहे. तर काही नंबर असे दिलेले आहेत, की हे नंबरच आरटीओकडे रजिस्टर नाहीत. चोरी झालेल्या तांदळांपैकी 26,300 किलो स्कूटर आणि 16,300 किलो बाइकवरून नेण्यात आल्याची नोंद आहे.