शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कर्जत-खांडस गावातील एकाची हत्या; ११ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 01:46 IST

पाण्याची पाइपलाइन टाकण्यावरून झाला होता वाद

नेरळ : कर्जत तालुक्यातील खांडस येथे नळपाणी योजनेची पाइपलाइन टाकण्याच्या कामात अडथळा ठरत असलेल्या एका ४९ वर्षीय व्यक्तीची ऐनघर कुटुंबातील सदस्यांनी मिळून निर्घृण हत्या केली आहे आणि ते जंगलात पळून गेले होते. पोलिसांनी मंगळवारी दिवसभरात याप्रकरणी ११ जणांना अटक केली असून, त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण कर्जत तालुका हादरला आहे.

कर्जत तालुक्यातील खांडस गावात नळपाणी योजनेचे पाइपलाइन टाकण्यावरून शिवाजी पाटील यांनी हरकत घेतली होती. या ठिकाणी आपल्याला घर बांधायचे असून पाइपलाइन टाकू नका, अशी सूचना पाटील यांनी केली. त्यामुळे पाइपलाइनचे काम करणाऱ्या ऐनकर कुटुंबाला याचा राग आला. या सर्वांनी ४ मे रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास गैरकायद्याची मंडळी जमवली आणि पाइपलाइन टाकायला हरकत घेणारे शिवाजी पाटील यांना मनोहर ऐनकर, जनार्दन ऐनकर, विठ्ठल ऐनकर, प्रकाश ऐनकर, बाळाराम ऐनकर आणि पुंडलिक ऐनकर यांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण सुरू असताना विलास ऐनकर याने लोखंडी टिकावाच्या साहाय्याने तर मच्छींद्र ऐनकर यांनी फावड्याने शिवाजी गोविंद पाटील यांच्यावर घाव घालण्यास सुरुवात केली. कैलाश ऐनकर आणि जगदीश ऐनकर या दोघांनी चाकूने शिवाजी पाटील यांच्या छातीवर आणि पोटावर वार केले आणि शेवटी गणेश ऐनकर याने डोक्यात तलवारीने घाव घातला आणि सर्व जण फरार झाले.

या मारहाणीमुळे शिवाजी पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना त्यांचे वडील गोविंद पाटील यांनी मुलाला उचलून खांडस येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात नेले; परंतु प्रचंड रक्तस्रावामुळे खांडस प्राथमिक आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र, पनवेलकडे जाताना रस्त्यातच शिवाजी यांचा मृत्यू झाला.आरोपींना पकडण्यात नेरळ पोलिसांना यशघटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस खांडस गावात पोहोचले. तेव्हा जखमीला उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, जखमी शिवाजी पाटील यांचा या हाणामारीत मृत्यू झाला असल्याचे पोलिसांना समजले. खून करून पळालेल्यांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवातके ली.४ मेच्या रात्री तीन जणांना ताब्यात घेतल्यानंतर ५ मे रोजी दिवसभरात सर्व ११ जणांना पकडण्यात नेरळ पोलिसांना यश आले आहे.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस