शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

मिसिंग मिस्ट्रीचा करुण अंत, माय-लेकाचे अपहरण; मुलाची हत्या, वृद्धेची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 06:33 IST

पाच जणांना अटक, मालमत्ता नावावर करून घेण्यासाठी रोहिणी यांचे अपहरण करून त्यांना आधी राजस्थानात, त्यानंतर गोरेगाव परिसरात डांबून ठेवण्यात आल्याचे समजताच पोलिसांच्या तपास पथकाने तिथे धाव घेतली.

मुंबई - मालमत्तेच्या लोभापोटी माय-लेकाचे अपहरण करून त्यातील मुलाची हत्या करणाऱ्या पाच नराधमांना चेंबूर पोलिसांनी अटक केली आहे. ५ एप्रिलपासून हे माय-लेक बेपत्ता होते. अखेरीस वृद्धेची सुटका करण्यात पोलिसांना यश आले असले तरी मुलाची हत्या केल्याची कबुली पाच जणांनी दिली आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एकनाथ देसाई यांच्या फिर्यादीवरून हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

मूळचे कोल्हापूर येथील असलेल्या रोहिणी कांबळे (८०) आणि विशाल कांबळे (४४) या दोघांचे ५ एप्रिल रोजी चेंबूर येथील हॉटेलमधून अपहरण करण्यात आले. कोल्हापुरातील मालमत्तेवरून कोर्ट कचेरी सुरू असल्याने दोघे मुंबईत आले होते. रोहिणी यांच्या बहिणीने दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार २१ एप्रिलला पोलिसांत नोंदवली. त्यानंतर पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरली. २ मे रोजी अखेरीस या बेपत्ता नाट्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. 

निलंबित बेस्ट बसचालक मुनीर पठाण (४१, वडाळा), चालक रोहित अदमाने (४०, पवई), राजू दरवेश (४०, मीरा रोड), केअर टेकर ज्योती वाघमारे (३३, मानखुर्द) आणि प्रणव रामटेके (२५, कोल्हापूर) या पाच जणांनी कांबळे माय-लेकाचे अपहरण केले. रोहिणी कांबळे यांना सुरुवातीला राजस्थानात एका ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर गोरेगावातील रॉयल पाम ब्लॉक सेक्टरमध्ये ठेवले. दुसरीकडे मुलगा विशाल याला मालमत्ता खरेदी-विक्रीच्या बैठकीसाठी पनवेलला नेऊन एका व्हिलामध्ये हत्या करून  त्याचा मृतदेह बडोदा-अहमदाबाद महामार्गाच्या कडेला फेकून देण्यात आला. कांबळे माय-लेकाची मालमत्ता मिळविण्यासाठी हा कट रचण्यात आल्याची कबुली पाचही जणांनी दिली आहे. तपास सुरू असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. 

रोहिणी बचावल्यामालमत्ता नावावर करून घेण्यासाठी रोहिणी यांचे अपहरण करून त्यांना आधी राजस्थानात, त्यानंतर गोरेगाव परिसरात डांबून ठेवण्यात आल्याचे समजताच पोलिसांच्या तपास पथकाने तिथे धाव घेतली. तिथे रोहिणी यांच्यावर दोघांनी पाळत ठेवली होती. पथकाने त्या दोघांना ताब्यात घेत रोहिणी यांची सुटका केली. डांबून ठेवले असताना रोहिणी यांनी आवाज करू नये, यासाठी त्यांना सतत गुंगीचे औषध दिले जात होते. त्यांना पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला.