शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

महापौर गोळीबार ! मुंबईचे तज्ज्ञ तपासत आहेत गोळीबाराचे आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 23:42 IST

महापौर संदीप जोशी यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील गुंतागुंत उलगडून काढण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी मुंबईतील प्रोफेशन सायबर तज्ज्ञांची चमू नागपुरात बोलवून घेतली आहे.

ठळक मुद्देफोन कॉल्स आणि सीसीटीव्ही फुटेजची सांगड : गुंतागुंत सोडविण्यासाठी सुरू आहे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापौर संदीप जोशी यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील गुंतागुंत उलगडून काढण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी मुंबईतील प्रोफेशन सायबर तज्ज्ञांची चमू नागपुरात बोलवून घेतली आहे. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी गोळा केलेल्या फोन कॉल्स आणि सीसीटीव्ही फुटेजचा डाटा या चमूने आपल्या पद्धतीने तपासणे सुरू केले आहे. दुसरीकडे मंगळवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने भाजपाच्या एका निलंबित पदाधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याचे जोरदार वृत्त शहरात पसरले. या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असली तरी पोलिसांनी मात्र अधिकृत माहिती देण्याऐवजी मौन धारण करणे पसंत केल्यामुळे वृत्त खरे की खोटे, ते स्पष्ट होऊ शकले नाही.१७ डिसेंबरला लग्नाचा वाढदिवस असल्याने कौटुंबिक मित्रपरिवारासह जोशी वर्धा मार्गावरील एका ढाब्यावर जेवण करायला गेले होते. मध्यरात्री तेथून परत येत असताना त्यांच्या वाहनावर दुचाकीवर आलेल्या आरोपींनी तीन गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. हिवाळी अधिवेशन सुरू असताना ही घटना घडल्याने सरकारने त्याची गंभीर दखल घेत पोलिसांकडून घटनेची माहिती जाणून घेतली आणि तातडीने आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. दुसरीकडे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या गुन्ह्याचा तपास तडकाफडकी गुन्हे शाखेकडे सोपविला होता. अनेक ठाणेदारांचीही याकामी मदत घेण्यात आली. मात्र, आता एक महिना होत आला असूनही गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.विशेष म्हणजे, पोलिसांनी आतापावेतो ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि मोठ्या प्रमाणात फोन कॉल्सचा डाटा संकलित केला आहे. त्याची सांगड घालून गोळीबाराचे आरोपी शोधण्यासाठी स्थानिक पोलीस प्रयत्न करीत होते. पोलिसांना आतापर्यंतच्या तपासात काही महत्त्वाचे धागे हाती लागले. मात्र, गोळीबाराचे आरोपी निष्पन्न करण्याएवढे ते मजबूत नसल्याने वरिष्ठांनी आपल्या मदतीसाठी मुंबईहून सायबर तज्ज्ञांची चमू नागपुरात बोलवून घेतली आहे. ही चमू गोळीबाराचा उलगडा करण्यासाठी कामी लागली आहे.या पार्श्वभूमीवर, मंगळवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने भाजपाच्या एका निलंबित पदाधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याचे जोरदार वृत्त शहरात पसरले. या वृत्ताने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. प्रत्येक जण एकमेकांना या संबंधाने विचारणा करीत होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी मात्र याबाबत बोलण्याचे टाळत होते. गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांच्याकडे या संबंधाने चौकशी करण्यासाठी वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांची बोलण्याचे टाळले. तर, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे यांनी कुणाचे नाव घेणे योग्य नाही मात्र आम्ही अनेकांची चौकशी केली. आजही काही जणांना या संबंधाने विचारपूस केल्याचे ते म्हणाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती देण्याचे टाळल्यामुळे भाजपाच्या निलंबित पदाधिकाऱ्याच्या चौकशीचे वृत्त खरे की खोटे, ते स्पष्ट झाले नाही.तपास लावणारच : आयुक्तया गुन्ह्याचा तपास शहर पोलिसांसाठी आव्हान नव्हे तर प्रतिष्ठेचा विषय ठरल्याचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गेल्या आठवड्यात पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. आजही त्यांनी गोळीबाराचा छडा आम्ही लावणारच, असे म्हटले. तपासात प्रगती आहे. त्यामुळे कुणाचे नाव घेणे योग्य ठरत नसल्याचेही डॉ. उपाध्याय म्हणाले.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीFiringगोळीबार