शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

महाराष्ट्र एटीएसनं दोन भावांच्या मुसक्या आवळल्या, 'सिमी'साठी करत होते काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 18:36 IST

बंदी असलेल्या सिमी (स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया) या दहशतवादी संघटनेचा अटक आरोपी सदस्य असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे२९ जुलै २००६ रोजी सिमी संघटने संबंधात नोंद झालेल्या गुन्हयात फरार असलेले इजाज अक्रम शेखआणि इलियास अक्रम शेख या बंधूंना गोपनिय माहितीवरून एटीएसने बहानपुर, मध्य प्रदेश आणि दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे.

मुंबई - २००६ सालच्या प्रकरणातील पाहिजे आरोपींना अखेर महाराष्ट्र एटीएसनेअटक केली आहे. ही अटकमध्य प्रदेशातील बहानपुर आणि दिल्ली येथून केली असून आरोपींची नावे इजाज उर्फ अझीझ अक्रम शेख आणि इलियास अक्रम शेख अशी आहेत. बंदी असलेल्या सिमी (स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया) या दहशतवादी संघटनेचा अटक आरोपी सदस्य असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.

बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी ठाण्यात २००६ साली बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) अधिनियम-१९६७ अंतर्गत इजाजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २९ जुलै २००६ रोजी सिमी संघटने संबंधात नोंद झालेल्या गुन्हयात फरार असलेले इजाज अक्रम शेख आणि इलियास अक्रम शेख या बंधूंना गोपनिय माहितीवरून एटीएसने बहानपुर, मध्य प्रदेश आणि दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. ट्रान्झिट रिमांडवरून त्यांना मुंबईत आणण्यात येत असून पुढील तपास सुरु आहे. 

सन २००१ पासून सिमी संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. २००६ मध्ये दहशतवाद विरोधी पथकाला मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून नयानगर मिरारोड येथे धाड घातली असता एहतेशाम कुतुबुद्दीन सिध्दीकी याच्या घरी आक्षेपार्ह साहित्य मिळून आले होते. तसेच, या ठिकाणाहून बंदी घातलेल्या सिमी संघटना देशविरोधी काम चालू असल्याचे दिसून आले होते. यावरून दिनांक २९ जुलै २००६ रोजी त्यांच्याविरुद्ध बकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (UAPA) अन्वये गुन्हा नोंद करुन त्याला अटक करण्यात आली होती. 

सदर गुन्हयाच्या तपासात शासनाने बंदी घातली असताना सुध्दा संघटनेसाठी सक्रिय असलेले आरोपी निष्पन्न झालेले होते. त्यापैकी अब्दुस सुभान कुरेशी उर्फ तौकीर, सफदर नागौरी यांना यापूर्वीच अटक करून आरोपपत्र दाखल केले आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये इजाज शेख आणि इलियास शेख या बंधूंचा समावेश होता. ते सन २००६ पासून कुर्ला येथील राहत्या पाट्यावरून फरार होऊन ओळख लपवून वावरत होते. या गुन्हयातील मुख्य आरोपी एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी यास २४ ऑक्टोबर २०१६ साली ७ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे. त्याचप्रमाणे १६ जुलै २०१६ ला मुंबईत ७ ठिकाणी झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोटातील गुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसterroristदहशतवादीArrestअटकmira roadमीरा रोडMadhya Pradeshमध्य प्रदेशdelhiदिल्ली